शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत विजयाचे गणित अवघड

By admin | Updated: October 6, 2014 22:38 IST

पायाखालची सरकली वाळू : मतांचे ‘वेट’ कोणाच्या पदरात पडणार, याबाबत अनिश्चितताच

प्रकाश वराडकर --रत्नागिरी --विधानसभा मतदारसंघात मुख्य निवडणूक दुरंगीच होणार असल्याचे सुरुवातीचे चित्र आता ‘चौरंगी’ बनले आहे. या मतदारसंघात प्रमुख पक्षांचे चार उमेदवार रिंगणात आहेत. चौघांनीही मतदारांना आपल्याकडेच खेचण्यासाठी ‘नेट’ लावल्याने मतांचे ‘वेट’ कोणाच्या पदरात पडणार, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. विजयाचे गणित अवघड बनले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन टर्ममध्ये राष्ट्रवादीतून निवडून आलेले व वर्षभर मंत्री म्हणून काम केलेले उदय सामंत शिवसेनेत प्रवेश करून तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत, तर त्यांच्याच विरोधात दोन वेळा पराभूत झालेले भाजपाचे सुरेंद्र तथा बाळ माने हेसुध्दा तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उदय सामंत यांचे पारडे जड होते, तर त्यांना तूल्यबळ म्हणून भाजपाचे बाळ माने यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र, प्रचाराचा अखेरचा टप्पा सुरू झाल्यानंतर हे चित्र बदलले असून चौरंगी बनले आहे. गद्दारांना धडा शिकवा, अशी हाळी देत राष्ट्रवादीने येथून मुस्लिम समाजाचे नेते बशीर मुर्तुझा यांना उमेदवारी दिली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांच्या बाजूने फारसा जोर दिसत नव्हता. मात्र, आता राष्ट्रवादीनेही सेनेत गेलेल्या सामंत यांची राजकीय कोंडी करण्यासाठी ‘डावपेच’ आखले आहेत. मतदारसंघातील राष्ट्रवादीची पडझड थोपवून मुर्तुझा यांना पक्षाची ७० ते ७५ टक्के मते मिळविण्यासाठी जोरदार व्यूहरचना केली जात आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडूनही त्यांना डावपेचांचे मार्गदर्शन होत आहे. कॉँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनीही आपली मते वाढविण्याचे नियोजनबध्द प्रयत्न सुरू केल्याने त्याचा फटका कोणाला, बसणार याची चर्चा सुरू झाली आहे. मतदारसंघातील पक्षाची परंपरागत मते अन्यत्र जाऊ नयेत, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या भंडारी समाजातर्फे तालुका भंडारी समाज संघानेही भंडारी समाजाचा व बहुजन समाजातील उमेदवार कॉँग्रेस पक्षाने दिल्याने पत्रकारपरिषद घेऊन कीर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बहुजन समाजानेही कीर यांना मतदान करून बहुजन समाजाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन केले आहे. त्याचा परिणाम किती होतो, यावरही मतांचे गणित अवलंबून राहणार आहे. भाजपाचे बाळ माने यांच्या प्रचारासाठी संघाचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. त्यांच्या मिऱ्या गावात ग्रामस्थांनी पूर्णत: बाळ माने यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने तेथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचीही पंचाईत झाली आहे. ५ हजार कामगार असलेली व बंद पडलेली भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरू करण्याचे वचन माने यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या बळावर दिले असून, गडकरींनीही तसा शब्द दिला आहे. त्यामुळे या कंपनीचे बेरोजगार कामगार व त्यांचे परिवार मानेंच्या बाजूने राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील नाराजीला फुंकर घालत भाजपाला लाभ करून घेण्याचाही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या सर्व स्थितीचा सामना करण्यास शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत हे सज्ज झाले असून, तालुक्यात शिवसेना बळकट असल्याचा पुरेपूर उपयोग कसा करावा, यासाठीची रणनीती त्यांनी आखून त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे. नेत्यांची नाराजी दूर करण्यात त्यांना यश आले असले तरी कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवणे त्यांच्यासाठी काहीसे कठीण जात असल्याची चर्चा सेनेच्या गोटात आहे. या संपूर्ण स्थितीत मतांची विभागणी चार पक्षांमध्ये होणार हे अटळ आहे. त्यातच अपक्ष व अन्य काही पक्षांचे उमेदवार हजारो मते खाणार हे निश्चित आहे. यामुळेच निवडून नक्की कोण येणार, याबाबत अनिश्चितता असून, सर्वच पक्षात अस्वस्थतेचे वातावरण आहे. गोबेल्स नीतीचा वापर!प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आपलाच उमेदवार जिंकणार असा दावा करीत आहेत. तर काहीजणांकडून ‘खोटे बोला पण ठासून बोला’, याप्रमाणे गोबेल्स नीतीचा वापर होताना दिसून येत आहे. त्यामुळे मतदारराजा गोबेल्स नीतीला भाळणार की, योग्य उमेदवार निवडीची आपली नीती वापरणार, यावर विजयाचे गणित सुटणार आहे. कार्यकर्ते असूनही....!कार्यकर्ते असूनही प्रचाराला कोणी नाही, अशी स्थिती काही उमेदवारांबाबत निर्माण झाली असून, त्यांना खाडीपट्टा येथून व मुंबईतून प्रचारासाठी कार्यकर्ते बोलावण्याची वेळ आल्याचीही चर्चा सुरू आहे. मुंबईतील कार्यकर्तेही येत्या चार दिवसांत प्रचारासाठी रत्नागिरीत दाखल होणार असल्याचा बोलबाला आहे.