शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दर्जाहीन औषध पुरवठ्यामुळे आंबा बागायतदार, व्यापारी संकटात

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 24, 2024 15:42 IST

कीटकनाशकांची तपासणी तज्ज्ञ पथकाकडून व्हावी; मालवण तालुका आंबा बागायतदार, व्यापारी यांची आग्रही मागणी

सिंधुदुर्ग : बदलत्या हवामानामुळे संकटात सापडलेल्या आंबा बागायतदार, व्यापाऱ्यांना फवारणीसाठी मिळणारी औषधे ही दर्जाहीन स्वरूपात मिळत असल्याचे नवे संकट निर्माण झाले आहे. तुडतुडे, थ्रिप्स आदी कीड व कीटक रोगांना दूर ठेवण्यासाठी लाखो रुपयांची औषधी खरेदी करूनही त्याची परिणामकारकता मिळत नसल्याचे चित्र आहे.याबाबत कृषी विभागाने बाजारात विक्रीस असलेल्या औषधांची तपासणी करावी, त्याबरोबरच शासनाने यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करून संकटात असलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा द्यावा. अशी मागणी मालवण तालुका आंबा बागायतदार आणि आंबा व्यापारी यांच्या वतीने करण्यात आली आहे.दरम्यान, शासनाने आंबा बागायतदारांची व्यथा समजून घेऊन या बागायतदार, व्यापाऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने दर्जेदार स्वरूपातील औषधे अनुदान स्वरूपात मिळण्याबाबत कृषी विभागामार्फत पावले उचलावीत. अशीही मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.मालवण तालुका आंबा बागायतदार आणि व्यापारी यांनी मंगळवारी सायंकाळी भरड दत्त मंदिर येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावेळी आप्पा चव्हाण, सुधीर मांजरेकर, जगदीश गावकर, संदीप गावकर, सिजर डिसोजा, मधुकर लुडबे, राजन लुडबे, दीपक शिंदे, राहुल सावंत, सचिन कांबळी, जयवंत लुडबे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

कीडरोगाचे प्रमाण वाढलेगेल्या काही वर्षांत सतत हवामान बदलाचा फटका आंबा व्यवसायाला बसत आहे. अवकाळी पाऊस, बदलता थंडीचा कालावधी, काही वेळा वाढणारा प्रचंड उष्मा या सर्वांमुळे आंबा बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. त्यासोबतच विविध कीटक व कीड रोगाचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र या हवामान बदलामुळे दिसून येते. त्यामुळे वारंवार फवारणी करण्याची वेळ सर्वच बागायतदारांवर आली आहे.

योग्य ती कार्यवाही करावीआंबा पिकाकडे कृषी विभागाने, अधिकारी वर्गाने ज्या गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, अशी कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आंबा बागायतदार, व्यापारी मोठ्या संकटात असून मोठा आर्थिक फटकाही बसत आहे. शासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कृषी विभागाला आदेश देत योग्य ती कार्यवाही करावी. बाजारात मिळणारी कीटकनाशके यांचीही तपासणी तज्ज्ञ पथकाकडून करण्यात यावी, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMangoआंबा