शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : केंद्रीय वाहतूकमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 13:45 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. तसेच इतर कामही योग्यप्रकारे सुरू असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे या महामार्ग चौपदरीकरण कामाचा दर्जा तपासणीसाठी तत्काळ पथक पाठवावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी एका पत्राद्वारे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : केंद्रीय वाहतूकमंत्र्यांना पत्रदर्जा तपासणीसाठी पथक पाठवा,राजन तेली यांची मागणी

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. तसेच इतर कामही योग्यप्रकारे सुरू असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे या महामार्ग चौपदरीकरण कामाचा दर्जा तपासणीसाठी तत्काळ पथक पाठवावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी एका पत्राद्वारे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.या पत्रात म्हटले आहे की, अनेक दशके स्वप्नात असलेले महामार्ग चौपदरीकरण काम सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते तरी अंतिम टप्प्यात आहे. याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे. अनेक अडचणींवर मात करून, वेळेत निधीची उपलब्धता करून आपल्या सरकारने हे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे खरेतर जिल्ह्यातील जनता भाजपाच्या बाजूने उभी राहण्याची ही वेळ होती.कणकवली येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आपली लाईन लेव्हल सोडून बाहेर आली होती.अजून मुख्य रस्त्यावरून वाहतूक सुरू नसली तरी बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या वाहने आणि पादचारी यांच्यासाठी ती धोकादायक होती. शहरात त्यासाठीआंदोलन झाल्यावर ठेकेदार कंपनीने त्याला फक्त तात्पुरती डागडुजी केली आहे.यासोबत जिल्ह्यातील महामार्ग कामातील भेगाळलेले काँक्रीट रस्ते, वाहून गेलेले सर्व्हिस रस्ते, तुटून पडलेली काँक्रीट गटारे, दर्जाहीन बस थांबे इत्यादी बाबींवर या पथकाने एक नजर टाकावी व कंपनीला योग्य त्या सूचना द्याव्यात, असेहीया पत्रात राजन तेली यांनी म्हटले आहे.कणकवलीच्या घटनेत दुपारची वेळ असल्याने जीवितहानी टळलीसंभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे ती मोठ्या उंचीची भिंत फुटून ३५ फूट उंचीच्या मुख्य रस्त्यासाठी केलेला मातीचा भराव सर्व्हिस रस्त्यावर आला. दुपारची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. परंतु सुमारे ३०० मीटर लांब असलेल्या या भिंतीच्या दुतर्फा सर्व्हिस रस्ता आहे आणि तो वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या संदर्भात कणकवली शहरात आंदोलन सुरू असून जनतेच्या भावनांचा उद्रेक वाढत आहे.

या आंदोलनाचा रोख कंपनीला सत्ताधारी पक्ष पाठीशी घालतो असा होत आहे. त्यामुळे त्वरित यासाठी आपण मुख्य अभियंता दर्जाच्या बांधकाम अधिकारी आणि कामाची गुणवत्ता, दर्जा तपासणी पथक पाठवून या कामाचा दर्जा तपासावा. संबंधित पुलाच्यावरून जाणारा आणि लगतचे सर्व्हिस रस्ते हे वाहतुकीस योग्य आहेत का ते तपासण्याचे आदेश द्यावेत.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग