शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

शांतता, समृद्धीसाठीच माझी लढाई

By admin | Updated: October 12, 2014 23:34 IST

दीपक केसरकर : तळवडे बाजारपेठ येथील प्रचारसभेत प्रतिपादन

तळवडे : माझी लढाई शांततेसाठी व समृद्धीसाठी आहे. मी ज्येष्ठ नसलो तरी येथील सर्वसामान्यांचा नेता आहे. येथील नागरिकांना प्र्रेम, शांतता हवी असून ते दहशतीच्याविरोधात आहेत. सावंतवाडी संस्थान सुसंस्कृतांचे असून ते अन्याय सहन करणार नाहीत. दहशतवादाविरोधातील माझी लढाई पावित्र्याची आणि लोकांसाठीच आहे, असे मत शिवसेनेचे विधानसभा उमेदवार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तळवडे- बाजारपेठ येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी भाई गोवेकर, सुरेश नाईक, रुपेश राऊळ, प्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, मंगेश तळवणेकर, रमाकांत मल्हार, विभागप्रमुख विनोद काजरेकर, आ. रा. सावंत, राजू नाईक , स्मिता सोनावणे, प्रशांत बुगडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी केसरकर म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघात बाहेरुन काही पार्सले आली आहेत. त्यांना चेंडूप्रमाणे उडवून सुखरूप परत पाठवा. ही गुंड संस्कृती जिल्ह्याबाहेर काढणे जिंल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विरोधकांनी विकासकामांमध्ये सदैव खो घालण्याचे काम केले. जनतेवर गुंड प्रवृत्तीने अन्याय केला आहे. अशा विरोधकांना परतीची तिकिटे काढून द्या. सावंतवाडीत आलेल्या बाहेरील उमेदवारांना धडा शिकवा. त्याचा सावंतवाडीतील शिरकाव होण्यामागे खूप मोठे राजकारण आहे. केवळ स्थार्थासाठीच त्यांनी सावंतवाडीत तळ ठोकला आहे. शिवसेनेचे हात सदैव असेच बळकट करत रहा, असे आवाहन यावेळी दीपक केसरकर यांनी केले. येथील जनतेने भूलथापांना बळी पडता कामा नये, जनतेचा विकास कोण करु शकतो याची जनतेला जाणीव आहे. मात्र, राज्यातील सत्ताधाऱ्यांनाही विकासाच्या पाठिशी जनता नेहमीच उभी राहते, हे दाखवून द्या. सावंतवाडी मतदारसंघात वाढणारा दहशतवाद, गुंडागर्दी हद्दपार करा, अन्यथा तुमचे, आमचे संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही जान्हवी सावंत यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)