शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

शस्त्रक्रियेवेळी विवाहितेचा मृत्यू

By admin | Updated: January 29, 2015 00:18 IST

डॉक्टरांना घेराव : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील घटना; इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी

कणकवली : गर्भपिशवीची गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान कसाल-धनगरवाडी येथील जयश्री राजेंद्र शिंगाडे (वय ४०) या विवाहितेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत डॉक्टरांना घेराव घालून इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी नातेवाईकांनी केली. तसेच शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी पैसे घेतल्याचे यावेळी पुन्हा एकदा उघडकीस आले. रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यास घेण्यास नकार देत रुग्णालयासमोर ठिय्या मांडला होता.जयश्री शिंगाडे यांची दहा वर्षांपूर्वी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाली होती. गेले वर्षभर त्यांच्या पोटात दुखत असल्याने २१ जानेवारीला त्यांची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफीनंतर गर्भपिशवीला गाठ झाली असून, ती काढण्याचा सल्ला जिल्हा रुग्णालयात देण्यात आला. मात्र, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर पाटील यांनी पगार झाला नसल्याचे सांगत शिंगाडे यांची शस्त्रक्रिया करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिंगाडे कुटुंबीयांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांच्याकडून शस्त्रक्रिया करून घेण्याचे ठरविले. त्यामुळे मंगळवारी दुपारी जयश्री शिंगाडे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी १० वाजता शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. भूलतज्ज्ञ पराग नायगावकर यांनी भूल दिली. गाठ काढून डॉक्टर सोडल यांनी शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याचे सांगितले. मात्र, पुन्हा टाके घालून शिवण्याची प्रक्रिया सुरू असताना शिंगाडे यांचे हृदय बंद पडले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर काही वेळाने हृदय काम करू लागले आणि पुन्हा पंधरा मिनिटांनी हृदय बंद पडले. त्यातच जयश्री शिंगाडे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी ही माहिती दिल्यानंतर नातेवाइकांना शोक अनावर झाला. तसेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच जयश्री यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे, उपनिरीक्षक मोटे यांच्यासह कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कसाल येथील ग्रामस्थांसह युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप मेस्त्री, नगरसेवक कन्हैया पारकर, आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टरांना घेराओ घातला. उपजिल्हा रुग्णालयातून सोनोग्राफी आणि सीटी स्कॅनसाठी जे रुग्ण बाहेर पाठवले जातात, त्यामागे कमिशन घेतले जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला. भूलतज्ज्ञांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे इनकॅमेरा शवविच्छेदन व्हावे; अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. भूलतज्ज्ञ नायगावकर यांनी कमरेखालच्या भागात भूल दिली होती. त्यामुळे हृदय बंंद पडण्याची शक्यता नाही, असे स्पष्टीकरण दिले. भूल जास्त झाल्यासही हृदयक्रिया बंद पडू शकते, असे अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांनी सांगितले. भूलतज्ज्ञ डॉ. पराग नायगावकर यांचा रक्तनमुना घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार रक्तनमुना तपासणीसाठी घेण्यात आला. (प्रतिनिधी)सोडल यांनी पैसे घेतलेशस्त्रक्रियेसाठी डॉ. सोडल यांनी रुग्णाच्या नातेवाइकांकडून सात हजार रुपये घेतले. याची कबुली डॉ. सोडल यांनी यावेळी दिली. डॉ. सोडल यांची ‘एनआरएचएम’अंतर्गत ओरोस येथे नियुक्ती असून, उपजिल्हा रुग्णालयात एक दिवस आड त्यांना कणकवलीत बोलवले जाते, असे अधीक्षक डॉ. जाधव यांनी सांगितले. शल्यचिकित्सकांची भेटया घटनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी जिल्हा शल्यचिकित्सक आर. डी. माने यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत डॉ. सोडल यांनी पैसे घेतल्याचे अधीक्षक डॉ. जाधव यांच्याकडून लिहून घेण्यात आले. काही वेळाने जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनीही भेट देऊन माहिती घेतली.