शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सरकारच्या कामगार धोरणाविरोधात २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा, भारतीय मजदूर संघातर्फे आयोजन

By सुधीर राणे | Updated: November 14, 2022 14:24 IST

कणकवली: सरकारच्या कामगार धोरणाविरोधात भारतीय मजदूर संघातर्फे २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात राज्यातील १ ...

कणकवली: सरकारच्या कामगार धोरणाविरोधात भारतीय मजदूर संघातर्फे २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात राज्यातील १ लाखांहून अधिक कामगार सहभागी होणार आहेत. सरकारला कामगारांच्या प्रश्न व समस्यांबाबत संवदेनशीलपणे लक्ष घालण्यास भाग पाडण्यासाठी, कामगारामध्ये जागरुकता निर्माण करणे हा मजदूर चेतना यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अनिल दुमणे यांनी सांगितले.कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी बापू दडस, कोकण प्रांताचे संघटक हरि चव्हाण, संघाचे कार्याध्यक्ष भगवान साटम, विकास गुरव आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना दुमणे म्हणाले, महाराष्ट्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने हा महामोर्चा काढण्यात येणार आहे . यानिमिताने मजदूर संघाशी संलग्न कामगार व कार्यकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी ६ ते १७ नोव्हेंबर या १२ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मजदूर चेतना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरी किल्ल्यापासून ६ नोव्हेंबरपासून ही यात्रा सुरु झाली आहे. बारा दिवसांच्या कालावधीत  २१ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे. यात्रेच्या निमित्ताने कामगारांच्या सभा, बैठका , मेळावे घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले जाणार आहे. अभियानाचा समारोप बुधवार २१ डिसेंबरला आझाद मैदान, मुंबई येथे महामोर्चाद्वारे होणार आहे.     महाराष्ट्र राज्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये केवळ बांधकाम आणि माथाडी कामगार सोडले तर अन्य कुठल्याही कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा नाही. असंघटित क्षेत्र सामाजिक सुरक्षा कायदा २००८ साली करण्यात आला. त्याची अंमलबजावणी अद्यापही राज्यात झालेली नाही. भारतीय मजदूर संघाच्या ४० वर्षांच्या प्रयत्नातून घरेलू कामगारांचे बोर्ड तयार झाले. मात्र, २०१४ पासून घरेलू कामगारांना कुठलेही लाभ देण्यात आलेले नाहीत. अंगणवाडी व आशासेविकांना मिळणारे मानधन हे देशातील अन्य राज्यापेक्षा कमी आहे या सर्व विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले. मात्र ,अद्यापही सरकारने याकडे गांभिर्याने लक्ष दिलेले नाही.अत्यल्प वेतनात कामगारांचे शोषण केले जात आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या चार लेबर कोड पैकी राज्यातील कामगारांसाठी लाभदायक असलेले वेतन कोड २०१९ आणि सामाजिक सुरक्षा कोड २०२० हे ताड़तीने लागू करण्याची संघाची मागणी आहे. दरम्यान, भारतीय मजदूर संघाच्या महामोर्चात सिंधुदुर्गातून ३००० कामगार सहभागी होणार असल्याचे हरी चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग