शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

चारही सभागृहात जाण्याचा नारायण राणेंनी मिळविला सन्मान, राज्यातील सहावे नेते 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 12, 2024 11:29 IST

सहाही जण राज्याचे माजी मुख्यमंत्री

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्गलोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून देशातील चारही सभागृहांमध्ये निवडून येण्याचा मान मिळविला आहे. यापूर्वी असा मान राज्यातील पाच माजी मुख्यमंत्र्यांनी मिळविला होता. यात राणे आता सहाव्या क्रमांकावर आले आहेत.माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते तथा लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर जोशी आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी अशा प्रकारे चारही सभागृहात जाण्याचा मान मिळविला होता. आता यात राणेंची भर पडली आहे.राणे यांनी १९९० पासून २०१४ पर्यंत सलग सहा वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या.त्यामुळे ते तब्बल २४ वर्षे विधानसभा सदस्य होते. त्यानंतर २०१७ साली त्यांनी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणूक लढवून ते विधान परिषदेच्या सभागृहात काही काळ आमदार होते. २०२१ साली भाजपा प्रवेशानंतर त्यांना राज्यसभेवर खासदार करण्यात आले, तर तत्कालिन मोदी सरकारमध्ये ते सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री होते.राणे २००५मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यावर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांचा आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून समावेश झाला. राणे यांचा २०१४ विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून पहिला पराभव झाला. २०१७मध्ये राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. हा पक्ष त्यांनी १५ ऑक्टोबर २०१९मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये विलीन केला.

महाराष्ट्राचे अल्प कालावधीसाठी मुख्यमंत्रीराणे यांनी विसाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला. चेंबूर येथे स्थानिक शाखाप्रमुख म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ते महापालिकेमध्ये नगरसेवक झाले. सन १९९० मध्ये तत्कालिन कणकवली - मालवण मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. भाजप - शिवसेना युती सरकारच्या काळात राणेंना प्रथम महसूल मंत्रालय मिळाले. १९९९मध्ये फेब्रुवारी ते ऑक्टोबर असे ९ महिने ते राज्याचे मुख्यमंत्री होते. ठाकरे आणि राणे यांच्यातील संबंध बिघडल्यानंतर २००५मध्ये ते पक्षाबाहेर पडले होते.

मूर्ती लहान पण कीर्ती महानमूर्ती लहान पण कीर्ती महान असे वर्णन नारायण राणे यांचे करता येईल. राजकारणात त्यांनी सक्षम नेतृत्व केले. ते माध्यमात कायम चर्चेत असतात. त्यांची कारकीर्द एक शिवसैनिक म्हणून सुरू झाली. नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. या काळात त्यांनी शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष, भाजप असा पक्षबदलही केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. राणे यांनी ७२व्या वर्षांत प्रवेश केला असला तरी त्यांचा उत्साह दांडगा आहे.सर्व सहाही राज्याचे माजी मुख्यमंत्रीशंकरराव चव्हाण, शरद पवार, मनोहर जोशी, पृथ्वराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि नारायण राणे हे सर्व सहाही जण राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. यातील अशोक चव्हाणवगळता अन्य पाच जण देशात केंद्रीय मंत्री म्हणूनही कार्यरत होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणेlok sabhaलोकसभा