शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
4
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
5
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
6
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
7
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
8
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
9
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
10
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
11
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
12
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
13
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
14
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
15
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
16
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
17
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
18
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
19
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
20
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

समाजात वेगळेपण निर्माण करा

By admin | Updated: December 26, 2014 00:19 IST

एम. के. गोंधळी : बांदा येथे आठवे कुमार साहित्य संमेलन

मडुरा : प्राचीन काळापासून पाषाणाला फार महत्त्व आहे. त्यामुळे आपण दगडातच देव पाहत आलो आहोत. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात आपले मन दगडासारखे होऊ नये, म्हणूनच अशा प्रकारच्या साहित्य संमेलनांची गरज आहे. समाजात आपले वेगळेपण प्रत्येकाने निर्माण केले पाहिजे. त्यामुळेच विद्यार्थी समाजात ओळखला जाऊ शकतो, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिक्षण विभागाचे उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी विद्यार्थी कुमार साहित्य संमेलनावेळी मार्गदर्शन करताना केले.येथील धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संस्थेच्या खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातील सभागृहात आठवे नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलन गुरुवारी पार पडले. यावेळी संस्था कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक राजा शिरगुप्पे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे, ज्येष्ठ कथालेखक जयवंत आवटे, सांगली इस्लामपूर येथील कवी प्रा. डॉ. सूरज चौगुले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या कुमार साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथाचे महत्त्व विद्यार्थ्यांसह जनमाणसात पोहोचण्यासाठी ग्रंथ दिंडीसह शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गेली अनेक वर्षे बांदा परिसरात अशा प्रकारची साहित्य संमेलने सुरु आहेत. साहित्याच्या जवळ जाण्याची संधी अशाच कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळते. तसेच साहित्यिक वा कवींच्या जडणघडणीचा प्रवासही त्यांना अनुभवयास मिळतो. त्यामुळेच याच विद्यार्थ्यांमधून भावी लेखक व कवी घडतील, अशी आशा आबासाहेब तोरसकर यांनी व्यक्त केली. यानंतर अन्य मान्यवरांनीही समायोजित मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अ‍ॅड. नारायण वायंगणकर, सीमा तोरसकर, एल.डी. सावंत, मोहन नाईक, देविदास मोरे, एम. डी. मोरबाळे, प्रमोद सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार कैलास जाधव यांनी मानले. (वार्ताहर)एकाग्रता महत्त्वाचीसाहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी समाजाला साहित्यिकाची गरज आहे. आपण आज जे काही आहोत ते शाळेतील शिक्षकांमुळेच. चौथीत असतानाच शिक्षकांनी कविता पाहून आपणास साहित्यिक वा लेखक होऊ शकतोस असे सांगितले. आणि त्यानंतर त्याच प्रेरणेच्या आधारे आज तुम्हासमोर उभा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी श्रवण, निरीक्षण व भ्रमण या तीन गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यानंतर मनन व चिंतनातून कविता स्फुरते. मात्र, त्यासाठी ध्येयासाठीची एकाग्रता महत्त्वाची आहे, असे सांगितले.