शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जगात शिकवणारे बरेच, पण काम करणारे कमी; भास्करराव पोरे-पाटील यांची खंत 

By अनंत खं.जाधव | Updated: October 30, 2023 17:36 IST

सावंतवाडी : पूर्वी मावळे ३५ किलोची तलवार घेऊन फिरायचे आज माणसाचे वजन ३५ किलो भरत नाही. त्यामुळे आपल्या चुका ...

सावंतवाडी : पूर्वी मावळे ३५ किलोची तलवार घेऊन फिरायचे आज माणसाचे वजन ३५ किलो भरत नाही. त्यामुळे आपल्या चुका सुधारा. काय करू नका हे सांगण्यापेक्षा तुम्ही करून दाखवा. माझ्या पाटोदा गावात ४० ठिकाणी हात स्वच्छता मशिन ठेवली असून या ठिकाणी थूंका असे फलक लावले आहेत. जगात शिकवणारे खूप आहेत, पण करणारे कोणीच नाही, अशी खंत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्करराव पोरे-पाटील यांनी व्यक्त केली. सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे रोटरी क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष सुहास सातोस्कर, सरपंचसंघटनेचे सुरेश गावडे, क्रीडाईचे अध्यक्ष निरज देसाई, दादा खोर्जुवेकर, सरपंच संघटने जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, प्रवीण परब उपस्थित होते. पोरे-पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्वकाळात कुठल्याही सुविधा नसताना माणसे शंभर वर्षे जगत होती. आता माणूस ६० वर्षे जगत आहे आणि लवकर त्याचे आयुष्यमान ४० वर्षांवर येईल. याला जबाबदार कोण? सर्व सुविधा असताना हे असे का घडते, याचा विचार प्रत्येक सरपंचांनी करणे गरजेचे आहे. आजार हे प्रामुख्याने गावात झाडे नसल्यामुळे होतात. झाडामुळे ऑक्सिजनची निर्मिती होते. एका माणसाला २८ किलो ऑक्सिजन लागतो. एक झाड ७ किलो ऑक्सिजन निर्मिती करते आणि ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने  कोरोना काळात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि ही आपत्ती पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. असेही ते म्हणाले. माझ्या गावात मी सरपंच होण्यापूर्वी दोन दवाखाने होते. आज आमच्या गावात एकही दवाखाना नाही. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गावात स्वच्छता पाहिजे, ड्रेनेजची गटार पाहिजेत. आरोग्य चांगले राहिले तर आयुष्य नक्कीच वाढेल. या सर्वांसाठी होणाऱ्या खर्चाचे नियोजन करणे सोपे आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग