शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आचरेकर मृत्यूबाबत गूढ

By admin | Updated: November 11, 2014 23:22 IST

खैदा येथील घटना : मृतदेहाकडे सापडलेल्या चिठ्ठ्यांद्वारे तपास सुरू

मालवण : खैदा न्हिवेवाडी येथील महादेव देऊ आचरेकर (वय ४७) यांनी सोमवारी दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठ्यांवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. वैद्यकीय शवविच्छेदन अहवालात आचरेकर यांचा मृत्यू गळफासामुळेच झाला असला तरीही शरीरात अल्कोहोल आढळून आल्याने अधिक तपासासाठी त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांनी सांगितले.महादेव आचरेकर हे सोमवारी सकाळी १०.३० वाजता घराबाहेर पडले होते. त्यांच्या भावाने पोलिसांत तशी तक्रार दिली आहे. तत्पूर्वी १० वाजता ते खैदा येथील आपल्या नेहमीच्या दुकानात मित्रांसमवेत दिसून आले होते. त्यानंतर सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.पाचच दिवसांपूर्वी गावात सुंदर तुकाराम वस्त (वय ४०, रा. साळकुंभा) यांचा मृतदेह आढळून आला होता. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली होती. वस्त यांचा मृतदेह कातवड प्राथमिक शाळेनजीक रस्त्यालगत आढळून आला होता. वस्त यांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी आचरेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले होते. या संदर्भात पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांना विचारले असता ते म्हणाले, वस्त यांच्या मृत्यूप्रकरणी अजूनपर्यंत संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही. त्यांना अनेक महिन्यांपासून फिट यायची सवय होती. वस्त यांच्या शवविच्छेदन अहवालातही संशयास्पद काहीही आढळून आले नाही. मात्र वस्त यांचा व्हिसेरा अधिक तपासासाठी पुणे व मिरज येथे पाठविण्यात आला आहे. वस्त यांच्या मृत्यूप्रकरणी आचरेकर हे पंच असल्याने त्यांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते असे बुलबुले म्हणाले. दरम्यान, आचरेकर हे कोणत्यातरी दडपणाखाली होते. यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा गावात सुरु झाली आहे. यामुळे आचरेकरांना नेमके कशाचे दडपण होते याचा तपास लावणे पोलिसांना आव्हान आहे.त्या चिठ्ठ्यांचा अर्थ काय?पोलीस तपासात आचरेकर यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. यानंतर आणखी काही चिठ्ठ्या पोलिसांना सापडून आल्या आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये आचरेकर यांनी काही मोबाईल नंबर त्यांच्याशी झालेली चर्चा लिहून ठेवली आहे. फोनवर झालेली चर्चा त्यांनी आपल्या मित्रालाही सांगितल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. वस्त यांच्या मृत्यूप्रकरणी पंच राहिल्याबाबतही त्यांच्याशी काहीजणांनी भेटून व फोन करून चर्चा केल्याचे त्यांनी एका चिठ्ठीत लिहिले आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला २० हजार रुपये दिले होते. ते आपल्याला प्रामाणिकपणे परत कर असेही एका चिठ्ठीत लिहून ठेवण्यात आले आहे. सापडून आलेल्या चिठ्ठ्या या आचरेकर यांच्याच आहेत अथवा नाहीत हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, सापडलेल्या चिठ्ठ्यांबाबत पोलिसांना विचारले असता चिठ्ठ्या मिळाल्याचे सांगण्यात आले मात्र त्यातील मजकुराचा अर्थबोध होत नसल्याचे बुलबुले यांनी स्पष्ट केले. आचरेकर यांच्या आत्महत्येच्या तपासामधील सर्व शक्यता पडताळून पहात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)वस्त यांचा खूनच : नातेवाईकांचा आरोप४ नोव्हेंबर रोजी कातवड येथे मृत स्थितीत आढळून आलेल्या सुंदर वस्त यांचा खून करण्यात आला आहे. त्यांच्या शरीरावर जखमा तसेच अन्य घाव होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुंदर वस्त यांच्या नातेवाईकांनी पोलिसांजवळ केल्याचे पुढे आले आहे. आचरेकर व वस्त यांच्या मृत्यूमागे काही समान धागेदोरे आहेत का या दृष्टीनेही तपास व्हावा अशी भूमिका वस्त यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. वस्त यांच्या शरीरावर जखमा व मारहाण झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांचा चेहराही काळा ठिक्कर पडला होता. याप्रकरणात आम्हाला आचरेकर यांनी सहकार्य केले. आता त्यांचाही संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे सुंदर वस्त यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी त्यांच्या नातेवाईकांनी मालवण पोलिसांजवळ केली आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांनी मालवण पोलीस ठाण्याला भेट देऊन याबाबत माहिती घेतली.