शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

दूरसंचारच्या मनोऱ्याने मोबाईल खणखणले, सोनुर्लीत सेवा कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 11:36 IST

अन्न, वस्त्र व निवारा या जीवनातील तीन मूलभूत गरजांमध्ये आता मोबाईल फोनची भर पडली आहे. पण फोन असूनही त्याला नेटवर्क नसेल तर त्याचा उपयोग काय? अशीच काहीशी परिस्थिती सोनुर्लीत पाहायला मिळत होती. मात्र, बीएसएनएलने उभारलेला मनोरा कार्यान्वित झाला आणि सर्वांची गरज बनलेला हातातील मोबाईल खणखणू लागला.

ठळक मुद्दे दूरसंचारच्या मनोऱ्याने मोबाईल खणखणले, सोनुर्लीत सेवा कार्यान्वित  ग्रामस्थांच्या मागणीला अखेर मूर्त रूप

सावंतवाडी : अन्न, वस्त्र व निवारा या जीवनातील तीन मूलभूत गरजांमध्ये आता मोबाईल फोनची भर पडली आहे. पण फोन असूनही त्याला नेटवर्क नसेल तर त्याचा उपयोग काय? अशीच काहीशी परिस्थिती सोनुर्लीत पाहायला मिळत होती. मात्र, बीएसएनएलने उभारलेला मनोरा कार्यान्वित झाला आणि सर्वांची गरज बनलेला हातातील मोबाईल खणखणू लागला.तालुक्यातील सोनुर्ली गाव हा श्री देवी माऊलीच्या लोंटागणाच्या जत्रेने प्रसिध्द आहे. याच जत्रेने राज्याच्या पाठीवर सोनुर्लीची ओळख निर्माण केली आहे. मात्र, सर्वत्र मोबाईल नेटवर्कच जाळे विणले असताना सोनुर्ली गाव मात्र त्याला अपवाद होता. गावात कुठल्याच कंपनीचे चांगले नेटवर्क नसल्याने मोबाईल फोन एक प्रकारे खेळणे ठरले होते. कधीतरी वाऱ्याची झुळूक यावी, तसे नेटवर्क आले आणि हातातील मोबाईल वाजला तर वाजला! त्यामुळे ग्रामस्थ गावात मोबाईल मनोरा उभा रहावा, या मागणीसाठी नेहमी आग्रही होते.आताच्या संगणक युगात हातातील मोबाईल इंटरनेटवरच बरीचशी कामे होतात युवाई यात अग्रेसर असते. शासकीय कामासोबत खासगी कामे इंटरनेटव्दारे झपाझप होत आहेत. त्यामुळे नेटवर्क नाही, तर इंटरनेट नाही, अशीच अवस्था सोनुर्लीवासीयांची झाली होती.दरम्यान, बीएसएनएलच्या माध्यमातून सोनुर्लीत अलिकडेच मनोरा उभारण्यात आला होता. मनोऱ्याचे काम युध्दपातळीवर करुन हा मनोरा गेले कित्येक दिवस सुरु करण्याच्या तयारीत होता. मात्र, नेमका मुहूर्त अधिकाऱ्यांना सापडत नव्हता. त्यामुळे वैतागलेल्या गावातील युवकांनी  संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात जात जाब विचारला व आजच्या आज मनोरा कार्यान्वित करण्याचा इशारा दिला.

त्यामुळे खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी सायंकाळपासून हा मनोरा सुरु केला.मनोरा सुरु होताच गावात मोबाईल फोन खणखणू लागले. त्याचबरोबर थ्रीजी इंटरनेट सेवाही मिळू लागल्याने खेळणे बनलेला मोबाईल फोन तत्काळ सर्वांचा महत्त्वाचा विषय बनला.टॉवरची क्षमता केवळ एक किलोमीटरसोनुर्लीत उभारण्यात आलेला हा मनोरा गावच्या एका टोकाला आहे. असे असले तरी या मनोऱ्यांची क्षमता साडेतीन किलोमीटरपर्यंत असणार, असे बीएसएनएलनकडून सांगण्यात आले होते.

मात्र, यासंदर्भात संबंधित मोबाईल विभागाच्या व्ही. व्ही. सूर्यवंशी यांच्याकडून माहिती घेतली असता, टॉवरची क्षमता एक किलोमीटरच आहे आणि तो पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आला असून, एक किलोमीटरच्या आतच त्याचा चांगला फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :MobileमोबाइलBSNLबीएसएनएलsindhudurgसिंधुदुर्ग