शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

नारायण राणे यांचा राजीनामा

By admin | Updated: May 17, 2014 00:11 IST

रत्नागिरी : या मतदार संघातील जनतेला विकास नको आहे. सुसंस्कृत उमेदवार नको आहे. नीलेश राणे यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपण

रत्नागिरी : या मतदार संघातील जनतेला विकास नको आहे. सुसंस्कृत उमेदवार नको आहे. नीलेश राणे यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपण आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरीत केली. काही वेळातच त्यांनी राजीनामा पाठवूनही दिला. २५ वर्षांनी आता कळले - लोकांना कामेच नको आहेत. हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. मागील लोकांनी का विकास केला नाही, हे आता मला कळले. त्यामुळे आपण यापुढे विकासात्मक सर्वच अ‍ॅक्टिव्हिटी थांबविणार आहोत. राऊतांची नीलेश राणेंशी तुलना नाहीच - ते म्हणाले, नीलेश राणे यांनी केलेल्या कामांची बरोबरी विनायक राऊत करूच शकणार नाही. पण, जनतेलाच चारित्र्यहीन, कमी शिकलेली माणसे हवीत, कामे नकोत, अशी खंतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. विरोधकांनी हुरळून जावू नये - यासाठी मित्र पक्षाचे सहकार्य कितपत, यावर मतप्रदर्शित करताना राणे म्हणाले की, मला मित्र पक्षावर कुठलाच आरोप करायचा नाही. उलट रत्नागिरी - सिंधुदुर्गमधील सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीबद्दल आभार मानायला हवे. राणे शेवटी म्हणाले की, या रिझल्टचा माझ्यावर कुठलाच परिणाम होणार नाही. त्यामुळे विरोधकांनी हुरळून जाऊ नये.(प्रतिनिधी)