शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

एक विचाराने प्रश्न सोडविले तरच लोकशाही टिकेल: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 10:48 IST

समृद्ध लोकशाही असलेला देश आणखी बळकट होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्क

वेगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) : बॅ. नाथ पै यांचा लोकशाही प्रणालीवर प्रचंड विश्वास होता. आजही आपल्या देशात लोकशाही टिकून आहे. जो घटक विकासापासून दूर असेल, त्याला विकासाच्या प्रक्रियेत आणले पाहिजे. तेथील प्रश्न एका विचाराने सोडविले तरच समृद्ध लोकशाही असलेला देश आणखी बळकट होईल, असे मत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.

पवार शनिवारी वेंगुर्ले येथील बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार बाळाराम पाटील, बॅ. नाथ पै यांची नात अदिती पै, शैलेंद्र पै, पद्मश्री परशुराम गंगावणे, बॅ. नाथ पै यांचे मित्र विठ्ठल याळगी, आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, बॅ. नाथ पै गरीब कुटुंबात जन्माला आले. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले असल्याने आईने छोटी-मोठी कामे करून या सात भावंडांना मोठे केले. काही अंतराने बॅ. नाथ पै बेळगाव येथे गेले. तेथे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य पूर्णपणे संघर्षातून गेले. नंतर पुढे ते इंग्लंड येथे गेले आणि तेथील काही आंदोलनात भाग घेतला, अभ्यास केला. त्यानंतर ते भारतात आले तेव्हा बेळगाव येथून विधानसभा निवडणूक लढले; परंतु पराभूत झाले. मात्र, ते मागे हटले नाहीत. पुन्हा इंग्लंड येथे गेले आणि नंतर जेव्हा पुन्हा इकडे आले, तेव्हा समाजवादी विचारसरणीत सक्रिय सहभाग घेतला. 

राजापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि त्यांनी प्रगल्भ विचार देशाला दिले आणि ते आजही आपण पुस्तकरूपाने वाचत आहोत, असे ते म्हणाले.

‘राजकीय जडणघडणीत पवारांचा मोलाचा वाटा’

दीपक केसरकर म्हणाले, शरद पवार हे सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. माझ्या राजकीय जडणघडणीत पवार यांचा मोलाचा वाटा असून, शांतता आणि संयम हे त्यांनीच आम्हाला शिकविले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार