शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

वागदेच्या तरुणीचा राष्ट्रीय सन्मान

By admin | Updated: November 21, 2015 23:57 IST

इंदिरा गांधी पुरस्काराने गौरव : राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे उत्कृष्ट सामाजिक कार्य

कणकवली : तालुक्यातील वागदे-गावडेवाडी येथील सीमा दिलीप गावडे हिला राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे केलेल्या सामाजिक कार्याबद्दल इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार देऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गुरुवारी गौरविण्यात आले. कोल्हापूर येथून शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेमधून तिने विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. प्रमाणपत्र, ५० हजार रुपये आणि रौप्यपदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सीमा गावडे हिने शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर येथून कला शाखेतून पदवी घेताना राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेतला होता. पदवी शिक्षणाच्या तीनही वर्षात तिने एनएसएसच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, नेत्रदान शिबिरे, एचआयव्ही जनजागृती, स्त्री-भ्रूणहत्या जनजागृती अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. एनएसएसमधून समाजासाठी चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. भारतभरातील जवळपास चार लाख स्वयंसेवकांमधून ३० स्वयंसेवक या पुरस्कारासाठी निवडले जातात. यात राज्यातूून पहिला क्रमांक पटकावत सीमाने पुरस्कारावर नाव कोरले. नवी दिल्लीच्या राजभवनातील शाही सोहळ्य्ाात सीमा गावडे हिला पुरस्कार देऊन गौरविले. २०१४-१५ या वर्षासाठीचा हा पुरस्कार आहे. सीमाचे वडील दिलीप गावडे शेती व इतर कामे करतात. आई, बहीण, काका व त्यांचे कुटुंबीय असा तिचा परिवार आहे. पदवी शिक्षणानंतर सीमा पुणे येथे पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे. वागदे गावातर्फे सीमा हिचा सत्कार केला जाणार असल्याचे सरपंच संदीप सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)