शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

लोकसभा नाही, विधानसभाच लढवणार; दीपक केसरकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:49 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत अपप्रचार केल्याचा दावा

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले, ते खरे नाही. आम्ही काही ग्रामपंचायत या युतीमधून लढवल्या होत्या. त्यामुळे एकही ग्रामपंचायत नाही म्हणणे चुकीचे आहे. मी आमदारकी सोडून खासदारकी लढविणार, असा ही प्रचार केला; पण काहींच्या मनातील हा गोड गैरसमज दूर होण्यासाठीच मी २०२४ची विधानसभाच लढविणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मतदारसंघातील बरीच विकासकामे पूर्ण झाल्याचा दावाही केला.यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, राज्याच्या शिक्षण विभागात केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात बदल होत आहेत. त्यामुळे शिक्षणामध्ये महाराष्ट्र राज्य पुढच्या वर्षी एक नंबरवर असणार आहे. राज्य सरकारकडून लाखांहून अधिक जास्त सरकारी नोकर भरती करण्यात आली. तर राज्यात ६१ हजार शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणल्याचे त्यांनी सांगितले. 

गैरसमज दूर करण्यासाठी आमदारकीच लढवणारमी आमदारकी नाही तर खासदारकी लढवणार, असा प्रचारही काहींकडून करण्यात येत आहे. मात्र, काहींच्या मनातील हा गैरसमज दूर करण्यासाठी मी २०२४ मध्ये आमदारकीच लढवणार आहे. शिवाय पक्षाकडून खासदारकीसाठी या मतदारसंघातून जो कोणी उमेदवार असेल त्याला ५० हजारांचे लीड मिळून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘त्या’ निवृत्त शिक्षकांना मानधन मिळणारविद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये, म्हणून राज्यातील शाळांमध्ये नेमण्यात आलेल्या निवृत्त शिक्षकांना अद्यापही मानधन मिळाले नसल्याबाबत मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले असता, निवृत्त शिक्षकांना तत्काळ मानधन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजबांधवांना टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारमध्ये कोणताही मतभेद नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांशी चर्चा करूनच काही निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. मराठा समाजबांधवांना आरक्षण देताना ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणारे असावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी मराठा बांधवांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारला डाटा मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. सावंतवाडी मतदारसंघांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले. आम्ही गाव पॅनल म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो तर खानोली व मातोंड या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढवण्यात आली. त्यामुळे काही ग्रामपंचायत नाही, असा प्रचार करणे चुकीचे आहे. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर