शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

देवगडात आंबा, तर वेंगुर्ल्यात काजू परिषद

By admin | Updated: July 23, 2016 23:53 IST

प्रमोद जठार : जिल्ह्यात शेततळी बांधण्याची कृषिमंत्र्यांकडे मागणी

देवगड : कृषी लागवडीला १०० टक्के अनुदान पूर्वीप्रमाणे द्यावे, कृषी अवजारांसाठी जिल्ह्याला सुमारे पाच कोटी देण्यात यावेत, जिल्ह्यातील शेततळी बांधावीत, आदी मागण्या कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केल्या आहेत. सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन संपल्यावर कृषिमंत्री देवगडमध्ये आंबा परिषद, तर वेंगुर्ल्यामध्ये काजू परिषद घेणार असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.देवगड भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, जयदेव कदम, संतोष किंजवडेकर, हर्षा ठाकूर, सदाशिव ओगले, आदी उपस्थित होते.जठार म्हणाले की, पंतप्रधान पीक विमा योजनेमधून महाराष्ट्रमध्ये चार हजार कोटी रुपयांची रक्कम त्या त्या जिल्ह्याला वाटण्यात आली. यामधील लातूर जिल्ह्याला १६२२ कोटी, उस्मानाबाद जिल्हा १२१७ कोटी, नांदेड जिल्हा १०५१ कोटी, जालना १९०० कोटी, बीड २६१० कोटी, बुलढाणा १११८ कोटी, यवतमाळ १५१९ कोटी, रायगड ५ कोटी ५९ लाख, सिंधुदुर्गला ८ लाख, तर रत्नागिरीला ५ लाख, अशी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला पंतप्रधान पीक विमा योजनेमधील सर्वांत कमी लाभ मिळाला आहे. याचे कारण असे आहे की, या विमा योजनेमध्ये शेतकरी सहभागी झाले नाहीत. त्याचा प्रचार व प्रसार झाला नाही. कोकणामध्ये दुष्काळग्रस्त भाग नसल्याने महाराष्ट्राला लागू असलेला दर पिकाच्या जोखीम दरापेक्षा जास्त असल्याने या योजनेचा लाभ घेता आला नाही.यामुळे कोकणच्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जोखीम दर ७० टक्क्यावरून ९० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात यावा, अशी मागणी कृषिमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यामुळे कोकणच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यावर कृषिमंत्री देवगडमध्ये आंबा परिषद, तर वेंगुर्ल्यामध्ये काजू परिषद घेणार असून, कृषी लागवडीसाठी १०० टक्के अनुदान पूर्वीप्रमाणे मिळावे, कृषी अवजारांसाठी जिल्ह्यासाठी साडेपाच कोटी रुपये मिळावेत, आत्मा ही कृषी संस्था नियमित करण्यासाठी त्यांना निधी देण्यात यावा, प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी ५ कोटी देण्यात यावेत, शेततळ्याची, महात्मा फुले जलसंधारणासाठी ५ कोटींची मागणी, जिल्ह्यातील नद्यांच्या गाळ उपशासाठी व कृषी विभागातील ५० टक्के असलेली रिक्त पदे भरण्यात यावी, अशा विविध मागण्या कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)...तर याचा शेतकऱ्यांना लाभ होईलपीक विमा योजनेमध्ये आतापर्यंत कोकणातील २९ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यामुळे कोकणाचे २८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, या योजनेचा लाभ कोकणातील शेतकऱ्यांना होण्यासाठी याची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविल्यास कोकणातील ६० हजार हेक्टर क्षेत्र आणि १ लाख २३ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे जठार यांनी सांगितले.