शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शांतता, समृद्धीसाठीच माझी लढाई

By admin | Updated: October 12, 2014 23:34 IST

दीपक केसरकर : तळवडे बाजारपेठ येथील प्रचारसभेत प्रतिपादन

तळवडे : माझी लढाई शांततेसाठी व समृद्धीसाठी आहे. मी ज्येष्ठ नसलो तरी येथील सर्वसामान्यांचा नेता आहे. येथील नागरिकांना प्र्रेम, शांतता हवी असून ते दहशतीच्याविरोधात आहेत. सावंतवाडी संस्थान सुसंस्कृतांचे असून ते अन्याय सहन करणार नाहीत. दहशतवादाविरोधातील माझी लढाई पावित्र्याची आणि लोकांसाठीच आहे, असे मत शिवसेनेचे विधानसभा उमेदवार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तळवडे- बाजारपेठ येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी भाई गोवेकर, सुरेश नाईक, रुपेश राऊळ, प्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, मंगेश तळवणेकर, रमाकांत मल्हार, विभागप्रमुख विनोद काजरेकर, आ. रा. सावंत, राजू नाईक , स्मिता सोनावणे, प्रशांत बुगडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी केसरकर म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघात बाहेरुन काही पार्सले आली आहेत. त्यांना चेंडूप्रमाणे उडवून सुखरूप परत पाठवा. ही गुंड संस्कृती जिल्ह्याबाहेर काढणे जिंल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विरोधकांनी विकासकामांमध्ये सदैव खो घालण्याचे काम केले. जनतेवर गुंड प्रवृत्तीने अन्याय केला आहे. अशा विरोधकांना परतीची तिकिटे काढून द्या. सावंतवाडीत आलेल्या बाहेरील उमेदवारांना धडा शिकवा. त्याचा सावंतवाडीतील शिरकाव होण्यामागे खूप मोठे राजकारण आहे. केवळ स्थार्थासाठीच त्यांनी सावंतवाडीत तळ ठोकला आहे. शिवसेनेचे हात सदैव असेच बळकट करत रहा, असे आवाहन यावेळी दीपक केसरकर यांनी केले. येथील जनतेने भूलथापांना बळी पडता कामा नये, जनतेचा विकास कोण करु शकतो याची जनतेला जाणीव आहे. मात्र, राज्यातील सत्ताधाऱ्यांनाही विकासाच्या पाठिशी जनता नेहमीच उभी राहते, हे दाखवून द्या. सावंतवाडी मतदारसंघात वाढणारा दहशतवाद, गुंडागर्दी हद्दपार करा, अन्यथा तुमचे, आमचे संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही जान्हवी सावंत यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)