शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सरकारच्या कामगार धोरणाविरोधात २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा, भारतीय मजदूर संघातर्फे आयोजन

By सुधीर राणे | Updated: November 14, 2022 14:24 IST

कणकवली: सरकारच्या कामगार धोरणाविरोधात भारतीय मजदूर संघातर्फे २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात राज्यातील १ ...

कणकवली: सरकारच्या कामगार धोरणाविरोधात भारतीय मजदूर संघातर्फे २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात राज्यातील १ लाखांहून अधिक कामगार सहभागी होणार आहेत. सरकारला कामगारांच्या प्रश्न व समस्यांबाबत संवदेनशीलपणे लक्ष घालण्यास भाग पाडण्यासाठी, कामगारामध्ये जागरुकता निर्माण करणे हा मजदूर चेतना यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अनिल दुमणे यांनी सांगितले.कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी बापू दडस, कोकण प्रांताचे संघटक हरि चव्हाण, संघाचे कार्याध्यक्ष भगवान साटम, विकास गुरव आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना दुमणे म्हणाले, महाराष्ट्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने हा महामोर्चा काढण्यात येणार आहे . यानिमिताने मजदूर संघाशी संलग्न कामगार व कार्यकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी ६ ते १७ नोव्हेंबर या १२ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मजदूर चेतना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरी किल्ल्यापासून ६ नोव्हेंबरपासून ही यात्रा सुरु झाली आहे. बारा दिवसांच्या कालावधीत  २१ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे. यात्रेच्या निमित्ताने कामगारांच्या सभा, बैठका , मेळावे घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले जाणार आहे. अभियानाचा समारोप बुधवार २१ डिसेंबरला आझाद मैदान, मुंबई येथे महामोर्चाद्वारे होणार आहे.     महाराष्ट्र राज्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये केवळ बांधकाम आणि माथाडी कामगार सोडले तर अन्य कुठल्याही कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा नाही. असंघटित क्षेत्र सामाजिक सुरक्षा कायदा २००८ साली करण्यात आला. त्याची अंमलबजावणी अद्यापही राज्यात झालेली नाही. भारतीय मजदूर संघाच्या ४० वर्षांच्या प्रयत्नातून घरेलू कामगारांचे बोर्ड तयार झाले. मात्र, २०१४ पासून घरेलू कामगारांना कुठलेही लाभ देण्यात आलेले नाहीत. अंगणवाडी व आशासेविकांना मिळणारे मानधन हे देशातील अन्य राज्यापेक्षा कमी आहे या सर्व विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले. मात्र ,अद्यापही सरकारने याकडे गांभिर्याने लक्ष दिलेले नाही.अत्यल्प वेतनात कामगारांचे शोषण केले जात आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या चार लेबर कोड पैकी राज्यातील कामगारांसाठी लाभदायक असलेले वेतन कोड २०१९ आणि सामाजिक सुरक्षा कोड २०२० हे ताड़तीने लागू करण्याची संघाची मागणी आहे. दरम्यान, भारतीय मजदूर संघाच्या महामोर्चात सिंधुदुर्गातून ३००० कामगार सहभागी होणार असल्याचे हरी चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग