शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

विजेचा शॉक लागून माय- लेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 14:03 IST

विजेचा शॉक लागून माय- लेकाचा मृत्यू होण्याची हृदयद्रावक दुर्घटना बुधवारी मणेरी टेमवाडी येथे घडली. गंभीर जखमी झालेला मयताचा पुतण्या अनिल नाईक यांच्यावर म्हापसा आजीलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना सकाळी ९ व.च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देविजेचा शॉक लागून माय- लेकाचा मृत्यू मृताचा पुतण्या अनिल नाईक गंभीर जखमी

दोडामार्ग  : विजेचा शॉक लागून माय- लेकाचा मृत्यू होण्याची दुर्घटना बुधवारी मणेरी टेमवाडी येथे घडली.अशी त्यांची नावे आहेत, तर गंभीर जखमी झालेला मृताचा पुतण्या अनिल नाईक यांच्यावर म्हापसा आजीलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत, ही दुर्घटना सकाळी ९ व.च्या सुमारास घडली.

या दुर्घटनेस वीज वितरणचा बेफिकीरपणा कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जोपर्यंत मयताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई दिली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे.याबाबत अधिक माहिती अशी गुरुदास नाईक यांचे मणेरी टेमवाडी येथे राहते घर आहे. बुधवारी सकाळी ते दूध घेऊन दूध डेअरीवर विकण्यास घेऊन गेले होते. तर त्यांची आई घरी एकटीच होती. याचदरम्यान घरापासून जवळच कुजलेला वास येत असल्याने त्या त्याठिकाणी पाहण्यास गेल्या असता त्यांचाच चार दिवसांपासून गायब असलेला कुत्रा कुजलेल्या अवस्थेत त्यांना आढळला. त्यामुळे त्या कुत्र्याला बाहेर ओढण्यासाठी त्या पुढे सरसावल्या असता त्याठिकाणी तुटून पडलेल्या विद्युतभारीत तारेला स्पर्श होऊन त्या जागीच ठार झाल्या.

काहीवेळाने दुध घेऊन गेलेला मुलगा गुरुदास हा त्याठिकाणी आला असता आपली आई जमिनीवर कोसळलेली त्यांना आढळली. त्यामुळे गोंधळलेल्या त्यांच्या मुलाने तिला उचलण्यासाठी हात लावला असता तो देखील विजेचा शॉक लागून जखमी झाला.

हा प्रकार गुरुदास यांचा चुलतभाऊ अनिल नाईक यांच्या लक्षात येताच त्यांनी सुक्या लाकडाने विजेची तार बाजूला करून दोघांनाही दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणले. दरम्यान गुरुदास याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपल्या काकी व चुलत भावाला वाचविण्यासाठी प्रयत्न करणारे अनिल नाईक हे देखील जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी म्हापसा आजीलो रुग्णालयात नेण्यात आले.या दुर्घटनेची माहिती मिळताच मणेरी ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या घटनेस वीज वितरणचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत या प्रकारास दोषीवर गुन्हा दाखल होत नाही व मयताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यनतं मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतला होता.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग