शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आधुनिक युगातही मालवणी भाषा टिकून

By admin | Updated: May 22, 2016 00:34 IST

सत्वशिलादेवी भोसलेंचे गौरवोद्गार : मालवणी करंडक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

सावंतवाडी : अत्याधुनिक युगात आपण मालवणी भाषा टिकवून ठेवत आहोत. मालवणी भाषेला अनेक ठिकाणी मागणी आहे. पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. तरीही मालवणी करंडक महोत्सवाच्या माध्यमातून मालवणी टिकवण्याचे खरे धाडस सर्वांनी केले. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे मत सावंतवाडीच्या राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी मांडले. ओंकार कलामंच व भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानच्यावतीने येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या मालवणी करंडक एकांकिका महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, पोलिस निरीक्षक रणजित देसाई, नाट्य अभिनेते लवराज कांबळी, डी. के. सावंत, मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर, दादा मडकईकर, अध्यक्ष अमोल टेमकर, विक्रांत सावंत, अभिमन्यू लोंढे, अरविंद शिरसाट आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजमाता सत्वशिलादेवी भोसले म्हणाल्या, मालवणी एकांकिकांच्या माध्यमातून मालवणी टिकवणे ही काळाची गरज आहे. मालवणी टिकली पाहिजे हेच मत सर्वांचे आहे. मोबाईल व इंटरनेटच्या काळात तसेच आधुनिक युगात आपली भाषा टिकली आहे. मालवणी भाषा ही अनेक माध्यमांतून देशासह देशाबाहेर गेली. याचे आम्हाला कौतुक असून, यापुढेही मालवणीसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन राजमातांनी केले. युवा वर्ग मोठ्या प्रमाणात मोबाईल, इंटरनेटचा वापर करीत असतो. अशा वेळी त्यांनी आपली मालवणी भाषा ही या माध्यमातून पुढे सरकवणे गरजेचे असल्याचे राजमाता भोसले म्हणाल्या. नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, महोत्सवाचे नाव बदलले तरी या महोत्सवाची शोभा मात्र किंचितही कमी झाली नाही. मोठ्या व्यक्तीचे आदराने नाव घेतो. विविध शहरात मोठमोठे महोत्सव होत असतात. त्यावेळी त्या नावांना विरोध होत नाही. मग आताच विरोध का, असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सावंतवाडी शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. याचे सर्व श्रेय सावंतवाडी राजघराण्याला देणेच योग्य ठरणार असून, संस्थानकाळापासूनच राजघराण्याने कलेला आश्रय दिला, असेही यावेळी नगराध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले. नाट्य अभिनेते लवराज कांबळी म्हणाले, कोकणात अनेक नटसम्राट झाले. याचे श्रेय मालवणी भाषेलाच दिले पाहिजे आणि नाट्यकलेला जाते. दशावतार नाटके ही कोकणातील कलाकरांची नाट्यशाळाच आहे, असे सांगत मालवणी भाषेला वेगळा दर्जा मिळावा यासाठी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी अभिनेते कांबळी यांनी सांगितले. तसेच अशा कार्यक्रमांना सरकारी निधी उपलब्ध व्हावा, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मालवणी करंडकची सुरूवात मालवणी गायनाने मालवणी कवी दादा मडकईकर यांनी केली. तर उपस्थितांचे स्वागत अमोल टेमकर, विक्रांत सावंत, रूजूल पाटणकर, मिलिंद कासार, निरंजन सांवत यांनी केले. आभार हसन खान यांनी मानले. मालवणी करंडकच्या निमित्ताने येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात प्रसिध्द छायाचित्रकार अनिल भिसे यांचे छायाचित्र प्रदर्शन ठेवण्यात आले असून अनेकांनी भेट देऊन त्याचे कौतुक केले. (प्रतिनिधी)