शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगड जिल्हा निर्मितीच्या हालचाली

By admin | Updated: November 6, 2014 22:06 IST

महसूल व वन विभागाची गांधी यांना माहिती

खेड : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची पुनर्रचना करून मंडणगड हा नवीन जिल्हा करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे़ नव्या जिल्हा विभाजनाचे निकष ठरविण्याबाबत महसूल व वन विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयातील महसूल व वनविभागाचे कक्ष अधिकारी शरद डाके यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे़ खेड येथील मंडणगड जिल्हा निर्माण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभिजीत गांधी यांनी लेखी पत्राद्वारे याबाबत ही माहिती मागितली होती. त्याबाबतचे लेखी पत्र गांधी यांना प्राप्त झाले आहे़ मंडणगड जिल्हा निर्मिती करण्यासंबंधात विभाजनाचे निकष ठरविण्याबाबत महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय क्ऱ २०१४ /प्रक्र. ८७/म-१० दि. २४ जून २0१४ च्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आल्याची माहिती या पत्रात दिली आहे़ अ‍ॅड. गांधी यांनी आपल्या पत्रात मंडणगड जिल्ह्याच्या निर्मितीमागील आवश्यकता आपल्या पत्रात विषद केली होती़ रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांना जिल्ह्याचे ठिकाण तसे दूरवर आहे. जिल्ह्याच्या एका टोकाला हे तालुके आहेत़ तसे खेड, दापोली आणि मंडणगड हे तालुके रत्नागिरी जिल्ह्याच्या एका टोकाला आहेत़ हे तालुके मागास राहीले आहेत़ या तालुक्यांचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायालय हे रत्नागिरी येथे आहे़ खेड, दापोली आणि मंडणगड हे तालुके जिल्ह्याच्या एका टोकाला आहेत़ संपर्काच्या दृष्टीने अवघड होत असल्याने हे तालुके आजही मागास राहिले आहेत. शासकीय कामे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आहे, अशीच परिस्थिती श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांची आहे़ भौगोलिक रचनेमुळे तसेच खर्चाचे दृष्टीने अधिक व सर्वसामान्यांना न परवडणारे असल्याने बहुतांश लोकांवर अन्याय होत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील या ८ तालुक्यांना मंडगणगड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे मंडणगड हा नवा जिल्हा केल्यास या भागातील सर्व प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे़ अशा आशयाच्या या पत्राचा मंत्रालयीन पातळीवर विचार झाल्याने समाधान व्यक्त होत आहे़ एक प्रकारे मंडणगड या नव्या जिल्ह्याच्या निर्मितीकडे प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक असून, लवकरच याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी अ‍ॅड. गांधी यांनी केली आहे. गांधी यांना आलेल्या पत्रातून मंडणगडच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय भविष्यात महत्त्वाचा ठरू शकतो. (प्रतिनिधी)