शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: देवगड तालुक्यात आंबा कलमांना जूनमध्येच बहारदार पालवी, बागायतदारांच्या आशा पल्लवित

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 10, 2025 19:36 IST

मे महिन्यात पडलेल्या पावसाचा परिणाम

अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : यावर्षी पावसाने मे महिन्याच्या २० तारीखलाच सुरुवात झाल्याने तालुक्यामध्ये आंबा कलमांना जून महिन्याच्या सुरुवातीला बहारदार अशी पालवी येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे तालुक्यातील सर्व हापूस कलमे बहारदार पालवीने सजल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील ८० टक्क्यांहून अधिक कलमांना बहारदार अशी पालवी आल्याचे दिसून येत आहे. ही पालवी टिकविण्यासाठी व किडींपासून संरक्षण मिळण्यासाठी कीटकनाशक फवारण्या बागायतदार करीत असल्याचेही दिसून येत आहे. पूर्वी चैत्र महिन्यामध्ये आंबा कलमांना पालवी येण्याचे प्रमाण जास्त होते.गेल्या काही वर्षांपासून आंबा कलमांना चैत्र महिन्याऐवजी कलम मोहरण्याच्या वेळेला म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात पालवी येत होती. यामुळे आंबा उत्पादनावर याचा मोठा परिणाम होत होता. मात्र, यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच बहारदार अशी आंबा कलमांना पालवी आली आहे.

पालवी टिकविण्यासाठी बागायतदार सक्रियही पालवी टिकविण्यासाठी कीटकनाशक फवारण्या येथील बागायतदार करीत आहेत, तसेच कलमांना खते घालण्याची कामेदेखील बागायतदार करीत आहेत. या आलेल्या पालवीचे कीटकांपासून संरक्षण होऊन पालवी टिकल्यास येणारे आंबा पीक हे समाधानकारक येऊ शकते, असे मत जाणकार आंबा बागायतदारांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

बहारदार पालवीने बागायतदारांच्या आशा पल्लवितआंबा कलमांना आलेल्या बहारदार पालवीला ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये दुबार पालवी न येता या कलमांना मोहरच येऊ शकतो. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला असता देवगड हापूस कलमांना आंबा मोहर येण्याच्या वेळेलाच नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पालवी येत होती. यामुळे उत्पादनावर परिणाम होत होता. यावर्षी मात्र तालुक्यामध्ये आलेल्या बहारदार पालवीमुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.