शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघातामुळे आंबा डागळतोय, लासे होण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:02 IST

गेले आठ दिवस वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे उष्माघात होऊन आंब्यांच्या देठातील डिंक सुकून आंबे जमिनीवर पडून आंब्यांमध्ये लासे होण्याचे प्रकार जिल्ह्यात ठिकठिकाणी घडले आहेत.

ठळक मुद्देउष्माघातामुळे आंबा डागळतोय, लासे होण्याचा प्रकार बागायतदार, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

वेंगुर्ले : गेले आठ दिवस वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे उष्माघात होऊन आंब्यांच्या देठातील डिंक सुकून आंबे जमिनीवर पडून आंब्यांमध्ये लासे होण्याचे प्रकार जिल्ह्यात ठिकठिकाणी घडले आहेत.यामुळे आंबा बागायतदार व शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले असून अद्यापपर्यंत याची दखल प्रशासन, कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी घेतली नसल्याने याबाबत वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या हंगामात सुरुवातीलाच काही ठिकाणी आंब्याचे उत्पादन कमी असून आता गेले काही दिवस वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एका झाडावर असलेल्या आंब्यांच्या ३० ते ४० टक्के आंबे या उष्माघातामुळे खाली पडून नुकसान झाले आहे. या आंब्यांना कैरी विक्रेत्यांनीही घेण्यासाठी नकार दिल्यामुळे हे आंबे अक्षरश: फेकून देण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे. असा प्रकार घडूनही प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने बागायतदारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तसेच आंबा बागायतदार शेतकऱ्यांकडून १२ हजार व केंद्र शासनाने १२ हजार असा एकूण २४ हजारांचा विमा काढला असून हे पैसे या विमा कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी आहेत काय? असा सवालही परब यांनी केला आहे.शासनाने दखल घेण्याची मागणीया प्रकारामुळे आंबे कुसण्याचे प्रकार घडत असल्याने मुंबई बाजारपेठेत जोपर्यंत कॅनिंग सुरू होत नाही तोपर्यंत आंबे घेण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्याचेही परब यांनी सांगितले आहे. तरी शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन कृषी विभागाने संपूर्ण जिल्ह्याचा सर्व्हे करावा व नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणीही परब यांनी केली आहे.

 

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग