शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

खनिकर्मला ७ कोटीचा महसूल

By admin | Updated: January 23, 2015 00:47 IST

गौणखनिज उत्खनन बंदी : वाळूचे लिलाव रखडल्याने उद्दिष्टपूर्तीवर परिणाम

रत्नागिरी : गौणखनिज उत्खनन बंदीचा फटका जिल्ह्याच्या महसुलावर झाला आहे. जिल्ह्यातील गौणखनिज वसुलीपोटी शासनाच्या २२ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी केवळ ७ कोटी ८४ लाख (३५.६४ टक्के) एवढीच वसुली झाली आहे. मात्र, खेड तहसील कार्यालयाने उद्दिष्टापेक्षा अधिक मजल मारत १ कोटी ३२ लाख ८१ हजार एवढी (१३३ टक्के) वसुली केली आहे. त्याखालोखाल राजापूरने (७५.३८ टक्के) वसुली केली आहे. चालू आर्थिक वर्षात गौणखनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज शुल्क व भुपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्याला २२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, खेड आणि दापोली उपविभागीय कार्यालयाने डिसेंबरअखेर आपल्या उद्दिष्टांपैकी अनुक्रमे ७७ आणि ५२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. उर्वरित तालुक्यांची वसुली कमी झाली आहे. राजापूर उपविभागीय कार्यालयाची तर केवळ ४.६५ टक्के इतकीच वसुली झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला ६ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत ६५ लाख ९३ हजार रुपये (१०.९९ टक्के) एवढीच वसुली झाली आहे. डिसेंबर २०१४पर्यंत केलेल्या या वसुलीत खेड तहसील कार्यालयाने अव्वल स्थान राखले आहे. सर्वांत कमी वसुली राजापूर तालुक्यातून झाली आहे. डिसेंबर महिन्यात मात्र सर्वच तालुक्यांनी जोर लावलेला दिसून येतो. या एकाच महिन्यात १ कोटी २२ लाख ६९ हजार इतकी वसुली झाली आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांमधील गौणखनिज उत्खननावरील बंदी आधीच उठविण्यात आली आहे. उर्वरित लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या तालुक्यांवरील बंदीही डिसेंबरमध्ये उठविण्यात आली आहे. मात्र, त्याचा परिणामही या विभागाच्या उद्दिष्टपूर्तीवर झाला आहे. वाळूवरील बंदीही २०११ सालापासून कायम आहे. त्यामुळे त्याचे लिलावही थांबले आहेत. परिणामी जिल्हा प्रशासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. यंदाही वाळूचा लिलाव न झाल्याने महसूल कमी मिळाला आहे.असे असले तरी खेड तालुक्याने उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल मिळवला आहे. त्याखालोखाल राजापूर तालुक्यानेही क्रमांक पटकावला आहे. त्यामानाने उर्वरित तालुक्यांमध्ये खनिकर्म विभागाला कमी महसूल प्राप्त झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. (प्रतिनिधी)२२ कोटींचे उद्दीष्ट--खेडमध्ये उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली.लांजा, गुहागर, रत्नागिरी, मंडणगडची वसुलीही कमी.आर्थिक वर्षात गौणखनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज फी व भूपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्याला २२ कोटींचे उद्दिष्ट. दापोली उपविभागीय कार्यालयाने डिसेंबरअखेर अनुक्रमे ७७ आणि ५२ टक्के केली उद्दिष्टपूर्ती.डिसेंबरअखेर केलेली वसुलीउपविभागउद्दिष्टवसुलीखेड१ कोटी७७,०१,०००रत्नागिरीदीड कोटी२४,८२,०००चिपळूणदीड कोटी३५,६८,०००दापोलीदीड कोटी७७,३५,०००राजापूरदीड कोटी६,९७,०००तहसील स्तरमंडणगड१ कोटी२३,५०,०००दापोली१ कोटी३९,९५,०००खेड१ कोटी१,३२,८१,०००चिपळूण१ कोटी४६,५५,०००संगमेश्वर१ कोटी३८,७९,०००गुहागर१ कोटी२०,८३,०००रत्नागिरी१ कोटी२७,६२,०००राजापूर१ कोटी७५,३८,०००लांजा१ कोटी९०,९५,०००जिल्हाधिकारी ६ कोटी६५,९३,०००कार्यालयएकूण२२ कोटी ७,८४,१३,०००