शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मालवण देवलीत डोंगर खचला

By admin | Updated: June 30, 2016 00:06 IST

पावसाचा हाहाकार : सहा कुटुंबीयांचे स्थलांतर

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर चार दिवस धुवाधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मालवण तालुक्यातील देवली-वाघवणे येथे डोंगर खचण्याची घटना घडली आहे. येथील वसंत कृष्णा चव्हाण व बाळाजी गोपाळ चव्हाण कुटुंबीयांच्या घराची संरक्षक भिंत कोसळल्याने लगतच्या सहा घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. महसूल प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत सहाही घरांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, डोंगर धोकादायक असल्याने प्रशासनाने डोंगर माथ्यावर वसलेल्या ४० कुटुंबांना यापूर्वीच स्थलांतराच्या नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार वाघवणेवाडीतील ग्रामस्थांनी वाघवणे सडा येथे शेत मांगरात स्थलांतर केले आहे. ज्या कुटुंबाना राहण्याची व्यवस्था नाही, अशा कुटुंबांची प्राथमिक शाळा अथवा ग्रामपंचायत कार्यालयात व्यवस्था केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात १३४ मि.मी.च्या सरासरीने १०७४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मालवण तालुक्यात दिवसभरात १३६ मि.मी.पावसासह महिन्याभरात १४९३ मि.मी. एवढा विक्रमी पाऊस कोसळला आहे. मालवण शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही ही स्थिती आहे. मालवण बाजारपेठेतही अनेक रस्ते पाण्याखाली गेले. काही दुकाने, घरातही पाणी घुसल्याचे चित्र होते. देवली-वाघवणे-मधलीवाडी येथे डोंगराचा काही भाग खचण्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. डोंगरावर वसलेल्या वसंत चव्हाण व बाळाजी चव्हाण यांच्या नव्याने दुरुस्ती करण्यात आलेल्या घरालगत असलेली भली मोठी संरक्षक भिंत खचली आहे. यात दगड-माती कोसळल्याने घराच्या छपराचा काही भाग खाली कोसळला. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळल्याने धोकदायक स्थिती निर्माण झाली आहे. खचलेल्या भितींच्या खाली असलेल्या पुंडलिक चव्हाण गंगाराम चव्हाण, अनुसया चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, एकनाथ चव्हाण, रमेश सावंत यांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. या घरातील लहान-मोठ्या सर्वांनीच स्थलांतर करताना वाघवणे सडा येथील शेतमांगरात आसरा घेतला आहे. (प्रतिनिधी) तहसीलदारांकडून पाहणीवाघवणे येथे डोंगराचा काही भाग खचल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार वनिता पाटील यांनी तत्काळ दखल घेतली. नायब तहसीलदार जी. के. सावंत, तलाठी श्रीमती शिवलकर, कोतवाल देऊलकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाहणी केली. देवली सरपंचांशी संपर्क साधून तत्काळ उपाययोजना हाती घेतल्या, तर धोकादायक बनलेल्या वसंत व बाळाजी चव्हाण कुटुंबीयांशी मुंबईत संपर्क साधून त्यांना तत्काळ पाचारण करण्यात आले आहे. जवळची सर्व घरे खाली करून कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यात आले आहे.तळाशील येथे घर कोसळलेकिनारपट्टीवरील तळाशील येथे भरत कोचरेकर यांचे घर मुसळधार पावसात कोसळले. यात ७० हजारांचे नुकसान झाले आहे. तर वायरी येथील कोळगे कुटुंबीयांच्या घरावर चिंचेचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. तसेच शहरात पालिकेसमोर आंब्याचे झाड वीज वाहिन्यांवर कोसळले. तर तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. या साऱ्या प्रकारात नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, महेंद्र म्हाडगूत, सन्मेश परब, हरी खोबरेकर यांसह अन्य नगरसेवक, लोकप्रतिनिधी आपत्ती स्थितीत मदतकार्यात सहभागी झाले होते. वीज कर्मचारी, पालिका कर्मचारी यानाही तारेवरची कसरत करावी लागत होती.पेंडूर येथे पडझडमुसळधार पावसाचा फटका पेंडूर खरारे येथील गोपाळ लक्ष्मण वालावलकर कुटंबीयांनाही बसला. त्यांची विहीर कोसळून सुमारे दोन लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे. तर खरारे येथील कल्पना अशोक सावंत यांची चिरेबंदी भिंत कोसळली. यात शौचालयासह २५ हजारांचे नुकसान झाले आहे. तर पोईप- देऊळवाडी येथील जयवंत पोईपकर यांच्या शेतमांगरावर चिंचे झाड कोसळले. यात मांगराचे मोठे नुकसान झाले, तर एक बैलही जखमी झाल्याने दोन लाखांचे नुकसान झाले आहे.