शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कबुलायतदारप्रश्नी उपेक्षाच

By admin | Updated: November 12, 2014 22:55 IST

पंधरा वर्षांचा कालावधी : आंबोली, चौकुळ ग्रामस्थांचा लढा सुरुच

आंबोली : कबुलायतदार गावकार प्रश्नी सरकार दरबारी आपल्या जमिनी मिळविण्यासाठी गेली पंधरा वर्षे आंबोली, चौकुळ, गेळे या तिन्ही गावातील कबुलायतदार गावकर लढताना दिसत आहे. परंतु गेली पंधरा वर्षे केवळ उपेक्षा व आश्वासनांची खैरात त्यांच्या पदरी पडली आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याकरिता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कबुलायतदार गावकरांच्या जमिनी व काही अधिकाऱ्यांच्या मूर्खपणामुळे १९९३- ९४ साली महाराष्ट्र शासनाच्या नावे लागल्या होत्या. यात सर्वात जास्त अन्याय चौकुळ, आंबोली व गेळे या तीन गावांवर झाला होता. त्यावेळी शिवसेनेकडून नारायण राणे हे मुख्यमंत्री होते. त्यांच्याच काळात हा निर्णय झाला होता. त्यानंतर या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सगळे कबुलायतदार गावकर एकत्र आले होते व हा प्रश्न न्यायालयात दाखल करण्यात आला होता. परंतु ना न्यायालयाकडून, ना राजकर्त्यांकडून कोणतेही ठोस उलट मिळू शकले नाही. त्यामुळेच निराशाच पदरात पडली होती. त्यानंतर आशेचा किरण म्हणून ज्यावेळी नारायण राणे महसूलमंत्री होते, त्यावेळीसुध्दा निराशाच पदरी पडली होती. राहते घर, कसत्या जमिनी महाराष्ट्र शासनाच्या नावे लागत्या होत्या. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांची पायाखालची वाळू सरकली होती. आमदार दीपक केसरकर यांनीही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. परंतु त्यांनाही यश आले होते. यातही आणखी एक आशेचा किरण निर्माण झाला होता. तो म्हणजे शिवसेना- भाजपा युती होऊन दीपक केसरकर यांना एखादे मंत्रीपद मिळेल व हा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागेल. परंतु त्याही आशेवर पाणी फिरले आहे. एका बाजूने वनसंज्ञा लागू असलेल्या जमिनी, वनविभागाच्या जमिनी व आता राहत्या व कसत्या जमिनीही महाराष्ट्र शासनाच्या नावाखाली लागल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जही मिळत नाही की, नुकसानभरपाईही मिळत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. युती न झाल्यास येत्या सरकारकडूनही जमीन प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा मावळणार असल्याचे चित्र आहे. एकंदरीत भूमिहीन करणाऱ्या राजकर्त्यांना व शासनाला समजाविणार तरी कोण, हा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतीचे नुकसान मागितल्यास सर्वच विभागांकडून सातबारा उतारा मागितला जातो. परंतु सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासन असे लिहिल्याने शेतकऱ्यांना अक्षरश: हाकलूनही दिले जाते. तसेच घर बांधायला परवानगी मिळत नाही, पाणी कनेक्शन मिळत नाही. अशा अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे उभ्या राहिल्या आहेत. (वार्ताहर)