शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

देवगडात आंबा कलमे मोहोरली

By admin | Updated: November 11, 2014 23:22 IST

वातावरणातील बदल : बागायतदार सुखावला

कुणकेश्वर : देवगड तालुका आंबा उत्पादनाच्या बाबतीत आघाडीचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यामध्ये आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तालुक्यातील वातावरणात नुकताच बदल होऊन थोडासा थंडावा येवू लागताच काही ठिकाणी कलमांना मोहोर यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बागायतदार मनोमन सुखावला आहे. थंडीच्या प्रमाणात जर वाढ झाली तर कलम झाडांची फूट अधिक वेगाने होऊन आंबा उत्पादनात वाढ होईल असाही विश्वास काही शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.परतीच्या पावसामुळे भातशेती, नाचणी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता. अशातच पावसामुळे आंबा उत्पादनावरसुद्धा संकट उभे होते. परंतु नुकत्याच येणाऱ्या फुटीने बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी बनावट औषधाने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. औषधांचा कोणताही प्रभाव गेल्या वर्षी मोहोरावर न झाल्याने उत्पादन फार कमी झाले. यावर्षी मात्र संबंधित विभागाने अशाप्रकारच्या औषधांवर वेळीच निर्बंध घालून शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या प्रतीची औषधे कशी पोहोचवता येतील याकडे लक्ष द्यावे अशाही सूचना बागायतदारांकडून होत आहेत. वाशी मार्केटमधील दलालांकडून आंब्याला योग्य हमीभाव मिळत नाही. त्यासाठी शासनाने उपाययोजना करुन बागायतदारांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी बागायतदारांकडून होत आहे. (वार्ताहर)