शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शांतता, समृद्धीसाठीच माझी लढाई

By admin | Updated: October 12, 2014 23:34 IST

दीपक केसरकर : तळवडे बाजारपेठ येथील प्रचारसभेत प्रतिपादन

तळवडे : माझी लढाई शांततेसाठी व समृद्धीसाठी आहे. मी ज्येष्ठ नसलो तरी येथील सर्वसामान्यांचा नेता आहे. येथील नागरिकांना प्र्रेम, शांतता हवी असून ते दहशतीच्याविरोधात आहेत. सावंतवाडी संस्थान सुसंस्कृतांचे असून ते अन्याय सहन करणार नाहीत. दहशतवादाविरोधातील माझी लढाई पावित्र्याची आणि लोकांसाठीच आहे, असे मत शिवसेनेचे विधानसभा उमेदवार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तळवडे- बाजारपेठ येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी भाई गोवेकर, सुरेश नाईक, रुपेश राऊळ, प्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, मंगेश तळवणेकर, रमाकांत मल्हार, विभागप्रमुख विनोद काजरेकर, आ. रा. सावंत, राजू नाईक , स्मिता सोनावणे, प्रशांत बुगडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी केसरकर म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघात बाहेरुन काही पार्सले आली आहेत. त्यांना चेंडूप्रमाणे उडवून सुखरूप परत पाठवा. ही गुंड संस्कृती जिल्ह्याबाहेर काढणे जिंल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विरोधकांनी विकासकामांमध्ये सदैव खो घालण्याचे काम केले. जनतेवर गुंड प्रवृत्तीने अन्याय केला आहे. अशा विरोधकांना परतीची तिकिटे काढून द्या. सावंतवाडीत आलेल्या बाहेरील उमेदवारांना धडा शिकवा. त्याचा सावंतवाडीतील शिरकाव होण्यामागे खूप मोठे राजकारण आहे. केवळ स्थार्थासाठीच त्यांनी सावंतवाडीत तळ ठोकला आहे. शिवसेनेचे हात सदैव असेच बळकट करत रहा, असे आवाहन यावेळी दीपक केसरकर यांनी केले. येथील जनतेने भूलथापांना बळी पडता कामा नये, जनतेचा विकास कोण करु शकतो याची जनतेला जाणीव आहे. मात्र, राज्यातील सत्ताधाऱ्यांनाही विकासाच्या पाठिशी जनता नेहमीच उभी राहते, हे दाखवून द्या. सावंतवाडी मतदारसंघात वाढणारा दहशतवाद, गुंडागर्दी हद्दपार करा, अन्यथा तुमचे, आमचे संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही जान्हवी सावंत यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)