शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

उष्माघातामुळे आंबा डागळतोय, लासे होण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:02 IST

गेले आठ दिवस वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे उष्माघात होऊन आंब्यांच्या देठातील डिंक सुकून आंबे जमिनीवर पडून आंब्यांमध्ये लासे होण्याचे प्रकार जिल्ह्यात ठिकठिकाणी घडले आहेत.

ठळक मुद्देउष्माघातामुळे आंबा डागळतोय, लासे होण्याचा प्रकार बागायतदार, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

वेंगुर्ले : गेले आठ दिवस वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे उष्माघात होऊन आंब्यांच्या देठातील डिंक सुकून आंबे जमिनीवर पडून आंब्यांमध्ये लासे होण्याचे प्रकार जिल्ह्यात ठिकठिकाणी घडले आहेत.यामुळे आंबा बागायतदार व शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले असून अद्यापपर्यंत याची दखल प्रशासन, कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी घेतली नसल्याने याबाबत वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या हंगामात सुरुवातीलाच काही ठिकाणी आंब्याचे उत्पादन कमी असून आता गेले काही दिवस वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एका झाडावर असलेल्या आंब्यांच्या ३० ते ४० टक्के आंबे या उष्माघातामुळे खाली पडून नुकसान झाले आहे. या आंब्यांना कैरी विक्रेत्यांनीही घेण्यासाठी नकार दिल्यामुळे हे आंबे अक्षरश: फेकून देण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे. असा प्रकार घडूनही प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने बागायतदारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तसेच आंबा बागायतदार शेतकऱ्यांकडून १२ हजार व केंद्र शासनाने १२ हजार असा एकूण २४ हजारांचा विमा काढला असून हे पैसे या विमा कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी आहेत काय? असा सवालही परब यांनी केला आहे.शासनाने दखल घेण्याची मागणीया प्रकारामुळे आंबे कुसण्याचे प्रकार घडत असल्याने मुंबई बाजारपेठेत जोपर्यंत कॅनिंग सुरू होत नाही तोपर्यंत आंबे घेण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्याचेही परब यांनी सांगितले आहे. तरी शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन कृषी विभागाने संपूर्ण जिल्ह्याचा सर्व्हे करावा व नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणीही परब यांनी केली आहे.

 

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग