शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

मालवणला मुसळधार पावसाने झोडपले

By admin | Updated: June 28, 2016 00:34 IST

तालुक्यात लाखोंचे नुकसान : वादळाचा तडाखा

मालवण : मालवण तालुक्यात सोमवारी दिवसभर मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. सकाळी वादळी वाऱ्याने किनारपट्टी भागाला मोठा फटका बसला असून, मालवणसह देवबाग, वायंगणी गावाला वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने पाच लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. समुद्रही खवळला असून, अजस्र लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. सोमवारी दिवसभर पावसाच्या दमदार सरींनी हजेरी लावल्याने मालवणात ठिकठिकाणी पाणी साचले होते, तर ग्रामीण भागात पडझडीमुळे लाखोंची हानी झाली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. शहरातील गटारे, तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पादचाऱ्यांना चिखलाशी सामना करावा लागत होता. बंदर विभागाने समुद्रात लावलेला ‘बोया’ लाटांबरोबर किनाऱ्यावर आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी समुद्रात जलसमाधी मिळालेल्या बोटींचे अवशेष किनाऱ्यावर वाहून आले आहेत. मालवण तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून, जून महिन्यात १३०० मि.मी.ची पावसाने बरसात केली आहे. येत्या ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्यात पडझड : लाखोंची हानीमालवण शहरातील किनारपट्टी भागाला सकाळी वाऱ्यांचा फटका बसला. किनाऱ्यालगत मत्स्य व्यावसायिक ताम्हणकर यांच्या मत्स्य सेंटरलगत माड कोसळला, तर लगतची काही घरे व दुकाने यांचे पत्रे व छपराचा काही भाग उडून गेला. शहरातील सेवांगण मार्गावरील वीज वाहिनीवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला, तर काही काळ मार्गही बंद होता. तालुक्यातील वायंगणी तिठा येथील विष्णू शांताराम साळकर यांच्या गणेशमूर्ती शाळेवर आंब्याचे झाड कोसळल्याने सुमारे दोन लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे. मूर्तिशाळेतील नव्वद गणेशमूर्ती तुटून गेल्या आहेत. याबाबत वायंगणी सरपंच प्रज्ञा धुळे, उपसरपंच हनुमंत प्रभू, ग्रामस्थ, तलाठी, पोलिस पाटील यांनी मदतकार्य करून पंचनामा केला. सभापती हिमाली अमरे यांनी भेट देऊन तातडीने ताडपत्रीची व्यवस्था केली, तर वायंगणी पाटवाडी येथील रस्त्यावरच विद्युत वाहिनीवर जांभळाचे झाड पडल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. धोकादायक जांभळाच्या झाडाबाबत यापूर्वी वीज वितरणला माहिती देण्यात आली होती; मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)देवबागात बोटींचे नुकसानसोमवारी सकाळी वाऱ्याचा तडाखा देवबाग गावालाही बसला. किनाऱ्यालगत ठेवलेल्या तीन मासेमारी फायबर बोटींवर झाड कोसळल्याने दोन बोटी फुटल्या आहेत. यात गोपाल मधुसूदन कुमठेकर यांच्या एका बोटीने एक लाख, तर लक्ष्मण गणपत चिंदरकर यांच्या दोन बोटींचे मिळून एक लाख २० हजारांचे नुकसान झाले. याबाबत महसूल विभागाला माहिती दिली असता आपल्याकडे केवळ घर व गोठे यांचे नुकसान नोंदविले जाते असे सांगितले.मत्स्य विभागाकडेही कोणतीही नुकसानभरपाईची तरतूद नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत माजी उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.