शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

रत्नागिरीत होणार वैद्यकीय महाविद्यालय

By admin | Updated: July 21, 2014 23:41 IST

जितेंद्र आव्हाड : २९ जुलै रोजी संबंधितांची बैठक

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालय व दोन खासगी रुग्णालयांची मिळून ५०० खाटांची संख्या पूर्ण होत असल्याने रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्राथमिक निर्णय झाला आहे. याबाबत येत्या २९ जुलै २०१४ला सर्व संबंधितांची बैठक आपण मुंबईत घेणार असून, त्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादनमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला पालकमंत्री तथा नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., डॉ. रमेश चव्हाण, डॉ. अलिमियॉँ परकार व डॉ. संजीव पावसकर उपस्थित होते. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, आता आघाडी सरकारच्या या सत्तेतील अवघे दोन ते तीन महिनेच बाकी राहिले आहेत, असे असताना हा निर्णय घेतल्यास त्याची पुढील सरकारकडून पूर्तता होईल काय, या पत्रकारांच्या प्रश्नावर आव्हाड म्हणाले की, सरकारचा निर्णय पुढील सरकार बदलत नाही. आमचेच सरकार येणार याची खात्री बाळगा. जून २०१५ मध्ये हे महाविद्यालय रत्नागिरीत सुरू होणे शक्य आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी २५ एकर जमिनीची अट आहे; परंतु डोंगरी जिल्हा म्हणून रत्नागिरीला १० एकर जागाही चालेल. अर्थात २५ एकर जागेचीही येथे उपलब्धता आहे. ५०० खाटांची दुुसरी अटही जिल्हा रुग्णालय, परकार व चिरायू हॉस्पिटल यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. पूर्ण वैद्यकीय महाविद्यालय उभारायला वेळ लागेल. त्यामुळे प्रथम खासगी रुग्णालयांच्या मदतीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे सोपे ठरेल. त्याबाबत चिरायुचे डॉ. चव्हाण व परकार हॉस्पिटलचे डॉ. परकार यांच्याशी आपण चर्चा केली असून, त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे, असे सांगत आव्हाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)जितेंद्र आव्हाड म्हणाले.....- नरेंद्र मोदींनी केलेल्या मार्केटिंगचे कौतुक करायला हवे. नसलेल्या गोष्टींचेही चांगले मार्केटिंग केले. त्याचे परिणाम महागाईच्या रूपाने जनतेला भोेगावे लागत आहेत. - विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसने राष्ट्रवादीला सन्मानाने वाढीव जागा द्याव्यात.- दीपक केसरकरांची मी सावंतवाडीच्या चौकात पाया पडून माफी मागेन..- फलोत्पादनाबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या धोरणाचे चांगले परिणाम राज्यात दिसत आहेत.भांडणे मिटवा...आंबा नुकसान भरपाईचे ५३ कोटी परत जाणार होते; परंतु ते थांबविले. त्यामुळे येथील भावा-भावांतील भांडणे मिटवावीत. हे पैसे ज्यांचे नुकसान झाले, त्यांच्या घरांत जावेत, हा सरकारचा प्रामाणिक हेतू आहे.