शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बेस्ट समितीचे माजी चेअरमन मोहन सावंत यांचं निधन

By admin | Updated: October 25, 2016 21:54 IST

भिरवंडे गावचे सुपूत्र आणि बेस्ट समितीचे माजी चेअरमन मोहनराव मुरारी सावंत(82) यांचे मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ह्र्दयविकाराच्या तीव्र धक्याने निधन

ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. 25 - भिरवंडे गावचे सुपूत्र आणि बेस्ट समितीचे माजी चेअरमन मोहनराव मुरारी सावंत(82) यांचे मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ह्र्दयविकाराच्या तीव्र धक्याने कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे बिनीचे शिलेदार असलेले मोहनराव मुरारी सावंत काळाच्या पडदयाआड गेले असून भिरवंडे गावावर शोककळा पसरली आहे.

मोहनराव मुरारी सावंत यांचा सुरुवातीचा जीवनप्रवास संघर्षमय होता. वयाच्या नवव्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यानंतर पोरके झालेले ते मुंबईला गेले. प्रतिकुल परिस्थितीत मिळेल ते काम त्यांनी केले. रात्र शाळेत शिक्षण घेतले. त्यादरम्यानच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात ते आले. शिवसेनेची स्थापना करताना बाळासाहेबांबरोबर जी मोजकी मंडळी होती,त्यामध्ये मोहनराव सावंत हे एक होते. आयुष्याच्या अखेर पर्यंत बाळासाहेबांवर निष्ठा असलेले ते कडवट शिवसैनिक होते.बाळासाहेब त्यांना 'कोकणचा ढाण्या वाघ' असे संबोधित असत. 1968 ते 1990 अशी तब्बल 22 वर्षे कुर्ल्यातून मुंबई महानगरपालिकेतील  ते शिवसेनेचे नगरसेवक होते. या काळात त्यांनी मुंबई बेस्ट समितीच्या चेअरमनपदापासून  अनेक पदे भूषविली. मुंबईत अनेकांना नोकऱ्या दिल्या. सढळ हस्ते मदत केली. कुर्ला भागात दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढविली. अवघ्या काही मतांच्या फरकाने ते पराभूत झाले. तरी कुर्ल्यात त्यांनी शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवले होते.ज्या भूमित आपण जन्म घेतला त्या भूमिच्या विकासासाठी त्यानी सातत्याने योगदान दिले. भिरवंडे येथील श्री रामेश्वर मंदिराच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. रामेश्वर देवालय संचालक मंडळाचे अध्यक्ष, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यानी भूषविली.माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्युनिअर कॉलेजच्या जडणघडणीत तसेच कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. दानशूरपणा हा त्यांच्या नसानसात भिनला होता. त्यामुळे त्यानी अनेकांना नेहमीच मदत केली. वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांचा उत्साह दांडगा होता. त्यांचा आदरयुक्त दरारा या वयातही कायम होता. मोहनराव सावंत यांना मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र,दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत माहिती समजताच ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, सुरेश सावंत, सुशांत नाईक यांच्यासह अनेक मान्यवर तसेच ग्रामस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे पार्थिव भिरवंडे येथील निवासस्थानी नेण्यात आले. बुधवारी सकाळी 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई,नात असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.