शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सतराही जागा जिंकण्याचाच मानस

By admin | Updated: October 15, 2015 00:40 IST

नितेश राणे : विकास आघाडीचे लोक कोणाचे ते योग्य वेळी समजेल

वैभववाडी : अवैध नामनिर्देशन पत्राबाबत जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केले आहे, त्याचा निर्णय १६ रोजी लागेल. परंतु, वाभवे-वैभववाडीच्या सतराच्या सतरा जागा जिंकण्याचा आमचा मानस असून, विकास आघाडीचे लोक कोणाचे बाजूने आहेत, हे योग्य वेळेस तेच सांगतील, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.आमदार राणे यांनी येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे, उपसभापती शोभा पांचाळ, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, बंड्या मांजरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार राणे पुढे म्हणाले की, शिवसेना सत्तेसाठी बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. तसे झाल्यास राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास वैभववाडीच्या विकासासाठी इतका निधी आणू, असा विकास करू असे सांगणाऱ्यांचे काय होणार? ज्या सरकारमध्ये एकवाक्यता आणि समन्वय नाही, ते जनतेला न्याय देऊ शकतात का? याचा विचार येथील मतदार निश्चितपणे करतील. जिल्हा शिवसेनेत अंतर्गत भांडणे आहेत. पालकमंत्री व कुडाळचे आमदार यांचे पटत नाही. ते निधी कसा आणणार? असा सवाल आमदार राणे यांनी यावेळी केला.ते पुढे म्हणाले, आघाडी व्हावी अशी आमची इच्छा आहे. राष्ट्रवादीला चार जागा देण्याचे आम्ही मान्य केले असून, त्या जागा कोणत्या याची यादीही आम्ही त्यांना दिली आहे. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. लवकरच त्यांच्याकडून याबाबत उत्तर येईल. त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करत आघाडीचा चेंडू आमदार राणे यांनी राष्ट्रवादीच्या कोर्टात ढकलला आहे. (प्रतिनिधी)गरज वाटल्यास सभाआपण स्वत: प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणार आहोत. त्यातूनही गरज वाटलीच तर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची एक सभा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात घेतली जाईल, असे स्पष्ट करत आपण दोन नोव्हेंबरपर्यंत वैभववाडीकरच आहोत असेही सांगितले.शिवसेना सत्तेसाठी बाहेर पडण्याच्या मार्गावर.राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता.वैभववाडीच्या विकासासाठी निधी आणणाऱ्यांचे पुढे काय होणार? राणे यांचा प्रश्न.विकासाच्या गप्पा करणारे जनतेला आता न्याय देऊ शकतील? नितेश राणे यांचा सवाल.