शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीतून जादा गाड्या

By admin | Updated: July 25, 2014 22:50 IST

२४ आॅगस्टपासून या गाड्या सोडण्यात येणार

रत्नागिरी : कोकणामध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असल्यामुळे मुंबईकरांच्या सोयीसाठी रत्नागिरी विभागाकडून ७५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २४ आॅगस्टपासून या गाड्या सोडण्यात येणार आहेत.गणेशोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावाकडे परततात. कोकण रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण आधीच फुल्ल झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सोयीसाठी रत्नागिरी विभागाने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. विभागातील नऊ आगारातून एकूण ७५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दापोली आगारातून मुंबई, बोरिवली, ठाणे, भार्इंदर, कल्याण, नालासोपारा मार्गावर सात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. खेड आगारातून बोरिवली, मुंबई, भांडुप, कल्याण, ठाणे, पुणे मार्गावर दहा जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. चिपळूण आगारातून मुंबई, स्वारगेट, पुणे, चिंचवड, बोरिवली मार्गावर आठ, तर गुहागर आगारातून मुुंबई, बोरिवली, भांडुप, परेल, ठाणे, विरार, विठ्ठलवाडी मार्गावर अकरा जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. देवरुख आगारातून बोरिवली, मुंबई, स्वारगेट मार्गावर आठ, तर रत्नागिरी आगारातून बोरिवली, मुंबई, पुणे मार्गावर पाच, लांजा आगारातून सहा जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. राजापूर आगारातून बोरिवली, नालासोपारा, मार्गावर दहा, तर मंडणगड आगारातून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, भार्इंदर, परळ मार्गावर पाच जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण रत्नागिरी विभागातून ७५ गाड्या मुंबईत सोडण्यात येणार आहेत. तेथून मुंबईकरांना घेऊन या गाड्या प्रत्येक आगारामध्ये व जवळच्या ग्रामीण भागात दाखल होणार आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आॅनलाईन आरक्षण सुविधा सुरु आहे. याशिवाय ग्रुप बुकिंगदेखील करण्यात येत आहे. येणाऱ्या गाड्यांचे नियोजन २४ ते २९ आॅगस्टपर्यंत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)