शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

मंडणगड जिल्हा निर्मितीच्या हालचाली

By admin | Updated: November 6, 2014 22:06 IST

महसूल व वन विभागाची गांधी यांना माहिती

खेड : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची पुनर्रचना करून मंडणगड हा नवीन जिल्हा करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे़ नव्या जिल्हा विभाजनाचे निकष ठरविण्याबाबत महसूल व वन विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयातील महसूल व वनविभागाचे कक्ष अधिकारी शरद डाके यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे़ खेड येथील मंडणगड जिल्हा निर्माण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभिजीत गांधी यांनी लेखी पत्राद्वारे याबाबत ही माहिती मागितली होती. त्याबाबतचे लेखी पत्र गांधी यांना प्राप्त झाले आहे़ मंडणगड जिल्हा निर्मिती करण्यासंबंधात विभाजनाचे निकष ठरविण्याबाबत महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय क्ऱ २०१४ /प्रक्र. ८७/म-१० दि. २४ जून २0१४ च्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आल्याची माहिती या पत्रात दिली आहे़ अ‍ॅड. गांधी यांनी आपल्या पत्रात मंडणगड जिल्ह्याच्या निर्मितीमागील आवश्यकता आपल्या पत्रात विषद केली होती़ रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांना जिल्ह्याचे ठिकाण तसे दूरवर आहे. जिल्ह्याच्या एका टोकाला हे तालुके आहेत़ तसे खेड, दापोली आणि मंडणगड हे तालुके रत्नागिरी जिल्ह्याच्या एका टोकाला आहेत़ हे तालुके मागास राहीले आहेत़ या तालुक्यांचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायालय हे रत्नागिरी येथे आहे़ खेड, दापोली आणि मंडणगड हे तालुके जिल्ह्याच्या एका टोकाला आहेत़ संपर्काच्या दृष्टीने अवघड होत असल्याने हे तालुके आजही मागास राहिले आहेत. शासकीय कामे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आहे, अशीच परिस्थिती श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांची आहे़ भौगोलिक रचनेमुळे तसेच खर्चाचे दृष्टीने अधिक व सर्वसामान्यांना न परवडणारे असल्याने बहुतांश लोकांवर अन्याय होत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील या ८ तालुक्यांना मंडगणगड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे मंडणगड हा नवा जिल्हा केल्यास या भागातील सर्व प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे़ अशा आशयाच्या या पत्राचा मंत्रालयीन पातळीवर विचार झाल्याने समाधान व्यक्त होत आहे़ एक प्रकारे मंडणगड या नव्या जिल्ह्याच्या निर्मितीकडे प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक असून, लवकरच याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी अ‍ॅड. गांधी यांनी केली आहे. गांधी यांना आलेल्या पत्रातून मंडणगडच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय भविष्यात महत्त्वाचा ठरू शकतो. (प्रतिनिधी)