शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

महेंद्र शिंदेंसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज

By admin | Updated: August 26, 2015 22:52 IST

अशोक करंबेळकर : आचरा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम

आचरा : भारताला आर्थिक महासत्ता बनविताना वारंवार होणारे दहशतवादी हल्ले आणि अतिरेकी कारवाया या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करीत असताना महेंद्र शिंदे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अशोक करंबेळकर यांनी व्यक्त केले. आचरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून वर्षभरापूर्वी कार्यभार स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी वर्षभरात आचरा गावातच नव्हे तर पंचक्रोशीमधील आपल्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये आपल्या अनोख्या कार्याचा ठसा उमटविताना आपल्या दैनंदिन कामकाजाबरोबरच आपल्या कार्याच्या परिघाबाहेर जनमानसामध्ये मिळून मिसळून काम करताना अनेक लोकोपयोगी कार्य केली आहेत. या सर्व कार्यामुळे आचरा पंचक्रोशीमध्ये पोलीस दलाची शान वाढविण्यात त्यांनी अनोखे यश संपादन केल्यामुळे आचरा पत्रकार मित्रांनी त्यांच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन श्री देव रामेश्वर संस्थानच्या भक्तनिवास सभागृहात केले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपिता लेफ्टनंट कर्नल मनिष कदम यांचे वडील शशिकांत कदम तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, बाळासाहेब पंतवालावलकर, रामेश्वर देवस्थानचे सचिव संतोष मिराशी, शशांक मिराशी आदी मान्यवर उपस्थित होते.आचरा पत्रकार मित्रांच्यावतीने त्यांचा मानपत्र, श्रीफळ व भेटवस्तू देऊन शशिकांत कदम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कोकण माऊली रिसॉर्टच्यावतीने चित्रकार विशाल गोलतकर यांच्यावतीने त्यांनी चितारलेली महेंद्र शिंदे यांची अनोखी छबी त्यांना भेट म्हणून दिली.यावेळी उपस्थित मान्यवरांमधून आपल्या जीवनाला अनोखी दिशा प्राप्त करून दिल्याची आठवण सांगताना आपल्याला महेंद्र शिंदे यांच्यामुळे पुनर्जन्म मिळाल्याचे काही दिवसांपूर्वी मनोरुग्ण म्हणून वावरणाऱ्या मनिष पाटील याने सांगितले. तर तरुणाईला वाममार्गाकडे जाण्यापासून परावृत्त करणाऱ्या महेंद्र शिंदे यांचे कार्य अर्चन पांगे याने आपल्या स्व अनुभवातून कथन केले. ज्येष्ठ नागरिकांसोबत मित्रभावनेने वावरणाऱ्या शिंदे यांची ओळख अशोक गावकर व श्रीकांत सांबारी यांनी करुन दिली. एक कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असतो याचे उदाहरण माजी सभापती निलिमा सावंत यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. गावपळण कालावधीत शिंदे यांचे अनोखे कार्य अनिल करंजे यांनी विषद केले. शशांक मिराशी यांनी महेंद्र शिंदे हे आचरावासियांचे मित्रच बनल्याचे सांगताना त्यांच्यामधील माणूस सदोदीत जागा असल्याचे सांगितले. अशोक करंबेळकर यांनी महेंद्र शिंदे यांच्या चांगल्या कार्याची दखल तर घेतलीच पण आचरा हे सागरी पोलीस ठाणे असल्याने आचरा सागरी पोलीस ठाण्यामार्फत खरोखर अभिप्रेत असलेले कार्य करण्याकरीता महेंद्र शिंदे यांनी आपल्या वरिष्ठांकडे तशा स्वरूपाचा पाठपुरावा करण्याची सूचना केली. शेवटी या कार्यक्रमास उपस्थित संतोष कोदे, समीर हडकर, सचिन हडकर, अभय भोसले, राजन गावकर आदींनी भेटवस्तू देऊन शिंदे यांचा गौरव केला.महेंद्र शिंदे आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, फारसे काही वेगळे केले नाही तर माझ्या कर्तव्यामध्ये कार्य करताना थोडेसे अधिक काही समाजाकरीता द्यावे असे वाटल्याने मी ते करत गेलो आणि पुढेही करतच राहीन. मी आचरा गावचा सुपत्र या भावनेने या ठिकाणी कार्यरत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानेगुरुजी कथामालेचे सुरेश ठाकूर यांनी केले तर सूत्रसंचालन रामचंद्र कुबल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशराज संघटना आचराचे कार्यकर्ते जयप्रकाश परुळेकर, बागवे लंच होमचे आशिष बागवे आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)