शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

कोकणच्या विकासाचे मंत्र्यांनी नियोजन करावे

By admin | Updated: January 15, 2015 23:24 IST

मागणी : कोकण विकास आघाडीचे निवेदन

कणकवली : एसटी वाहतुकीचे खासगीकरण करू नये, राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या कोकणातील पश्चिम किनारी सागरी महामार्गाचे काम सर्व पुलांसह पूर्ण करावे, या कोकण विकास आघाडीच्या आठ कलमी कार्यक्रमानुसार केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणच्या विकासाचे नियोजन करावे, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास आघाडीचे सिंधुदुर्ग संघटक गणपत चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले.चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना मृत्यूचा सापळा ठरलेल्या कशेडी घाटाऐवजी खेडजवळ दिवाणखवटी येथे बोगदा खोदावा, कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, कोकण किनाऱ्यावर बोट वाहतूक सुरू करावी, पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून पाणी साठवणूक करावी, कोकणातील लघु उद्योजकांच्या समस्या दूर कराव्यात, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव द्यावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक संस्था फेडरेशन आणि गोपुरी आश्रमाच्यावतीने आयोजित जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या मेळाव्यात हे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना देण्यात आले. या निवेदनासोबत कोकण विकास आघाडीच्या ३६व्या वर्धापन दिनानिमित्त मंजूर करण्यात आलेल्या विकासांच्या आठ कलमी कार्यक्रमाच्या ठरावाची प्रत या निवेदनासोबत देण्यात आली आहे. सामाजिक संस्थांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या प्रभू यांच्या वक्तृत्वामुळे या निवेदनाबाबत सकारात्मक पावले नक्कीच उचलतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)