शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
3
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
4
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
5
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
6
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
7
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
8
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
9
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
10
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
11
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
12
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
14
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
15
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
16
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
17
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
18
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
19
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
20
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS

समुद्री उद्योग, सर्र्व्हिस इंडस्ट्रीला चालना

By admin | Updated: November 25, 2015 23:25 IST

रवींद्र वायकर : सांगुळवाडी येथील शैक्षणिक संकुलाच्या वास्तूचे उद्घाटन

वैभववाडी : कोकणात भरपूर काही करण्याची संधी असतानाही दूरदृष्टी नसलेल्या येथील राजकारण्यांनी कोणत्याच सुखसोयी न देता कोकणी माणसाला करपवून टाकले. मात्र, येथील साधनसंपत्तीच्या आधारे आमचे सरकार येताच कोकणाला हवे ते देण्याचा प्रयत्न आम्ही सुरु केला आहे. कोकणातील समुद्र किनारपट्टी विकसित करुन पर्यटनाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला उर्जितावस्थेत आणण्यासाठी समुद्री उद्योगांना चालना देणारे शिक्षण आणि सर्व्हिस इंडस्ट्री सुरु करण्याची गरज आहे. त्याही दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगुळवाडी येथे केले. श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाच्या सांगुळवाडी येथील नूतन शैक्षणिक वास्तूचे उदघाटन मंत्री वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे परभणीचे आमदार तथा संस्थाध्यक्ष डॉ. राहूल पाटील, तहसीलदार जी. आर. गावीत, गटविकास अधिकारी सदानंद पाटील, मुंबईचे शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र राऊत, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तिकर, बाळाभाई कदम, पवन जाधव, सूरज चव्हाण, तालुकाप्रमुख अशोक रावराणे, नगरसेवक बाळा नर, संचालक संदीप पाटील, सरपंच प्रकाश रावराणे, सुधाकर येवले, आदी उपस्थित होते. मंत्री वायकर पुढे म्हणाले की, राज्याच्या विधिमंडळात आतापर्यंत कोकणातील फक्त नुकसान भरपाईच चर्चा व्हायची! येथे आवश्यक सोयी सुविधांची चर्चाच होत नव्हती, याचीच खंत वाटते. गरज असूनसुद्धा मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आधीचे सत्ताधारी करु शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे विकासाच्या दृष्टीचा अभाव होता. विस्तीर्ण समुद्र किनारे असुनही ते विकसित करुन आवश्यक सुविधा निर्माण न केल्यामुळे कोकणात अपेक्षेप्रमाणे पर्यटक येत नाहीत, अशी टीका करीत समुद्री उद्योगांना चालना देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. दबलेल्या, राजकारण्यांनी करपवून टाकलेल्या कोकणातील लोकांना दिशा देण्यासाठी प्रगत शिक्षणाची गरज होती. ती आमदार डॉ. राहूल पाटील यांनी पूर्ण केली आहे, असे गौरवोद्गार काढत त्यांच्या संस्थेला आवश्यक ते सहकार्य आम्ही करु, असे आश्वासन मंत्री वायकर यांनी यावेळी दिले. आमदार डॉ. राहूल पाटील म्हणाले, आमच्या सरकारने स्मार्ट सीटी योजना आणली आहे. परंतु व्हिलेज स्मार्ट होत नाहीत, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. शेवटच्या घरात शिक्षणरुपी वाघिणीचे दुध पोहचविण्याच्या उद्देशाने आपण कोकणात आलो. तंत्रशिक्षण आणि रोजगार आधी ग्रामीण भागात पोचविण्याची गरज आहे. समांतर विकास साधायचा असेल तर खेड्यापाड्यात अशा संस्था निर्माण होण्याची अत्यंत गरज आहे. (प्रतिनिधी)इथल्यांनी हॉटेल्स काढली : त्यामुळेच प्रगती खुंटली४परभणीतून कोकणात येऊन शिक्षणाचा अंकुर रुजविण्याचे कार्य आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केले आहे. हे करायला सिंहाचे काळीज लागते. आमच्या इथल्या राजकारण्यांनी मात्र, कोकणातील गरजांकडे दुर्लक्ष करून जमीनी घेऊन आपली हॉटेल्स काढली. त्यामुळेच कोकणी माणसाची प्रगती खुंटली, अशी टीका करीत आमदार डॉ. राहूल पाटील यांनी आपले कोकणातील शैक्षणिक काम असेच अखंडपणे सुरू ठेवावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणणार : राहूल पाटील४आपण पंधरा वर्षांपूर्वी इथे आलो तेव्हा या गावात एसटी सुद्धा येत नव्हती. आता या शिक्षण संकुलात विविध अभ्यासक्रमांचे एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोकणातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे यासाठी येत्या दोन वर्षात येथे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आपण आणणार आहोत, अशी घोषणा संस्थाध्यक्ष आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केली.