शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचे अलौकिक नेतृत्व नारायण राणे

By admin | Updated: April 11, 2016 00:55 IST

वक्त्यांचे गौरवोद्गार : ‘नारायण राणे, माहीत असलेले... माहीत नसलेले...’ कार्यक्रम; कोकणी माणसाला नवी ओळख

ओरोस : महाराष्ट्राच्या राजकारणात कोकणचा दरारा निर्माण करण्याचे काम नारायण राणे यांनी केले आहे. मुंबईतील मराठी माणसाला साऱ्या देशात ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी ओळख मिळवून दिली, त्याचप्रमाणे नारायण राणे यांनी कोकणी माणसाला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली. त्यांचे हे कार्य अलौकिक असेच आहे, असे गौरवोद्गार ओरोस येथील कार्यक्रमात सर्वच वक्त्यांनी काढले. ओरोस येथील शरद कृषी भवनमध्ये सिंधुरत्न फाउंडेशनच्या वतीने ‘नारायण राणे, माहीत असलेले... माहीत नसलेले...’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच वक्त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी नारायण राणे, नीलम राणे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ बाळासाहेब अनासकर, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, मधुकर भावे, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार नीतेश राणे म्हणाले, आमच्या प्रत्येक श्वासावर नारायण राणे यांचाच अधिकार आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला सर्वकाही मिळाले आहे. कार्यकर्त्यांकडून आम्हाला त्यांच्या गुणांबद्दल वेळोवेळी माहिती समजत असते. नीलेश राणे म्हणाले, नारायण राणे यांना क्रिकेटची फार आवड आहे. सचिन तेंडुलकर त्यांना खूप आवडतो. तो आऊट झाला की ते लगेच टी.व्ही. बंद करतात. कार्यकर्त्यांनाही हे माहीत झाले आहे. त्यामुळे त्यांचा मूड खराब झाला की, कार्यकर्ते कोणी भेटायला येऊ नका असे सांगतात. ‘तू माणसांना जप, राजकारण तुला जपेल’, असा मंत्र त्यांनी मला दिला असल्याचेही ते म्हणाले. किरण ठाकूर म्हणाले, राणे मुख्यमंत्री असताना बेळगाव सीमाप्रश्नी आम्ही त्यांची भेट घेतली होती, त्यावेळी या कर्नाटकवाल्यांचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. आणि हे नाक दाबण्याचे काम तुम्ही माझ्यावर सोडा, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, दुर्दैवाने मंत्रिपद त्यांच्याकडे फार काळ राहिले नाही. त्यामुळे हे काम अपूर्णच राहिले आहे. मधुकर भावे, गणेश जेठे, सीताराम गावडे, नकुल पार्सेकर, डॉ. मंदार रानडे, डॉ. नितीन शेट्ये, सतीश पाटणकर, आर्या मढव यांनीही मनोगत व्यक्त केले. मधुसूदन नानीवडेकर यांनी यावेळी कविता सादर केली. सिंधुरत्न फाउंडेशनतर्फे राणे यांची ग्रंथतुला करण्यात आली. हे सर्व गं्रथ सावंतवाडी येथील वाचनालयाला प्रदान करण्यात आले. (वार्ताहर)धाडसी, आक्रमक नेतृत्वराजकारणात अनेक व्यक्ती पाहिल्या, मात्र नारायण राणे यांच्यासारखे धाडसी व आक्रमक नेतृत्व पाहिले नाही. पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारा नेता तसेच आमदारांवर वचक असलेला नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. मी सहा-सात वेळा निवडून आलो आहे. तेथील जनतेने यामध्ये खंड पाडलेला नाही. मात्र, कोकणी जनतेने नारायण राणे यांना पुन्हा निवडून न देऊन स्वातंत्र्यात खंड पाडलेला आहे. त्यामुळे विकासाचा वेगही कमी झालेला आहे. यापुढे या सर्वस्पर्शी नेत्याला पुन्हा उभे करण्याचे काम सार्वत्रिक प्रयत्न करून करूया, असे आवाहन माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले.अभ्यासू व्यक्तिमत्त्वनारायण राणे हे हळव्या मनाचे असून, ते सर्वांवरच मनापासून प्रेम करतात. विधिमंडळात कधीही अभ्यास केल्याशिवाय त्यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यांनी कोकणचे नाव देशपातळीवर नेले. सन २०१४ हे मनाला चटका लावणारे वर्ष होते. त्यांच्या निवडणुकीतील पराभवामुळे कोकणचेच नुकसान झालेले आहे, असे हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.