शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

लोकसभा नाही, विधानसभाच लढवणार; दीपक केसरकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:49 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत अपप्रचार केल्याचा दावा

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले, ते खरे नाही. आम्ही काही ग्रामपंचायत या युतीमधून लढवल्या होत्या. त्यामुळे एकही ग्रामपंचायत नाही म्हणणे चुकीचे आहे. मी आमदारकी सोडून खासदारकी लढविणार, असा ही प्रचार केला; पण काहींच्या मनातील हा गोड गैरसमज दूर होण्यासाठीच मी २०२४ची विधानसभाच लढविणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मतदारसंघातील बरीच विकासकामे पूर्ण झाल्याचा दावाही केला.यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, राज्याच्या शिक्षण विभागात केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात बदल होत आहेत. त्यामुळे शिक्षणामध्ये महाराष्ट्र राज्य पुढच्या वर्षी एक नंबरवर असणार आहे. राज्य सरकारकडून लाखांहून अधिक जास्त सरकारी नोकर भरती करण्यात आली. तर राज्यात ६१ हजार शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणल्याचे त्यांनी सांगितले. 

गैरसमज दूर करण्यासाठी आमदारकीच लढवणारमी आमदारकी नाही तर खासदारकी लढवणार, असा प्रचारही काहींकडून करण्यात येत आहे. मात्र, काहींच्या मनातील हा गैरसमज दूर करण्यासाठी मी २०२४ मध्ये आमदारकीच लढवणार आहे. शिवाय पक्षाकडून खासदारकीसाठी या मतदारसंघातून जो कोणी उमेदवार असेल त्याला ५० हजारांचे लीड मिळून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘त्या’ निवृत्त शिक्षकांना मानधन मिळणारविद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये, म्हणून राज्यातील शाळांमध्ये नेमण्यात आलेल्या निवृत्त शिक्षकांना अद्यापही मानधन मिळाले नसल्याबाबत मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले असता, निवृत्त शिक्षकांना तत्काळ मानधन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजबांधवांना टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारमध्ये कोणताही मतभेद नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांशी चर्चा करूनच काही निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. मराठा समाजबांधवांना आरक्षण देताना ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणारे असावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी मराठा बांधवांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारला डाटा मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. सावंतवाडी मतदारसंघांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले. आम्ही गाव पॅनल म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो तर खानोली व मातोंड या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढवण्यात आली. त्यामुळे काही ग्रामपंचायत नाही, असा प्रचार करणे चुकीचे आहे. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर