शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मालवणवासीयांकडून बंटरजेटी किनाऱ्यावर नरकासूराचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 15:10 IST

नरक चतुर्दशीनिमित्त वाईट गोष्टींचे प्रतिक असणाऱ्या नरकासुराच्या प्रतिमांची शहरातून धिंड काढत मालवणवासीयांनी बंदर जेटी किनाऱ्यावर बुधवारी पहाटे नरकासुराचे दहन केले. यानिमित्त मालवणातील बच्चे कंपनी व युवकांनी साकारलेल्या भव्य नरकासूर प्रतिमांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी शिवसेनेने आयोजित केलेल्या नरकासूर प्रतिमा स्पर्धेत बांगीवाडा मित्रमंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

ठळक मुद्देप्रतिमांची मालवण शहरात काढली धिंडनरकासूर प्रतिमा स्पर्धेत बांगीवाडा मंडळ प्रथम विविध मुद्रांमधील साकारलेल्या नरकासुराच्या प्रतिमा

मालवण , दि. १९ : वाईट प्रवृत्तीचा नाश करून चांगली प्रवृत्ती व गोष्टी अंगिकारण्याचा दिवस म्हणजे दिवाळीतील नरक चतुर्दशीचा दिवस होय. यानिमित्त वाईट गोष्टींचे प्रतिक असणाऱ्या  नरकासुराच्या प्रतिमांची शहरातून धिंड काढत मालवणवासीयांनी बंदर जेटी किनाऱ्यावर पहाटे नरकासुराचे दहन केले.

यानिमित्त मालवणातील बच्चे कंपनी व युवकांनी साकारलेल्या भव्य नरकासूर प्रतिमांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी शिवसेनेने आयोजित केलेल्या नरकासूर प्रतिमा स्पर्धेत बांगीवाडा मित्रमंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

नरक चतुर्दशीनिमित्त मालवणात अलिकडे दरवर्षी भव्य व आकर्षक सजावटीच्या नरकासूर प्रतिमा बनविण्यात येतात. यामध्ये बच्चे कंपनी व युवक वर्गाचा मोठा सहभाग दिसून येतो. यावर्षीही मोठ्या उत्साहात व मोठ्या संख्येने शहरातील अनेक ठिकाणी नरकासूर बनविण्यात आल्या.

सायंकाळपासून बालगोपाळ व तरुणांनी शहरातून या नरकासुर प्रतिमांची धिंड काढली. आकर्षक सजावट व विविध मुद्रांमधील साकारलेल्या नरकासुराच्या प्रतिमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रात्री उशिरापर्यंत तसेच पुन्हा पहाटे या प्रतिमांची वाजत गाजत व फटाक्यांची आतषबाजी करत धिंड काढण्यात आली.

यानंतर मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यावर पहाटे ४ वाजल्यापासून या नरकासूर प्रतिमांचे दहन करण्यात आले. सकाळी सात पर्यंत सुमारे २५ ते ३० नरकासूर प्रतिमांचे दहन करण्यात आले. यावेळी मालवणातील बहुसंख्य नागरिकांनी मालवण बंदर जेटी किनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती.

नरकचतुर्दशीनिमित्त मालवण शिवसेनेतर्फे भरड नका येथे नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बहुसंख्य बालगोपाळ मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होत आकर्षक नरकासूर प्रतिमा सादर केल्या होत्या. या स्पर्धेत बांगीवाडा मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.

अवि कामते मित्र मंडळ द्वितीय व जोशी मित्रमंडळ, मेढा यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या मंडळाना आमदार वैभव नाईक यांनी पुरस्कृत केलेली पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन शिंदे, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, नंदू गवंडी, किरण वाळके, राजू परब, नगरसेविका आकांशा शिरपुटे, दिपा शिंदे आदी व इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपास्थित होते.

टॅग्स :diwaliदिवाळीkonkanकोकण