शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

आंबा हंगामाला उशिर

By admin | Updated: October 8, 2014 00:19 IST

बेभरवशी हंगाम : बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण

नरेंद्र बोडस- देवगड -देवगड तालुक्यात परतीच्या पावसाने आॅक्टोबर सुरूवातीपर्यंत उशिर लावला. दसऱ्याच्या पूर्वसंध्येपर्यंत पावसाळी वातावरण होते. सध्या ढगाळ वातावरण असले तरी पावसाने उसंत दिली आहे. देवगड तालुक्याच्या उत्तर पट्ट्यात म्हणजे विजयदुर्ग पट्ट्यामध्ये हापूस कलमे पालवलेली दिसत आहे तर दक्षिण पट्ट्यात म्हणजे कुणकेश्वर- कातवण, मुंबरी, दाभोळे व देवगडचा किनारी भाग पालवण्याच्या प्रक्रियेपासून दूर आहे. आता हा पट्टा उशिराने पालवतो की मोहोरतो याबद्दल अनिश्चितता आहे. त्यामुळे यावेळेचा हंगाम बेभरवशी असेल का? या चिंतेमध्ये बागायतदार आहेत.साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत पावसाच्या जोरामुळे आंबा कलमे पालवू लागतात. यावेळी अशा प्रकारच्या पालवीचा अभाव दिसून आला. त्यामुळे सप्टेंबरच्या मध्यापासून उत्तर पट्ट्यातील कलमे पालवताना दिसून आली. आता उशिराने का होईना, पण दक्षिण पट्ट्यातील कलमे पालवतात की पालेमोहोर येतो याकडे बागायतदार लक्ष ठेवून आहेत. बहुतांश बागायतदारांनी आॅक्टोबरच्या सुरूवातीपर्यंत आंतरप्रवाही व स्पर्शजन्म (कॉन्टॅक्ट व सिस्टिमिक किटकनाशके) किटकनाशकांच्या पहिल्या फवारणीला सुरूवात केली आहे किंवा पूर्ण केलेली आहे.सध्याच्या वातावरणानुसार नोव्हेंबर सुरूवातीपासून ते मध्यापर्यंत हापूस कलमे मोहरू लागायला हवीत, अशी बागायतदारांची अपेक्षा आहे. ज्या बागायतदारांनी संजिवकांचे डोस कलमांना दिले आहेत त्यांच्या बाबतीत तर त्यांची ही खास अपेक्षा आहे. ज्या कलमांना संजिवकांचे डोस दिलेले नाहीत, अशी कलमे सुमारे महिनाभर उशिराने म्हणजे डिसेंबरमध्ये मोहोरतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे (अर्ली फ्रक्टेशन) लवकर फलधारणेचा फायदा संजीवकाचा वापर केलेल्या शेतकऱ्यांना मिळेलच, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.काही ठिकाणी झाडे पूर्ण पालवतील तर काही ठिकाणी पालेमोहोरही येईल, अशा ठिकाणी बागायतदार पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतील. परंतु संजिवकाच्या वापराने पूर्ण मोहोर आल्यास फवारण्या व किटकनाशकांचा वापर यांचे चक्र नियोजित वेळेप्रमाणे घेता येईल, असा विश्वासही बागायतदार व्यक्त करीत आहेत.बागायतदारांनी दक्ष रहावेजूनमध्ये आंबा कलमे पालवलेली नसल्यामुळे सर्वसाधारणपणे बहुतांश आंबा कलमे आॅक्टोबर मध्यापर्यंत पालवतील व त्या पालवीची काळजी घेण्यासाठी व मोहोर प्रक्र्रियेलाही सुरक्षित ठेवण्यासाठी बागायतदारांना डोळ््यात तेल घालून दक्ष रहावे लागेल, असे मत बागायतदार व व्यापारी सुनील कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.