शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

मोबाईल सेवा मार्चपर्यंत सुरळीत !

By admin | Updated: February 1, 2015 00:36 IST

सुहास कांबळे : सिंधुदुर्गात मोबाईल ग्राहक पाच लाखांपर्यंत नेणार

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्रॉडबॅण्ड तसेच मोबाईल सेवा मार्च अखेरपर्यंत सुरळीत करण्यात येणार असून, मोबाईल ग्राहकसंख्या पाच लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे मत बीएसएनएलचे महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी मांडले. सावंतवाडीतील बीएसएनएल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रबंधक प्रकाश बिराजदार उपस्थित होते. कांबळे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल सेवेत मोठ्या प्रमाणात व्यत्यय आहेत. ही सेवा सुरळीत होण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी आणखी टॉवर उभारण्यात येणार असून जिल्ह्यात २५ बीटीस बसवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात लॅण्डलाईन सुविधा कमी झाल्या नाहीत. गावागावात मोबाईल रेंजचा सर्व्हे सुरू आहे. रेल्वे थांबा तसेच महामार्गावर ही रेंज कमी येत असेल तर भविष्यात काय उपाययोजना कराव्या लागतील याची चाचपणी करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्गमध्ये १६५ मोबाईल टॉवरपैकी १० टॉवर नादुरूस्त आहेत. हे टॉवर तत्काळ दुरूस्त करण्याच्या सूचनाही दिल्याचे सांगितले. ठेकेदाराच्या गाडीतून महाप्रबंधकांचा बडेजाव बीएसएनएलने निविदा काढून परवानाधारक गाड्या घेतल्या असताना बीएसएनएलच्या महाप्रबंधकांच्या दिमतीला मात्र, खासगी ठेकेदाराच्या अलिशान गाड्या असल्याची चर्चा येथील बीएसएनएलच्या कार्यालयात होती. याबाबत महाप्रबंधक सुहास कांबळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, परवानाधारक पिवळ्या नंबरच्या गाड्या घेऊन गेल्या तर पोलीस गाड्या कुठेही थांबवतात. त्यामुळे अशा गाड्या वापराव्या लागतात, अशी उत्तरे दिली. मात्र महाप्रबंधकाच्या या कृतीबाबत कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर आहे.