शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गला सक्षम नेतृत्वाची गरज

By admin | Updated: June 27, 2016 00:35 IST

संधीचा अभाव : अनेक नेत्यांमध्ये नेतृत्वाचे गुण; दिग्गज राजकारणी असतानाही विकास खुंटला

वैभव साळकर---दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन अठरा वर्षे पूर्ण झाली. मात्र, अद्याप तालुक्याची विकास प्रक्रिया मंद गतीनेच सुरू आहे. तालुक्याच्या या मंदावलेल्या विकासामागे सक्षम नेतृत्वाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. तालुक्यात सुरेश दळवी, एकनाथ नाडकर्णी, बाबुराव धुरी, राजेंद्र म्हापसेकर, यशवंत आठल्येकर यासारखे दिग्गज राजकारणी असतानाही त्यांना राज्यात तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. परिणामत: तालुक्याचा विकास मात्र धीमाच राहिला. त्यामुळे जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या या तालुक्याच्या विकासाकरीता सक्षम नेतृत्वाची गरज आहे. तालुकावासियांना भविष्यात आपल्याला सक्षम नेतृत्व मिळेल, अशी आशा आहे.महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यांचा त्रिवेणी संगम साधणारा तालुका म्हणजे दोडामार्ग अशी राज्यभरात दोडामार्ग तालुक्याची ओळख आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या येथील लोकांची प्रशासकीय कामांसाठी होणारी ससेहोलपट पाहून स्वतंत्र दोडामार्ग तालुका निर्मितीची चळवळ उभी राहिली आणि या चळवळीला २७ जून १९९९ रोजी यश आले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखंड असलेल्या सावंतवाडी तालुक्याचे विभाजन करून दोडामार्ग तालुक्याची निर्मिती केली. त्यामुळे इथल्या लोकांसाठी विकासाची कवाडे खुली झाली. पण त्यानंतर आजमितीला अठरा वर्षे पूर्ण झाली तरी इथला विकास मात्र निम्म्यावरच आहे. त्यामागची कारणमिमांसा केल्यास तालुक्याला सक्षम नेतृत्व न लाभल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रकर्षाने समोर येते. तालुका निर्माण झाल्यानंतर तहसील व पंचायत समिती कार्यालये सुरू झाली. मात्र, सुरूवातीची पाच वर्षे प्रभारी अधिकाऱ्यांवरच तालुक्याचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यामुळे विकास प्रक्रिया गतिमान झाली नाही. तालुक्याच्या मुख्यालय इमारतीसाठी असो अथवा न्यायालयासाठी, तालुकावासियांना तब्बल १४ वर्षे वाट पहावी लागली. येथील बसस्थानक तर तब्बल १७ व्या वर्षी पूर्ण झाले. तालुका निर्माण झाल्यानंतर पहिल्या दहा वर्षातच खरे तर ही कामे पूर्ण व्हायला हवी होती. विविध शासकीय कार्यालये, त्यांना लागणारा अधिकारीवर्ग तालुक्यात यायला हवा होता. पण तसे झाले नाही. विविध शासकीय कार्यालये तालुक्यात येण्यासाठी १५ वर्षांचा कालावधी लागला. साहजिकच इथली विकास प्रक्रिया मागे गेली. त्यामुळे आज अठरा वर्षांनंतरही तालुक्याला सर्वांगिण विकासाची प्रतीक्षा आहे. त्याकरिता सक्षम नेतृत्व मिळणे ही काळाची गरज आहे. तालुक्यात सुरेश दळवी, एकनाथ नाडकर्णी, बाबुराव धुरी, राजेंद्र म्हापसेकर, यशवंत आठल्येकर असे एकापेक्षा एक धुरंधर राजकारणी आहेत. ज्यांच्यामध्ये नसानसात नेतृत्वाचे गुण भरले आहेत. मात्र, यापैकी एकालाही राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. ज्या संधी उपलब्ध झाल्या, त्या कमी प्रमाणात अल्प कालावधीसाठी मिळाल्या. त्यामुळे सक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे इथला विकास रेंगाळला. आज तालुक्यात युवा नेते मंडळीही आहेत. दोडामार्गचा विकास सध्या तरी निम्म्यावरच आहे. भविष्यात विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा असल्याने इथल्या पर्यटन, उद्योग व शैक्षणिक क्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास नक्कीच दोडामार्ग सुजलाम्-सुफलाम् बनण्यास वेळ लागणार नाही.दोडामार्गवासियांना मोठ्या अपेक्षा संतोष नानचे, चेतन चव्हाण, प्र्रेमानंद देसाई यासारखी युवा मंडळी दोडामार्ग तालुक्यात आहेत. भले राजकीय पक्ष वेगवेगळे असले, तरी नेतृत्व करण्याचे गुण ठासून भरले आहेत. त्यामुळे या सर्वांकडून दोडामार्ग तालुकावासियांना मोठ्या अपेक्षा आहेत. दोडामार्ग तालुक्यात अनेक मातब्बर राजकीय व्यक्तीमत्त्वे आहेत. पण त्यांना नेतृत्त्व करण्याची संधी राज्यस्तरावर मिळालेली नाही. तालुक्याला राजकीय नेतृत्त्व न लाभल्याने इथली विकासप्रक्रीया कुर्म गतीने सुरू आहे. त्याचाच परीणाम म्हणुन शासकीय कार्यालये तालुक्यात सुरू होण्यास विलंब लागला. सध्यातरी विकासाच्या बाबतीत निम्म्यावर असलेल्या तालुक्याला सर्वांगीण विकासाकडे नेण्याकरीता तालुक्यातच राजकीय दृष्टया सक्षम नेतृत्त्व घडणे गरजेचे आहे. तरच गतिमान विकास प्रक्रीया राबविणे शक्य होईल.- आनंद कामत, दोडामार्ग