शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

सतराही जागा जिंकण्याचाच मानस

By admin | Updated: October 15, 2015 00:40 IST

नितेश राणे : विकास आघाडीचे लोक कोणाचे ते योग्य वेळी समजेल

वैभववाडी : अवैध नामनिर्देशन पत्राबाबत जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केले आहे, त्याचा निर्णय १६ रोजी लागेल. परंतु, वाभवे-वैभववाडीच्या सतराच्या सतरा जागा जिंकण्याचा आमचा मानस असून, विकास आघाडीचे लोक कोणाचे बाजूने आहेत, हे योग्य वेळेस तेच सांगतील, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.आमदार राणे यांनी येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे, उपसभापती शोभा पांचाळ, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, बंड्या मांजरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार राणे पुढे म्हणाले की, शिवसेना सत्तेसाठी बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. तसे झाल्यास राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास वैभववाडीच्या विकासासाठी इतका निधी आणू, असा विकास करू असे सांगणाऱ्यांचे काय होणार? ज्या सरकारमध्ये एकवाक्यता आणि समन्वय नाही, ते जनतेला न्याय देऊ शकतात का? याचा विचार येथील मतदार निश्चितपणे करतील. जिल्हा शिवसेनेत अंतर्गत भांडणे आहेत. पालकमंत्री व कुडाळचे आमदार यांचे पटत नाही. ते निधी कसा आणणार? असा सवाल आमदार राणे यांनी यावेळी केला.ते पुढे म्हणाले, आघाडी व्हावी अशी आमची इच्छा आहे. राष्ट्रवादीला चार जागा देण्याचे आम्ही मान्य केले असून, त्या जागा कोणत्या याची यादीही आम्ही त्यांना दिली आहे. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. लवकरच त्यांच्याकडून याबाबत उत्तर येईल. त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करत आघाडीचा चेंडू आमदार राणे यांनी राष्ट्रवादीच्या कोर्टात ढकलला आहे. (प्रतिनिधी)गरज वाटल्यास सभाआपण स्वत: प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणार आहोत. त्यातूनही गरज वाटलीच तर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची एक सभा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात घेतली जाईल, असे स्पष्ट करत आपण दोन नोव्हेंबरपर्यंत वैभववाडीकरच आहोत असेही सांगितले.शिवसेना सत्तेसाठी बाहेर पडण्याच्या मार्गावर.राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता.वैभववाडीच्या विकासासाठी निधी आणणाऱ्यांचे पुढे काय होणार? राणे यांचा प्रश्न.विकासाच्या गप्पा करणारे जनतेला आता न्याय देऊ शकतील? नितेश राणे यांचा सवाल.