शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

एटीपीमुळे महावितरणला २६ कोटींचा महसूल

By admin | Updated: November 9, 2015 23:41 IST

सहा महिन्यातील महसूल : ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

रत्नागिरी : ग्राहकांना सुट्टीच्या दिवशी तसेच २४ तास वीजबिल भरता यावे यासाठी महावितरणकडून कोकण परिमंडळांतर्गत सहा स्वयंचलित वीजबिल भरणा केंद्र (एटीपी) उभारण्यात आली आहेत. दिवसेंदिवस या एटीपी केंद्रांवरील ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. एप्रिल ते आॅक्टोबर अखेर १ लाख ९१ हजार ४४४ ग्राहकांनी एटीपी केंद्रावर वीजबिल भरले असून, त्यातून कोकण परिमंडळाला २६ कोटी ८६ लाख ३६ हजार ५०८ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.महावितणकडून रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, कणकवली, मालवण येथे एटीपी केंद्र उभारण्यात आली आहेत. मात्र, दापोली व खेड येथील एटीपी केंद्र जूनपासून बंद आहेत. ग्राहकांचा याठिकाणी अल्प प्रतिसाद लाभत असल्यामुळे ही केंद्र बंद आहेत. रत्नागिरी, चिपळूण व सिंधुदुर्ग जिल्ह््यात कणकवली, मालवण येथील एटीपी केंद्र सुरू आहेत. या चार केंद्रामध्ये रत्नागिरी केंद्रावर ग्राहकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर आहे. एप्रिलमध्ये सहा एटीपी केंद्रांवर २७ हजार १२६ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे २ कोटी ७१ लाख २० हजार ७६५ रूपयांचा महसूल मिळाला. मे मध्ये ३ हजार ४०६ ग्राहकांनी याचा लाभ घेतल्यामुळे ३ कोटी ६९ लाख ३६ हजार २१५ रूपयांचा महसूल प्राप्त झाला. जूनपासून खेड व दापोलीतील एटीपी केंद्र बंद झाले. त्यामुळे जूनमध्ये रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, मालवण या केंद्रात २३ हजार ९५८ ग्राहकांनी वीजबिल भरले. त्यातून ३ कोटी ४४ लाख ४९ हजार ४०७ रूपयांचे उत्पन्न मिळाले. जुलैमध्ये ३८ हजार ३३७ ग्राहकांनी वीजबिल भरल्याने ५ कोटी ६१ लाख ५ हजार ७०० रूपये, आॅगस्टमध्ये ३० हजार २६१ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे ४ कोटी २१ लाख २८ हजार ९१३, सप्टेंबरमध्ये ३० हजार १४५ ग्राहकांनी ४ कोटी १८ लाख ९० हजार ५७३, आॅक्टोबरमध्ये ३८ हजार ३३७ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे ५ कोटी ६६ लाख १५ हजार ७०० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.अल्प प्रतिसादाअभावी खेड व दापोलीतील एटीपी केंद्र बंद करण्यात आली तरी रत्नागिरीतील केंद्राला असलेला वाढता प्रतिसाद पाहून शहरातील खालच्या भागात अर्थात रहाटाघर येथे नवीन एटीपी केंद्र प्रस्तावित आहे. ग्राहकांना संबंधित एटीपी केंद्र केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे.(प्रतिनिधी)एप्रिल ते आॅक्टोबर अखेर १ लाख ९१ हजार ४४४ ग्राहकांनी एटीपी केंद्रावर वीजबिल भरले.महावितरणकडून रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, कणकवली, मालवण येथे एटीपी केंद्र.दापोली व खेड येथील एटीपी केंद्र जूनपासून बंद.ग्राहकांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्यामुळे केंदे्र बंद.एटीपी केंद्रग्राहकमहसूलरत्नागिरी८३२०९१२४८२४३८४चिपळूण५२०७२८७०४३१३१खेड१५६२१६९३९७०दापोली१६६११४७६३६२कणकवली३२३३०२७४२३३५१मालवण२०६१०२६१७५३१०एकूण१,९१,४४४२६,८६,३६,५०८