शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

गडसंवर्धनासाठी कॅबिनेटची बैठक रायगडावर व्हावी

By admin | Updated: March 27, 2017 17:06 IST

संभाजीराजे छत्रपती : पर्यटनवाढीसाठी ‘सी-टूरिझम’ प्रकल्प राबविणार

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : गड-किल्ल्यांची पर्यटनाला जोड दिल्याशिवाय महाराष्ट्रातील किल्ल्यांचा विकास होणार नाही. पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सी-टूरिझम’ योजनेंतर्गत सहा जलदुर्गांचा समावेश करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील किल्ले व गडांचे संवर्धन करण्यासाठी तसेच वारसास्थळांचे जतन करण्यासाठी राज्याच्या कॅबिनेटची बैठक रायगडावर घेण्यात यावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली.राज्यातील गड-किल्ले प्रथम पर्यटनाला जोडावेत हा माझा प्रथमपासून अजेंडा असल्याचे सांगून खासदार संभाजीराजे म्हणाले, रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव झाल्यामुळे हा सोहळा संपूर्ण देशभरात गणला गेला. त्यातूनच मला राज्यसभेवर खासदारपदी सन्मानित केले. रायगडचे जतन आणि विकास कामासाठी पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे ६०० कोटी रुपये मंजूर केले. त्यापैकी २०० कोटी हे रस्त्यावर तर उर्वरित ४०० कोटी रुपये गडसंवर्धन व परिसरातील वाड्या-वस्त्या सुधारण्यावर खर्च करण्यात येणार आहेत पण शासनाकडे मंजूर झालेल्या आराखड्यात बदल होण्याची आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यात रायगडप्रमाणेच पाच ‘मॉडेल फोर्ट’ करावेत, अशी माझी मागणी आहे. यापैकी सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी निधी मंजूर झाला असून आणखी तीन किल्ल्यांचा आराखडा तयार करून विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू, असेही खासदार संभाजीराजे म्हणाले.‘सी-टूरिझम’ राबविणारराज्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी किल्ल्यांची जोड देणे आवश्यक आहे. राज्यात ‘सी-टूरिझम’ योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी खांदेरी, उंदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, मुरूडा, जंजिरा हे किल्ले जलमार्गाने एकत्रित जोडण्यात येणार आहेत. या सर्व किल्ल्यांसाठी बंदरची मागणी शासनाकडे केली आहे तर उंदेरी आणि पद्मदुर्ग या दोन किल्ल्यांवर बंदरला परवानगी शासनाने दिली आहे. शासनाने आपली निवड केलेल्या ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ या पदाचा त्यासाठी फायदा झाला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याची आणखी दिव्यताराजगडवर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिवर्षी दिमाखात होतो, तो सोहळा आणखी दिमाखदार पद्धतीने कसा होईल यावर आगामी काळात मी भर देणार आहे. महाराष्ट्रातील वारसास्थळांचे तसेच इतिहासातील गड व किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी वारसास्थळ जतन धोरण आखणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या कॅबिनेटची बैठक रायगडावर घेण्याची माझी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. स्वच्छ कोल्हापूर, स्वच्छ पंचगंगास्वच्छ कोल्हापूर आणि स्वच्छ पंचगंगा नदी हे दोन ‘ड्रीम प्रकल्प’ माझ्याकडे आहेत, त्यासाठी ‘नमामी पंचगंगा’ असा प्रकल्प राबिण्याचा आपला मानस आहे. आपल्या वाढदिवसापासून या मोहिमेचा प्रारंभ केला असून राज्यातील सुमारे १०३ किल्ल्यावर एकाचवेळी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली, त्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.शाहू मिल रोजगाराचे केंद्र बनावेकोल्हापूरची अस्मिता असणारे छत्रपती शाहू मिल हे स्मारक करण्यासाठी राज्य शासनाने घोषणा केली होती; पण येथे पुतळे उभारून स्मारक करण्यापेक्षा तेथे गारमेंट अगर इतर प्रकल्प आणून कामगारांच्या रोजगाराच्या माध्यमातून हे जिवंत स्मारक बनावे अशीही अपेक्षा खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त करून यासाठीही आपण लवकरच पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.ज्येष्ठ, श्रेष्ठ नंतर, प्रथम एकत्र विकासकोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी माझी आणि धनंजय महाडिक व राजू शेट्टी यांचीशी चर्चा होऊन एकत्र काम करण्याची तिघांनीही तयारी दर्शविली आहे. त्यामध्ये ज्येष्ठ, श्रेष्ठ कोण हे नंतर पाहू प्रथम जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र पाठपुरावा करण्याचीही तयारी दर्शविली आहे, असेही खासदार संभाजीराजे म्हणाले.