शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

समाजात वेगळेपण निर्माण करा

By admin | Updated: December 26, 2014 00:19 IST

एम. के. गोंधळी : बांदा येथे आठवे कुमार साहित्य संमेलन

मडुरा : प्राचीन काळापासून पाषाणाला फार महत्त्व आहे. त्यामुळे आपण दगडातच देव पाहत आलो आहोत. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात आपले मन दगडासारखे होऊ नये, म्हणूनच अशा प्रकारच्या साहित्य संमेलनांची गरज आहे. समाजात आपले वेगळेपण प्रत्येकाने निर्माण केले पाहिजे. त्यामुळेच विद्यार्थी समाजात ओळखला जाऊ शकतो, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिक्षण विभागाचे उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी विद्यार्थी कुमार साहित्य संमेलनावेळी मार्गदर्शन करताना केले.येथील धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संस्थेच्या खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातील सभागृहात आठवे नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलन गुरुवारी पार पडले. यावेळी संस्था कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक राजा शिरगुप्पे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे, ज्येष्ठ कथालेखक जयवंत आवटे, सांगली इस्लामपूर येथील कवी प्रा. डॉ. सूरज चौगुले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या कुमार साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथाचे महत्त्व विद्यार्थ्यांसह जनमाणसात पोहोचण्यासाठी ग्रंथ दिंडीसह शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गेली अनेक वर्षे बांदा परिसरात अशा प्रकारची साहित्य संमेलने सुरु आहेत. साहित्याच्या जवळ जाण्याची संधी अशाच कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळते. तसेच साहित्यिक वा कवींच्या जडणघडणीचा प्रवासही त्यांना अनुभवयास मिळतो. त्यामुळेच याच विद्यार्थ्यांमधून भावी लेखक व कवी घडतील, अशी आशा आबासाहेब तोरसकर यांनी व्यक्त केली. यानंतर अन्य मान्यवरांनीही समायोजित मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अ‍ॅड. नारायण वायंगणकर, सीमा तोरसकर, एल.डी. सावंत, मोहन नाईक, देविदास मोरे, एम. डी. मोरबाळे, प्रमोद सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार कैलास जाधव यांनी मानले. (वार्ताहर)एकाग्रता महत्त्वाचीसाहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी समाजाला साहित्यिकाची गरज आहे. आपण आज जे काही आहोत ते शाळेतील शिक्षकांमुळेच. चौथीत असतानाच शिक्षकांनी कविता पाहून आपणास साहित्यिक वा लेखक होऊ शकतोस असे सांगितले. आणि त्यानंतर त्याच प्रेरणेच्या आधारे आज तुम्हासमोर उभा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी श्रवण, निरीक्षण व भ्रमण या तीन गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यानंतर मनन व चिंतनातून कविता स्फुरते. मात्र, त्यासाठी ध्येयासाठीची एकाग्रता महत्त्वाची आहे, असे सांगितले.