शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

कबुलायतदारप्रश्नी उपेक्षाच

By admin | Updated: November 12, 2014 22:55 IST

पंधरा वर्षांचा कालावधी : आंबोली, चौकुळ ग्रामस्थांचा लढा सुरुच

आंबोली : कबुलायतदार गावकार प्रश्नी सरकार दरबारी आपल्या जमिनी मिळविण्यासाठी गेली पंधरा वर्षे आंबोली, चौकुळ, गेळे या तिन्ही गावातील कबुलायतदार गावकर लढताना दिसत आहे. परंतु गेली पंधरा वर्षे केवळ उपेक्षा व आश्वासनांची खैरात त्यांच्या पदरी पडली आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याकरिता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कबुलायतदार गावकरांच्या जमिनी व काही अधिकाऱ्यांच्या मूर्खपणामुळे १९९३- ९४ साली महाराष्ट्र शासनाच्या नावे लागल्या होत्या. यात सर्वात जास्त अन्याय चौकुळ, आंबोली व गेळे या तीन गावांवर झाला होता. त्यावेळी शिवसेनेकडून नारायण राणे हे मुख्यमंत्री होते. त्यांच्याच काळात हा निर्णय झाला होता. त्यानंतर या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सगळे कबुलायतदार गावकर एकत्र आले होते व हा प्रश्न न्यायालयात दाखल करण्यात आला होता. परंतु ना न्यायालयाकडून, ना राजकर्त्यांकडून कोणतेही ठोस उलट मिळू शकले नाही. त्यामुळेच निराशाच पदरात पडली होती. त्यानंतर आशेचा किरण म्हणून ज्यावेळी नारायण राणे महसूलमंत्री होते, त्यावेळीसुध्दा निराशाच पदरी पडली होती. राहते घर, कसत्या जमिनी महाराष्ट्र शासनाच्या नावे लागत्या होत्या. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांची पायाखालची वाळू सरकली होती. आमदार दीपक केसरकर यांनीही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. परंतु त्यांनाही यश आले होते. यातही आणखी एक आशेचा किरण निर्माण झाला होता. तो म्हणजे शिवसेना- भाजपा युती होऊन दीपक केसरकर यांना एखादे मंत्रीपद मिळेल व हा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागेल. परंतु त्याही आशेवर पाणी फिरले आहे. एका बाजूने वनसंज्ञा लागू असलेल्या जमिनी, वनविभागाच्या जमिनी व आता राहत्या व कसत्या जमिनीही महाराष्ट्र शासनाच्या नावाखाली लागल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जही मिळत नाही की, नुकसानभरपाईही मिळत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. युती न झाल्यास येत्या सरकारकडूनही जमीन प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा मावळणार असल्याचे चित्र आहे. एकंदरीत भूमिहीन करणाऱ्या राजकर्त्यांना व शासनाला समजाविणार तरी कोण, हा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतीचे नुकसान मागितल्यास सर्वच विभागांकडून सातबारा उतारा मागितला जातो. परंतु सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासन असे लिहिल्याने शेतकऱ्यांना अक्षरश: हाकलूनही दिले जाते. तसेच घर बांधायला परवानगी मिळत नाही, पाणी कनेक्शन मिळत नाही. अशा अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे उभ्या राहिल्या आहेत. (वार्ताहर)