शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

सतराही जागा जिंकण्याचाच मानस

By admin | Updated: October 15, 2015 00:40 IST

नितेश राणे : विकास आघाडीचे लोक कोणाचे ते योग्य वेळी समजेल

वैभववाडी : अवैध नामनिर्देशन पत्राबाबत जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केले आहे, त्याचा निर्णय १६ रोजी लागेल. परंतु, वाभवे-वैभववाडीच्या सतराच्या सतरा जागा जिंकण्याचा आमचा मानस असून, विकास आघाडीचे लोक कोणाचे बाजूने आहेत, हे योग्य वेळेस तेच सांगतील, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.आमदार राणे यांनी येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे, उपसभापती शोभा पांचाळ, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, बंड्या मांजरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार राणे पुढे म्हणाले की, शिवसेना सत्तेसाठी बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. तसे झाल्यास राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास वैभववाडीच्या विकासासाठी इतका निधी आणू, असा विकास करू असे सांगणाऱ्यांचे काय होणार? ज्या सरकारमध्ये एकवाक्यता आणि समन्वय नाही, ते जनतेला न्याय देऊ शकतात का? याचा विचार येथील मतदार निश्चितपणे करतील. जिल्हा शिवसेनेत अंतर्गत भांडणे आहेत. पालकमंत्री व कुडाळचे आमदार यांचे पटत नाही. ते निधी कसा आणणार? असा सवाल आमदार राणे यांनी यावेळी केला.ते पुढे म्हणाले, आघाडी व्हावी अशी आमची इच्छा आहे. राष्ट्रवादीला चार जागा देण्याचे आम्ही मान्य केले असून, त्या जागा कोणत्या याची यादीही आम्ही त्यांना दिली आहे. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. लवकरच त्यांच्याकडून याबाबत उत्तर येईल. त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करत आघाडीचा चेंडू आमदार राणे यांनी राष्ट्रवादीच्या कोर्टात ढकलला आहे. (प्रतिनिधी)गरज वाटल्यास सभाआपण स्वत: प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणार आहोत. त्यातूनही गरज वाटलीच तर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची एक सभा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात घेतली जाईल, असे स्पष्ट करत आपण दोन नोव्हेंबरपर्यंत वैभववाडीकरच आहोत असेही सांगितले.शिवसेना सत्तेसाठी बाहेर पडण्याच्या मार्गावर.राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता.वैभववाडीच्या विकासासाठी निधी आणणाऱ्यांचे पुढे काय होणार? राणे यांचा प्रश्न.विकासाच्या गप्पा करणारे जनतेला आता न्याय देऊ शकतील? नितेश राणे यांचा सवाल.