शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

कोकण बोर्डाच्या अधिकारांवर गदा

By admin | Updated: November 27, 2015 00:15 IST

कपिल पाटील : नव्या शैक्षणिक धोरणाचा कोकणालाच मोठा फटका?

खेड : राज्य सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणांमुळे सर्वसामान्यांसह शाळेतील मुख्याध्यापक, कला, क्रीडा आणि संगीत शिक्षकांवर अनिष्ट परिणाम होणार आहे. अंध, अपंग आणि विकलांग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलतीमध्ये मोठी कपात होणार असल्याचे सांगत कोकण बोर्डाचे अधिकारही मर्यादित ठेवणार असल्याचे सुतोवाच कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी खेड येथे केले.सर्वच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवत असून, मुख्याध्यापकांसह शिक्षकांनाही नव्या शैक्षणिक धोरणांचा बागूलबुवा दाखवून घरचा रस्ता दाखवण्याचे मनसुबे राज्य सरकार रचित असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. खेड-भरणे येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या विश्रांतीगृहामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा राज्य सरकारने तयार केला असून, तो जाचक आहे तसेच विद्यार्थ्यांसह एकूणच आदर्शवत शैक्षणिक धोरण नष्ट करणारा आहे, याबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी शिक्षक मतदारसंघाचे राज्याचे अध्यक्ष अशोक बेलसरे, उपाध्यक्ष हिराजी पाटील, ध. ना. पाटील, कार्यवाह सुभाष मोरे आणि नीलेश कुंभार तसेच प्राथमिक शिक्षकांसह माध्यमिकचे शिक्षकही यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारने काढलेला हा फतवा महाराष्ट्रातील अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापकांना रस्त्यावर आणणारा असल्याचे ते म्हणाले. सरकारच्या नव्या धोरणानुसार नववी व दहावीच्या वर्गातील आवश्यक असलेला विद्यार्थ्यांचा पट ९० पेक्षा कमी झाल्यास त्या शाळेतील किंवा माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक पद रिक्त होणार आहे. या निर्णयाचा राज्यातील शेकडो मुख्याध्यापकांना फटका बसणार आहे. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त मुख्याध्यापकांना घरी बसावे लागणार आहे. याशिवाय कला, क्रीडा आणि संगीत क्षेत्रामध्ये सध्या कोकणातील अनेक विद्यार्थी चांगली कामगिरी करीत आहेत. मात्र, नव्या धोरणानुसार कला, क्रीडा आणि संगीत शिक्षकांना कायमचे घरी बसावे लागणार आहे. या शिक्षकांऐवजी बिगारी आणि बेरोजगारांना दिवसाकाठी १५० रुपये देऊन हे काम करून घेण्याची तयारी सरकारने चालवली आहे. दिवसागणिक कोकणातील मुलांमध्ये होत असलेल्या या प्रगतीचा वारू पुन्हा एकदा थांबण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. तसेच प्रत्येक शाळेत हिंदी व इंग्रजी यापुढे शिकवता येणार नाही. केवळ मातृभाषा सक्तीची करण्यात येणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दहावी व बारावीच्या परीक्षा आता शाळेतून होणार नाहीत. त्या परीक्षा बाहेरून देण्याची मुभा देण्यात येणार आहे. यामुळे कोकण बोर्डाचे अधिकार आपोआप मर्यादित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या नव्या धोरणामुळे कोकण बोर्डाच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम सुरू आहे. या नव्या धोरणामुळे कोकण बोर्डाच्या अधिकारांनाच धक्का पोहचविण्याचे काम शिक्षण खात्याकडून सुरू आहे. (प्रतिनिधी)धमकीचा आरोप : लढतच राहणारअंध, अपंग आणि विकलांगांच्या सरकारी सवलती आणि अनुदान यापुढे रद्दबातल करण्याच्या हालचाली सरकारच्या नव्या धोरणामध्ये करण्यात आल्या आहेत. या सर्वच मुद्द्यांना कोकणातील शिक्षक मतदारांचा विरोध आहे. समाजातील विविध घटाकांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधत आपण लढतच राहणार आहोत़ हा गुन्हा असेल तर तो गुन्हा आपण वारंवार करू, असे ते म्हणाले. आपण विरोध केल्याने दस्तुरखद्द शिक्षणमंत्र्यांनी आपल्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले़ भाजपचे माधव भंडारी यांनीही अशीच धमकी दिली असून, या धमकीला आपण भीक घालत नसल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. शिक्षक बेघरशासनाने नवे धोरण सुरू केल्यास शाळेतील मुख्याध्यापकांसह अन्य शिक्षकांवरही गंडांतर येणार आहे. त्यामुळे शिक्षक बेघर होणार आहेत.