शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : नाणारच्या माध्यमातून विकासाची गंगा : जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:30 IST

नाणार प्रकल्पाच्या माध्यमातूनच कोकणात विकासाची गंगा आणणार आहोत. मात्र, गिर्ये, रामेश्वर गावांना हा प्रकल्प नको असेल तर ही दोन्ही गावे वगळणार असून विकासाचा रथ २५ वर्षे दौडतच राहणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात भाजप युग सुरू झाले असून २०२४ मध्ये कोकणात शत-प्रतिशत भाजप असेल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देनाणारच्या माध्यमातून विकासाची गंगा : प्रमोद जठार यांची ग्वाही २०२४ पर्यंत कोकणात शत-प्रतिशत भाजप असेल

देवगड : नाणार प्रकल्पाच्या माध्यमातूनच कोकणात विकासाची गंगा आणणार आहोत. मात्र, गिर्ये, रामेश्वर गावांना हा प्रकल्प नको असेल तर ही दोन्ही गावे वगळणार असून विकासाचा रथ २५ वर्षे दौडतच राहणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात भाजप युग सुरू झाले असून २०२४ मध्ये कोकणात शत-प्रतिशत भाजप असेल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.जामसंडे येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जठार बोलत होते. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंंजवडेकर, पंचायत समिती सदस्य सुनील पारकर, शहराध्यक्ष योगेश पाटकर, अनंत फडके आदी उपस्थित होते.यावेळी जठार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या कणकवली येथील जाहीर प्रचार सभेवेळी स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन होणार असून याचवेळी मेगाभरती होणार आहे. शक्ती व युक्तीचे मिलन यावेळी झालेले बघायला मिळेल. जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढताना दिसत असून तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राजापुरात दरवर्षी जशी गंगा प्रकट होते तशी नाणार प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाची गंगा कोकणात येणार आहे. गिर्ये, रामेश्वर गावांची संमती नसेल तर त्या गावांना वगळून रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगतची गावे जागा देण्यास तयार आहेत. त्यांचा यामध्ये समावेश करण्यात येईल, असे जठार यांनी सांगितले.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, संदेश पारकर यांनी पक्षनिष्ठेबद्दल बोलू नये. त्यांच्याजवळ पक्षही नाही व निष्ठाही नाही. पक्षनिष्ठा विनोद तावडेंकडून शिकावी. त्यांना पक्षाने तिकीट नाकारूनही भाजप उमेदवाराच्या प्रचाराला ते आले. पारकर यांना शत्रू व मित्र ओळखता आले नाहीत.कणकवली नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने कपटाने त्यांचा पराभव केला. पारकर यांच्या सांगण्यावरूनच आम्ही युती केली होती. तो पराभव पारकर यांचा नव्हता, तर भाजपाचा होता. त्याचा बदला घेण्यासाठी भाजपाचे शिलेदार तयार आहेत.या निवडणुकीत युती असतानाही कणकवली मतदारसंघात शिवसेनेने उमेदवाराला ए आणि बी फॉर्म दिला. अशा कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. नीतेश राणे यांना उमेदवारी देणे हा पक्षाध्यक्षांचा आदेश होता. आम्ही त्याची फक्त अंमलबजावणी केली. जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पक्ष हाऊसफुल्ल होऊ लागला आहे. तर शिवसेनेमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांना एका सभेऐवजी जिल्ह्यात तीन सभा घ्याव्या लागत आहेत.राजन तेली बंडखोर नाहीत. ते अपक्ष उमेदवार आहेत. कणकवली विधानसभेमध्ये शिवसेनेने ए व बी फॉर्म देऊनयुतीधर्म तोडला. उलट आम्ही कोणालाच ए व बी फॉर्म दिला नव्हता. कणकवलीतील अ‍ॅक्शनची कुडाळ व सावंतवाडी ही रिअ‍ॅक्शन असून सतीश सावंत हे बेकायदेशीर उमेदवार आहेत, असा हल्लाबोल जठार यांनी केला. सदाशिव ओगले, सुनील पारकर हे भाजपासोबतच आहेत, असे जठार यांनी यावेळी सांगितले.साळसकर शिवसेनेची मते विकणारे : गोगटेमी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाला वाटले तुम्ही काम करावे. पक्षाने आदेश दिला आणि मी कामाला सुरुवात केली. त्यामुळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख साळसकरांच्या दाखल्यांची गरज नाही. प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेची मते लिलाव पध्दतीने विकणे ही साळसकर यांची खासियत आहे. गत निवडणुकीत २५ हजार मते शिवसेनेची आहेत असे म्हणणाऱ्या शिवसेनेला फक्त १२ हजार मते मिळाली. उरलेली मते गेली कुठे? या निवडणुकीतही शिवसेनेची मते विकली तर जाणार नाहीत ना, अशी शंकाही गोगटे यांनी व्यक्त केली.शिवसेनेवर घणाघातशिवसेनेला खूप मोठी संधी कोकणातील जनतेने दिली. खासदार, आमदार, पालकमंत्री ही पदे शिवसेनेला दिली. मात्र, सातत्याने विकास व विकास प्रकल्पांना आडवे जाण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या मांजरांनी केला. आरोग्यमंत्री देवगड तालुक्याचे सुपुत्र असूनही आरोग्याचा प्रश्न सुटला नाही. उद्योग न आणणारे निरूद्योगी उद्योगमंत्री फक्त भाषण करून जातात. गृह व अर्थराज्यमंत्री जिल्ह्यातील असूनही आर्थिक सुबत्ता आली नाही, अशी खिल्ली जठार यांनी उडविली.

टॅग्स :kankavli-acकणकवलीPramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग