शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कोकणचे अलौकिक नेतृत्व नारायण राणे

By admin | Updated: April 11, 2016 00:55 IST

वक्त्यांचे गौरवोद्गार : ‘नारायण राणे, माहीत असलेले... माहीत नसलेले...’ कार्यक्रम; कोकणी माणसाला नवी ओळख

ओरोस : महाराष्ट्राच्या राजकारणात कोकणचा दरारा निर्माण करण्याचे काम नारायण राणे यांनी केले आहे. मुंबईतील मराठी माणसाला साऱ्या देशात ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी ओळख मिळवून दिली, त्याचप्रमाणे नारायण राणे यांनी कोकणी माणसाला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली. त्यांचे हे कार्य अलौकिक असेच आहे, असे गौरवोद्गार ओरोस येथील कार्यक्रमात सर्वच वक्त्यांनी काढले. ओरोस येथील शरद कृषी भवनमध्ये सिंधुरत्न फाउंडेशनच्या वतीने ‘नारायण राणे, माहीत असलेले... माहीत नसलेले...’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच वक्त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी नारायण राणे, नीलम राणे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ बाळासाहेब अनासकर, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, मधुकर भावे, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार नीतेश राणे म्हणाले, आमच्या प्रत्येक श्वासावर नारायण राणे यांचाच अधिकार आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला सर्वकाही मिळाले आहे. कार्यकर्त्यांकडून आम्हाला त्यांच्या गुणांबद्दल वेळोवेळी माहिती समजत असते. नीलेश राणे म्हणाले, नारायण राणे यांना क्रिकेटची फार आवड आहे. सचिन तेंडुलकर त्यांना खूप आवडतो. तो आऊट झाला की ते लगेच टी.व्ही. बंद करतात. कार्यकर्त्यांनाही हे माहीत झाले आहे. त्यामुळे त्यांचा मूड खराब झाला की, कार्यकर्ते कोणी भेटायला येऊ नका असे सांगतात. ‘तू माणसांना जप, राजकारण तुला जपेल’, असा मंत्र त्यांनी मला दिला असल्याचेही ते म्हणाले. किरण ठाकूर म्हणाले, राणे मुख्यमंत्री असताना बेळगाव सीमाप्रश्नी आम्ही त्यांची भेट घेतली होती, त्यावेळी या कर्नाटकवाल्यांचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. आणि हे नाक दाबण्याचे काम तुम्ही माझ्यावर सोडा, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, दुर्दैवाने मंत्रिपद त्यांच्याकडे फार काळ राहिले नाही. त्यामुळे हे काम अपूर्णच राहिले आहे. मधुकर भावे, गणेश जेठे, सीताराम गावडे, नकुल पार्सेकर, डॉ. मंदार रानडे, डॉ. नितीन शेट्ये, सतीश पाटणकर, आर्या मढव यांनीही मनोगत व्यक्त केले. मधुसूदन नानीवडेकर यांनी यावेळी कविता सादर केली. सिंधुरत्न फाउंडेशनतर्फे राणे यांची ग्रंथतुला करण्यात आली. हे सर्व गं्रथ सावंतवाडी येथील वाचनालयाला प्रदान करण्यात आले. (वार्ताहर)धाडसी, आक्रमक नेतृत्वराजकारणात अनेक व्यक्ती पाहिल्या, मात्र नारायण राणे यांच्यासारखे धाडसी व आक्रमक नेतृत्व पाहिले नाही. पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारा नेता तसेच आमदारांवर वचक असलेला नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. मी सहा-सात वेळा निवडून आलो आहे. तेथील जनतेने यामध्ये खंड पाडलेला नाही. मात्र, कोकणी जनतेने नारायण राणे यांना पुन्हा निवडून न देऊन स्वातंत्र्यात खंड पाडलेला आहे. त्यामुळे विकासाचा वेगही कमी झालेला आहे. यापुढे या सर्वस्पर्शी नेत्याला पुन्हा उभे करण्याचे काम सार्वत्रिक प्रयत्न करून करूया, असे आवाहन माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले.अभ्यासू व्यक्तिमत्त्वनारायण राणे हे हळव्या मनाचे असून, ते सर्वांवरच मनापासून प्रेम करतात. विधिमंडळात कधीही अभ्यास केल्याशिवाय त्यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यांनी कोकणचे नाव देशपातळीवर नेले. सन २०१४ हे मनाला चटका लावणारे वर्ष होते. त्यांच्या निवडणुकीतील पराभवामुळे कोकणचेच नुकसान झालेले आहे, असे हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.