शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जगात शिकवणारे बरेच, पण काम करणारे कमी; भास्करराव पोरे-पाटील यांची खंत 

By अनंत खं.जाधव | Updated: October 30, 2023 17:36 IST

सावंतवाडी : पूर्वी मावळे ३५ किलोची तलवार घेऊन फिरायचे आज माणसाचे वजन ३५ किलो भरत नाही. त्यामुळे आपल्या चुका ...

सावंतवाडी : पूर्वी मावळे ३५ किलोची तलवार घेऊन फिरायचे आज माणसाचे वजन ३५ किलो भरत नाही. त्यामुळे आपल्या चुका सुधारा. काय करू नका हे सांगण्यापेक्षा तुम्ही करून दाखवा. माझ्या पाटोदा गावात ४० ठिकाणी हात स्वच्छता मशिन ठेवली असून या ठिकाणी थूंका असे फलक लावले आहेत. जगात शिकवणारे खूप आहेत, पण करणारे कोणीच नाही, अशी खंत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्करराव पोरे-पाटील यांनी व्यक्त केली. सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे रोटरी क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष सुहास सातोस्कर, सरपंचसंघटनेचे सुरेश गावडे, क्रीडाईचे अध्यक्ष निरज देसाई, दादा खोर्जुवेकर, सरपंच संघटने जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, प्रवीण परब उपस्थित होते. पोरे-पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्वकाळात कुठल्याही सुविधा नसताना माणसे शंभर वर्षे जगत होती. आता माणूस ६० वर्षे जगत आहे आणि लवकर त्याचे आयुष्यमान ४० वर्षांवर येईल. याला जबाबदार कोण? सर्व सुविधा असताना हे असे का घडते, याचा विचार प्रत्येक सरपंचांनी करणे गरजेचे आहे. आजार हे प्रामुख्याने गावात झाडे नसल्यामुळे होतात. झाडामुळे ऑक्सिजनची निर्मिती होते. एका माणसाला २८ किलो ऑक्सिजन लागतो. एक झाड ७ किलो ऑक्सिजन निर्मिती करते आणि ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने  कोरोना काळात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि ही आपत्ती पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. असेही ते म्हणाले. माझ्या गावात मी सरपंच होण्यापूर्वी दोन दवाखाने होते. आज आमच्या गावात एकही दवाखाना नाही. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गावात स्वच्छता पाहिजे, ड्रेनेजची गटार पाहिजेत. आरोग्य चांगले राहिले तर आयुष्य नक्कीच वाढेल. या सर्वांसाठी होणाऱ्या खर्चाचे नियोजन करणे सोपे आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग