शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

पाण्याचे व्यवस्थापन खोरेनिहाय व्हावे माधव

By admin | Updated: November 18, 2015 00:04 IST

चितळे : चिपळूण नगर परिषदेतर्फे जलतज्ज्ञांचा नागरी सत्कार

चिपळूण : कोकणाला भौगोलिक अशी परंपरा लाभली आहे. तो आर्थिक दुर्बल का राहिला, याचा विचार करुन हे चित्र बदलायचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन खोरेनिहाय होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी केले. शहरातील गुरुदक्षिणा सभागृहात नगर परिषदेतर्फे चितळे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सावित्री होमकळस, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, लोकमान्य टिळक वाचन मंदिरचे अध्यक्ष अरविंद जाधव, उपनगराध्यक्ष शौकत काद्री, रणजित खानविलकर, डॉ. दत्ताजी देशकर, श्रीरंग कद्रेकर आदींची उपस्थिती होती. कोयना परिसरात मोठा भूकंप झाला. यामध्ये २०० जण दगावले. घरांचेही नुकसान झाले. भूकंपातून प्रकल्प सावरण्याची जबाबदारी आपणावर आली. त्यामुळे चिपळूण शहराशी आपला प्रदीर्घ संबंध आहे. भूकंपाचे हादरे शहराला बसले. मात्र, येथील मानसिकतेला तडा गेला नाही, ही आनंदाची बाब आहे. भूकंप क्षेत्रात परशुराम एज्युकेशन सोसायटीने शाळा काढल्या. त्यामध्ये चिपळूण नगरीचेही ऋण आहे. कोकणातील माणसाचं जवळून निरीक्षण करण्याचा योग यानिमित्ताने आला, असे चितळे म्हणाले. कोकणाला भौगोलिक परंपरा आहे. पाण्याचे व्यवस्थापन व नियोजन कसे करायचे, याची तरतूद घटनेत आहे. कोकणामध्ये २५ खोरी आहेत. येथील लोक ही खोरी कशी हाताळणार, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. येथील तरुण नोकरीसाठी मुंबईला जात आहेत. कोकणाच्या गळ्यात मुंबई ही धोंड आहे. आपली ताकद कशात आहे, याची विचार करण्याची गरज आहे. यापूर्वी पाण्याचा विनियोग करीत होतो. परंतु, भविष्यात यावर लोकसहभागातून जनजागृतीची आवश्यकता आहे. पऱ्हे, तलाव शोधून काढून त्याचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. नव्या आधुनिक व्यवस्थेत यायचे असेल तर आपली दृष्टी मुंबईकडे आहे ती कोकणाकडे वळवली पाहिजे. कोकणातील विकासाचा पाया कच्चा आहे. वेगळा स्वतंत्र विभाग म्हणून कोकणकडे पाहिले पाहिजे. वेगळ्या पद्धतीने समाज जीवनाचा विचार व्हायला हवा, असेही चितळे यांनी सांगितले. (वार्ताहर)