शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

मालवण देवलीत डोंगर खचला

By admin | Updated: June 30, 2016 00:06 IST

पावसाचा हाहाकार : सहा कुटुंबीयांचे स्थलांतर

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर चार दिवस धुवाधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मालवण तालुक्यातील देवली-वाघवणे येथे डोंगर खचण्याची घटना घडली आहे. येथील वसंत कृष्णा चव्हाण व बाळाजी गोपाळ चव्हाण कुटुंबीयांच्या घराची संरक्षक भिंत कोसळल्याने लगतच्या सहा घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. महसूल प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत सहाही घरांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, डोंगर धोकादायक असल्याने प्रशासनाने डोंगर माथ्यावर वसलेल्या ४० कुटुंबांना यापूर्वीच स्थलांतराच्या नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार वाघवणेवाडीतील ग्रामस्थांनी वाघवणे सडा येथे शेत मांगरात स्थलांतर केले आहे. ज्या कुटुंबाना राहण्याची व्यवस्था नाही, अशा कुटुंबांची प्राथमिक शाळा अथवा ग्रामपंचायत कार्यालयात व्यवस्था केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात १३४ मि.मी.च्या सरासरीने १०७४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मालवण तालुक्यात दिवसभरात १३६ मि.मी.पावसासह महिन्याभरात १४९३ मि.मी. एवढा विक्रमी पाऊस कोसळला आहे. मालवण शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही ही स्थिती आहे. मालवण बाजारपेठेतही अनेक रस्ते पाण्याखाली गेले. काही दुकाने, घरातही पाणी घुसल्याचे चित्र होते. देवली-वाघवणे-मधलीवाडी येथे डोंगराचा काही भाग खचण्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. डोंगरावर वसलेल्या वसंत चव्हाण व बाळाजी चव्हाण यांच्या नव्याने दुरुस्ती करण्यात आलेल्या घरालगत असलेली भली मोठी संरक्षक भिंत खचली आहे. यात दगड-माती कोसळल्याने घराच्या छपराचा काही भाग खाली कोसळला. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळल्याने धोकदायक स्थिती निर्माण झाली आहे. खचलेल्या भितींच्या खाली असलेल्या पुंडलिक चव्हाण गंगाराम चव्हाण, अनुसया चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, एकनाथ चव्हाण, रमेश सावंत यांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. या घरातील लहान-मोठ्या सर्वांनीच स्थलांतर करताना वाघवणे सडा येथील शेतमांगरात आसरा घेतला आहे. (प्रतिनिधी) तहसीलदारांकडून पाहणीवाघवणे येथे डोंगराचा काही भाग खचल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार वनिता पाटील यांनी तत्काळ दखल घेतली. नायब तहसीलदार जी. के. सावंत, तलाठी श्रीमती शिवलकर, कोतवाल देऊलकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाहणी केली. देवली सरपंचांशी संपर्क साधून तत्काळ उपाययोजना हाती घेतल्या, तर धोकादायक बनलेल्या वसंत व बाळाजी चव्हाण कुटुंबीयांशी मुंबईत संपर्क साधून त्यांना तत्काळ पाचारण करण्यात आले आहे. जवळची सर्व घरे खाली करून कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यात आले आहे.तळाशील येथे घर कोसळलेकिनारपट्टीवरील तळाशील येथे भरत कोचरेकर यांचे घर मुसळधार पावसात कोसळले. यात ७० हजारांचे नुकसान झाले आहे. तर वायरी येथील कोळगे कुटुंबीयांच्या घरावर चिंचेचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. तसेच शहरात पालिकेसमोर आंब्याचे झाड वीज वाहिन्यांवर कोसळले. तर तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. या साऱ्या प्रकारात नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, महेंद्र म्हाडगूत, सन्मेश परब, हरी खोबरेकर यांसह अन्य नगरसेवक, लोकप्रतिनिधी आपत्ती स्थितीत मदतकार्यात सहभागी झाले होते. वीज कर्मचारी, पालिका कर्मचारी यानाही तारेवरची कसरत करावी लागत होती.पेंडूर येथे पडझडमुसळधार पावसाचा फटका पेंडूर खरारे येथील गोपाळ लक्ष्मण वालावलकर कुटंबीयांनाही बसला. त्यांची विहीर कोसळून सुमारे दोन लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे. तर खरारे येथील कल्पना अशोक सावंत यांची चिरेबंदी भिंत कोसळली. यात शौचालयासह २५ हजारांचे नुकसान झाले आहे. तर पोईप- देऊळवाडी येथील जयवंत पोईपकर यांच्या शेतमांगरावर चिंचे झाड कोसळले. यात मांगराचे मोठे नुकसान झाले, तर एक बैलही जखमी झाल्याने दोन लाखांचे नुकसान झाले आहे.