शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मडुरा गावाला मगरींची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 11:57 PM

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : तेरेखोल नदीकाठी वसलेल्या मडुरा गावात दिवसेंदिवस मगरींची दहशत वाढतच आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर सुकळवाड येथील शेतात आहे. या विहिरीच्या बाजूला मगरींचे वास्तव्य असलेली नदी वाहत असल्यामुळे गेले तीन दिवस गावातील पाच वाड्यांचा पाणीपुरवठा खंडित आहे. ग्रामपंचायत नळकामगार मगरींच्या धास्तीने पाणी सोडण्यासाठी एकटा जाण्यास घाबरत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : तेरेखोल नदीकाठी वसलेल्या मडुरा गावात दिवसेंदिवस मगरींची दहशत वाढतच आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर सुकळवाड येथील शेतात आहे. या विहिरीच्या बाजूला मगरींचे वास्तव्य असलेली नदी वाहत असल्यामुळे गेले तीन दिवस गावातील पाच वाड्यांचा पाणीपुरवठा खंडित आहे. ग्रामपंचायत नळकामगार मगरींच्या धास्तीने पाणी सोडण्यासाठी एकटा जाण्यास घाबरत आहे. याकडे ग्रामपंचायत तसेच वनविभागाने लक्ष देऊन गावात मगरींची असलेली दहशत दूर करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.मडुरा-सुकळवाड येथे शनिवारी सकाळी एक सुमारे बाराफुटी मगर व तीन म्हशींमध्ये सुरू असलेले थरारनाट्य पाणी सोडण्यासाठी गेलेल्या नळकामगार बाबली परब यांनी अनुभवले. अचानक गुरांची झालेली धावपळ पाहून त्यांना जवळपास मगर असल्याचा संशय आला. ‘त्या’ मगरीच्या हल्ल्यात तीन म्हशी जखमी झाल्या होत्या. अशा जीवघेण्या परिसरात गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे.देऊळवाडी, रेडकरवाडी, बाबरवाडी, चौकेकरवाडी, डिगवाडीमध्ये गेले तीन दिवस पाणीपुरवठा खंडित होता. त्यामुळे गावातील महिलांची मोठी पंचाईत झाल्याने त्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यासोबतच गावात सुरू असलेले मगरींचे हल्ले पाहून ग्रामस्थ तसेच महिलांनी कोणत्याही प्रकारचा आक्रमक पवित्रा न घेता नळकामगारास सहकार्य केले. मात्र यावेळी वनविभागावर ताशेरे ओढण्यात आले.वनविभाग मगरींसंदर्भात कोणत्याही हालचाली करत नसून हल्ल्याबरोबरच आता आम्हांला पिण्यासाठी पाणीसुद्धा मिळणे कठीण झाले असल्याचे काही महिलांनी बोलून दाखविले. याकडे वनविभाग व ग्रामपंचायत यांनी तातडीने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.दुसºयांसाठी आपला जीव धोक्यातआपला जीव धोक्यात घालून सुकळवाड येथील शेतात असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवर पाणी सोडण्यासाठी जावे लागत आहे. प्रत्येक दिवशी एकतरी सोबती घेऊनच याठिकाणी येणे गरजेचे आहे. दबा धरून बसलेल्या मगरी कधी फस्त करतील याचे काही सांगता येत नाही. गेले तीन दिवस विजेच्या समस्या तसेच महत्त्वाचे म्हणजे मगरींच्या दहशतीमुळे पाणी सोडण्यास अडचण येत असल्याचे मडुरा ग्रामपंचायत नळकामगार बाबली परब यांनी सांगितले.