शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

आचरेकर मृत्यूबाबत गूढ

By admin | Updated: November 11, 2014 23:22 IST

खैदा येथील घटना : मृतदेहाकडे सापडलेल्या चिठ्ठ्यांद्वारे तपास सुरू

मालवण : खैदा न्हिवेवाडी येथील महादेव देऊ आचरेकर (वय ४७) यांनी सोमवारी दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठ्यांवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. वैद्यकीय शवविच्छेदन अहवालात आचरेकर यांचा मृत्यू गळफासामुळेच झाला असला तरीही शरीरात अल्कोहोल आढळून आल्याने अधिक तपासासाठी त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांनी सांगितले.महादेव आचरेकर हे सोमवारी सकाळी १०.३० वाजता घराबाहेर पडले होते. त्यांच्या भावाने पोलिसांत तशी तक्रार दिली आहे. तत्पूर्वी १० वाजता ते खैदा येथील आपल्या नेहमीच्या दुकानात मित्रांसमवेत दिसून आले होते. त्यानंतर सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.पाचच दिवसांपूर्वी गावात सुंदर तुकाराम वस्त (वय ४०, रा. साळकुंभा) यांचा मृतदेह आढळून आला होता. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली होती. वस्त यांचा मृतदेह कातवड प्राथमिक शाळेनजीक रस्त्यालगत आढळून आला होता. वस्त यांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी आचरेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले होते. या संदर्भात पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांना विचारले असता ते म्हणाले, वस्त यांच्या मृत्यूप्रकरणी अजूनपर्यंत संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही. त्यांना अनेक महिन्यांपासून फिट यायची सवय होती. वस्त यांच्या शवविच्छेदन अहवालातही संशयास्पद काहीही आढळून आले नाही. मात्र वस्त यांचा व्हिसेरा अधिक तपासासाठी पुणे व मिरज येथे पाठविण्यात आला आहे. वस्त यांच्या मृत्यूप्रकरणी आचरेकर हे पंच असल्याने त्यांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते असे बुलबुले म्हणाले. दरम्यान, आचरेकर हे कोणत्यातरी दडपणाखाली होते. यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा गावात सुरु झाली आहे. यामुळे आचरेकरांना नेमके कशाचे दडपण होते याचा तपास लावणे पोलिसांना आव्हान आहे.त्या चिठ्ठ्यांचा अर्थ काय?पोलीस तपासात आचरेकर यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. यानंतर आणखी काही चिठ्ठ्या पोलिसांना सापडून आल्या आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये आचरेकर यांनी काही मोबाईल नंबर त्यांच्याशी झालेली चर्चा लिहून ठेवली आहे. फोनवर झालेली चर्चा त्यांनी आपल्या मित्रालाही सांगितल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. वस्त यांच्या मृत्यूप्रकरणी पंच राहिल्याबाबतही त्यांच्याशी काहीजणांनी भेटून व फोन करून चर्चा केल्याचे त्यांनी एका चिठ्ठीत लिहिले आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला २० हजार रुपये दिले होते. ते आपल्याला प्रामाणिकपणे परत कर असेही एका चिठ्ठीत लिहून ठेवण्यात आले आहे. सापडून आलेल्या चिठ्ठ्या या आचरेकर यांच्याच आहेत अथवा नाहीत हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, सापडलेल्या चिठ्ठ्यांबाबत पोलिसांना विचारले असता चिठ्ठ्या मिळाल्याचे सांगण्यात आले मात्र त्यातील मजकुराचा अर्थबोध होत नसल्याचे बुलबुले यांनी स्पष्ट केले. आचरेकर यांच्या आत्महत्येच्या तपासामधील सर्व शक्यता पडताळून पहात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)वस्त यांचा खूनच : नातेवाईकांचा आरोप४ नोव्हेंबर रोजी कातवड येथे मृत स्थितीत आढळून आलेल्या सुंदर वस्त यांचा खून करण्यात आला आहे. त्यांच्या शरीरावर जखमा तसेच अन्य घाव होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुंदर वस्त यांच्या नातेवाईकांनी पोलिसांजवळ केल्याचे पुढे आले आहे. आचरेकर व वस्त यांच्या मृत्यूमागे काही समान धागेदोरे आहेत का या दृष्टीनेही तपास व्हावा अशी भूमिका वस्त यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. वस्त यांच्या शरीरावर जखमा व मारहाण झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांचा चेहराही काळा ठिक्कर पडला होता. याप्रकरणात आम्हाला आचरेकर यांनी सहकार्य केले. आता त्यांचाही संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे सुंदर वस्त यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी त्यांच्या नातेवाईकांनी मालवण पोलिसांजवळ केली आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांनी मालवण पोलीस ठाण्याला भेट देऊन याबाबत माहिती घेतली.