शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जगात शिकवणारे बरेच, पण काम करणारे कमी; भास्करराव पोरे-पाटील यांची खंत 

By अनंत खं.जाधव | Updated: October 30, 2023 17:36 IST

सावंतवाडी : पूर्वी मावळे ३५ किलोची तलवार घेऊन फिरायचे आज माणसाचे वजन ३५ किलो भरत नाही. त्यामुळे आपल्या चुका ...

सावंतवाडी : पूर्वी मावळे ३५ किलोची तलवार घेऊन फिरायचे आज माणसाचे वजन ३५ किलो भरत नाही. त्यामुळे आपल्या चुका सुधारा. काय करू नका हे सांगण्यापेक्षा तुम्ही करून दाखवा. माझ्या पाटोदा गावात ४० ठिकाणी हात स्वच्छता मशिन ठेवली असून या ठिकाणी थूंका असे फलक लावले आहेत. जगात शिकवणारे खूप आहेत, पण करणारे कोणीच नाही, अशी खंत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्करराव पोरे-पाटील यांनी व्यक्त केली. सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे रोटरी क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष सुहास सातोस्कर, सरपंचसंघटनेचे सुरेश गावडे, क्रीडाईचे अध्यक्ष निरज देसाई, दादा खोर्जुवेकर, सरपंच संघटने जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, प्रवीण परब उपस्थित होते. पोरे-पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्वकाळात कुठल्याही सुविधा नसताना माणसे शंभर वर्षे जगत होती. आता माणूस ६० वर्षे जगत आहे आणि लवकर त्याचे आयुष्यमान ४० वर्षांवर येईल. याला जबाबदार कोण? सर्व सुविधा असताना हे असे का घडते, याचा विचार प्रत्येक सरपंचांनी करणे गरजेचे आहे. आजार हे प्रामुख्याने गावात झाडे नसल्यामुळे होतात. झाडामुळे ऑक्सिजनची निर्मिती होते. एका माणसाला २८ किलो ऑक्सिजन लागतो. एक झाड ७ किलो ऑक्सिजन निर्मिती करते आणि ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने  कोरोना काळात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि ही आपत्ती पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. असेही ते म्हणाले. माझ्या गावात मी सरपंच होण्यापूर्वी दोन दवाखाने होते. आज आमच्या गावात एकही दवाखाना नाही. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गावात स्वच्छता पाहिजे, ड्रेनेजची गटार पाहिजेत. आरोग्य चांगले राहिले तर आयुष्य नक्कीच वाढेल. या सर्वांसाठी होणाऱ्या खर्चाचे नियोजन करणे सोपे आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग