शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

सिंधुदुर्गात अनेक पूल पाण्याखाली

By admin | Updated: September 23, 2016 23:19 IST

पावसाची संततधार : ओसरगावमध्ये वीज तारा कोसळल्या : जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

सिंधुदुर्गनगरी : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सुरू असलेल्या जोरदार पावसाने सिंधुदुर्गात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ओसरगाव येथे महामार्गावर विजेच्या तारा कोसळल्याने वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. जिल्ह्यातील बहुतांशी पूल पाण्याखाली गेल्याने शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. माणगाव खोरे आणि तळवडे भागात पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. काही माध्यमिक शाळाही लवकर सोडण्यात आल्या. मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल ते कणकवली या दरम्यान मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ओसरगाव पटेलवाडी येथे दुचाकी त्यात उतरली आणि अपघात झाला. दुचाकीस्वार फरफटत जाऊन रस्त्यालगतच्या गटारात कोसळला. त्याला गंभीर जखमाही झाल्या. महामार्गावरील ओसरगाव येथे रस्त्यावर तारा कोसळल्याने वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. वितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या तारा बाजूला केल्या आणि महामार्ग वाहतुकीस खुला केला. वैभववाडी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने तिथवली-दिगशी येथे गोठा तर खांबाळे येथील भैरीच्या ालावाची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे. घाटमार्गावर दरडींची पडझड झाली. मात्र, या पडझडीचा वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-हेदूलवाडी येथील उदय नाईक यांच्या घराशेजारी इमारतीवर पिंपळाच्या झाडाची फांदी छपरावर पडून पत्रा तुटल्याने ११ हजाराचे नुकसान झाले. तलाठी गिरप यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. तळवडे-नेमळे-कुडाळमार्गे जाणाऱ्या तळवडे-खेरवाडी पुलावर पाणी आल्याने सकाळी वाहतूक बंद झाली. यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची कुचंबणा झाली. त्यामुळे यामार्गे जाणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा फटका बसला. माणगाव परिसरात ठिकठिकाणी भातशेतीत पाणी शिरल्याने पोटरीला भरून आलेले व आकडी वळलेले भात या पावसामुळे जमिनीला मिळाले. त्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले. वायरी गर्देरोड येथे माड कोसळून नुकसान पावसामुळे मालवण- वायरी गर्देरोड येथे दिलीप सादये यांचा नारळाचे झाड (माड) कोसळल्याने मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. या पडझडीत वीज वितरणचे नुकसान झाले आहे. हा माड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडील शाम तळाशीलकर यांच्या दगडी कुंपणावर पडल्याने कुंपणाचे काही अंशी नुकसान झाले. स्थानिकांच्या मदतीने हा माड बाजूला करण्यात आला. मात्र वीजवाहिन्या तुटल्याने या भागातील वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. रेल्वे सेवेवर परिणाम मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांना शुक्रवारी विलंब झाला. गोव्याच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस ६ तास ४० मिनीटांनी विलंबाने धावली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. या शिवाय अन्य गाड्याही साधारपणे अर्धा ते दीड तास उशिराने धावल्या. तिलारी नदीचे पाणी घुसले भातशेतीत दोडामार्ग तालुक्यातील तिलारी, आयी, मुळस, कळणे, भेडशी येथील नद्यांंना पूर आल्याने ठिकठिकाणचे कॉजवे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली. एस.टी. महामंडळाच्या गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. तिलारी नदीच्या आलेल्या पुराचे पाणी नदीकाठालगतच्या बागायतींमध्ये घुसल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.