शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मणेरी पाईपलाईनचे काम निकृष्ट

By admin | Updated: May 21, 2015 00:04 IST

दर्जेदार नसल्याचा ठोस पुरावा : जीवन प्राधिकरणचे पितळ उघडे

कसई दोडामार्ग : मणेरी येथून नदीचे पाणी उपसा करून वेंगुर्ले येथे नेण्यासाठी पाईप लाईनची टेंडर देण्यात आली. पाईप लाईन फुटली आणि जीवन प्राधिकरणचे पितळ उघडे पडले. पाईपलाईनचे काम दर्जेदार झाले नसल्याचा हा ठोस पुरावा असल्याने काम त्वरित बंद करून दर्जेदार काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तिलारी नदीचे पाणी मणेरी नदीतून उपसा करून वेंगुर्ले येथे नेण्याची जीवन प्राधिकरणची योजना सुरू आहे. मणेरी ते बांदा, बांदा ते वेंगुर्ले राज्यमार्गाची साईडपट्टी खणून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. जमिनीला लागूनच पाईपलाईन टाकण्यात येत असून, नंतर पाईपला वेल्डिंग मारण्यात येते. मात्र, पाईपलाईन जमिनीबरोबर असल्याने खालून पाईपला वेल्डिंग मारणे अशक्य आहे. असे असताना वेल्डिंग मारण्यात आले, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. तसेच वेल्डिंग मारलेल्या ठिकाणी सिमेंट लावण्यात आले. तसेच पाईप जॉर्इंटच्या ठिकाणी लहान साईजचे दर्जेदार नसलेले पाईप वापरण्यात येत आहे. सासोली येथे जॉर्इंटचा पाईप फुटल्याने पाईपचा दर्जा स्पष्ट झाला. एकंदरीत काम एस्टिमेंटप्रमाणे न झाल्याने पाईपलाईन फुटली. त्यामुळे लाईनचा आम्हाला धोका आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाईपलाईन टाकताना जमीनमालकांची परवानगी घेणे आवश्यक होते. जमीनमालकांना नुकसान भरपाई देणे बंधनकारक होते. रस्ता बांधकाम विभागाचा असला, तरी जमिनी नाहीत. लोकांच्या सेवेसाठी म्हणून हा रस्ता बांधकाम विभागाला दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे या लाईनचे काम बेकायदेशीर होत आहे. याच्याशी काहीही संबंध नसलेल्या लोकांना केवळ गप्प राहण्यासाठी लाखो रुपये देण्यात आले. नाहरकत दाखल्यांसाठी पैसे मोजण्यात आले. मात्र, खरोखरच जे रस्त्याचे मालक आहेत, त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली, असे आरोप होत आहे. त्यामुळे या पाईपलाईनचे काम बंद करावे. प्रकल्पाची एस्टिमेंट कॉपी सर्वांसाठी खुली करावी व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पुन्हा काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)