शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

मालवण देवलीत डोंगर खचला

By admin | Updated: June 30, 2016 00:06 IST

पावसाचा हाहाकार : सहा कुटुंबीयांचे स्थलांतर

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर चार दिवस धुवाधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मालवण तालुक्यातील देवली-वाघवणे येथे डोंगर खचण्याची घटना घडली आहे. येथील वसंत कृष्णा चव्हाण व बाळाजी गोपाळ चव्हाण कुटुंबीयांच्या घराची संरक्षक भिंत कोसळल्याने लगतच्या सहा घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. महसूल प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत सहाही घरांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, डोंगर धोकादायक असल्याने प्रशासनाने डोंगर माथ्यावर वसलेल्या ४० कुटुंबांना यापूर्वीच स्थलांतराच्या नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार वाघवणेवाडीतील ग्रामस्थांनी वाघवणे सडा येथे शेत मांगरात स्थलांतर केले आहे. ज्या कुटुंबाना राहण्याची व्यवस्था नाही, अशा कुटुंबांची प्राथमिक शाळा अथवा ग्रामपंचायत कार्यालयात व्यवस्था केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात १३४ मि.मी.च्या सरासरीने १०७४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मालवण तालुक्यात दिवसभरात १३६ मि.मी.पावसासह महिन्याभरात १४९३ मि.मी. एवढा विक्रमी पाऊस कोसळला आहे. मालवण शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही ही स्थिती आहे. मालवण बाजारपेठेतही अनेक रस्ते पाण्याखाली गेले. काही दुकाने, घरातही पाणी घुसल्याचे चित्र होते. देवली-वाघवणे-मधलीवाडी येथे डोंगराचा काही भाग खचण्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. डोंगरावर वसलेल्या वसंत चव्हाण व बाळाजी चव्हाण यांच्या नव्याने दुरुस्ती करण्यात आलेल्या घरालगत असलेली भली मोठी संरक्षक भिंत खचली आहे. यात दगड-माती कोसळल्याने घराच्या छपराचा काही भाग खाली कोसळला. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळल्याने धोकदायक स्थिती निर्माण झाली आहे. खचलेल्या भितींच्या खाली असलेल्या पुंडलिक चव्हाण गंगाराम चव्हाण, अनुसया चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, एकनाथ चव्हाण, रमेश सावंत यांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. या घरातील लहान-मोठ्या सर्वांनीच स्थलांतर करताना वाघवणे सडा येथील शेतमांगरात आसरा घेतला आहे. (प्रतिनिधी) तहसीलदारांकडून पाहणीवाघवणे येथे डोंगराचा काही भाग खचल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार वनिता पाटील यांनी तत्काळ दखल घेतली. नायब तहसीलदार जी. के. सावंत, तलाठी श्रीमती शिवलकर, कोतवाल देऊलकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाहणी केली. देवली सरपंचांशी संपर्क साधून तत्काळ उपाययोजना हाती घेतल्या, तर धोकादायक बनलेल्या वसंत व बाळाजी चव्हाण कुटुंबीयांशी मुंबईत संपर्क साधून त्यांना तत्काळ पाचारण करण्यात आले आहे. जवळची सर्व घरे खाली करून कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यात आले आहे.तळाशील येथे घर कोसळलेकिनारपट्टीवरील तळाशील येथे भरत कोचरेकर यांचे घर मुसळधार पावसात कोसळले. यात ७० हजारांचे नुकसान झाले आहे. तर वायरी येथील कोळगे कुटुंबीयांच्या घरावर चिंचेचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. तसेच शहरात पालिकेसमोर आंब्याचे झाड वीज वाहिन्यांवर कोसळले. तर तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. या साऱ्या प्रकारात नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, महेंद्र म्हाडगूत, सन्मेश परब, हरी खोबरेकर यांसह अन्य नगरसेवक, लोकप्रतिनिधी आपत्ती स्थितीत मदतकार्यात सहभागी झाले होते. वीज कर्मचारी, पालिका कर्मचारी यानाही तारेवरची कसरत करावी लागत होती.पेंडूर येथे पडझडमुसळधार पावसाचा फटका पेंडूर खरारे येथील गोपाळ लक्ष्मण वालावलकर कुटंबीयांनाही बसला. त्यांची विहीर कोसळून सुमारे दोन लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे. तर खरारे येथील कल्पना अशोक सावंत यांची चिरेबंदी भिंत कोसळली. यात शौचालयासह २५ हजारांचे नुकसान झाले आहे. तर पोईप- देऊळवाडी येथील जयवंत पोईपकर यांच्या शेतमांगरावर चिंचे झाड कोसळले. यात मांगराचे मोठे नुकसान झाले, तर एक बैलही जखमी झाल्याने दोन लाखांचे नुकसान झाले आहे.