शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

देवगडात आंबा कलमे मोहोरली

By admin | Updated: November 11, 2014 23:22 IST

वातावरणातील बदल : बागायतदार सुखावला

कुणकेश्वर : देवगड तालुका आंबा उत्पादनाच्या बाबतीत आघाडीचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यामध्ये आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तालुक्यातील वातावरणात नुकताच बदल होऊन थोडासा थंडावा येवू लागताच काही ठिकाणी कलमांना मोहोर यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बागायतदार मनोमन सुखावला आहे. थंडीच्या प्रमाणात जर वाढ झाली तर कलम झाडांची फूट अधिक वेगाने होऊन आंबा उत्पादनात वाढ होईल असाही विश्वास काही शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.परतीच्या पावसामुळे भातशेती, नाचणी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता. अशातच पावसामुळे आंबा उत्पादनावरसुद्धा संकट उभे होते. परंतु नुकत्याच येणाऱ्या फुटीने बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी बनावट औषधाने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. औषधांचा कोणताही प्रभाव गेल्या वर्षी मोहोरावर न झाल्याने उत्पादन फार कमी झाले. यावर्षी मात्र संबंधित विभागाने अशाप्रकारच्या औषधांवर वेळीच निर्बंध घालून शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या प्रतीची औषधे कशी पोहोचवता येतील याकडे लक्ष द्यावे अशाही सूचना बागायतदारांकडून होत आहेत. वाशी मार्केटमधील दलालांकडून आंब्याला योग्य हमीभाव मिळत नाही. त्यासाठी शासनाने उपाययोजना करुन बागायतदारांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी बागायतदारांकडून होत आहे. (वार्ताहर)