शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

पाण्याचे व्यवस्थापन खोरेनिहाय व्हावे माधव

By admin | Updated: November 18, 2015 00:04 IST

चितळे : चिपळूण नगर परिषदेतर्फे जलतज्ज्ञांचा नागरी सत्कार

चिपळूण : कोकणाला भौगोलिक अशी परंपरा लाभली आहे. तो आर्थिक दुर्बल का राहिला, याचा विचार करुन हे चित्र बदलायचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन खोरेनिहाय होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी केले. शहरातील गुरुदक्षिणा सभागृहात नगर परिषदेतर्फे चितळे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सावित्री होमकळस, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, लोकमान्य टिळक वाचन मंदिरचे अध्यक्ष अरविंद जाधव, उपनगराध्यक्ष शौकत काद्री, रणजित खानविलकर, डॉ. दत्ताजी देशकर, श्रीरंग कद्रेकर आदींची उपस्थिती होती. कोयना परिसरात मोठा भूकंप झाला. यामध्ये २०० जण दगावले. घरांचेही नुकसान झाले. भूकंपातून प्रकल्प सावरण्याची जबाबदारी आपणावर आली. त्यामुळे चिपळूण शहराशी आपला प्रदीर्घ संबंध आहे. भूकंपाचे हादरे शहराला बसले. मात्र, येथील मानसिकतेला तडा गेला नाही, ही आनंदाची बाब आहे. भूकंप क्षेत्रात परशुराम एज्युकेशन सोसायटीने शाळा काढल्या. त्यामध्ये चिपळूण नगरीचेही ऋण आहे. कोकणातील माणसाचं जवळून निरीक्षण करण्याचा योग यानिमित्ताने आला, असे चितळे म्हणाले. कोकणाला भौगोलिक परंपरा आहे. पाण्याचे व्यवस्थापन व नियोजन कसे करायचे, याची तरतूद घटनेत आहे. कोकणामध्ये २५ खोरी आहेत. येथील लोक ही खोरी कशी हाताळणार, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. येथील तरुण नोकरीसाठी मुंबईला जात आहेत. कोकणाच्या गळ्यात मुंबई ही धोंड आहे. आपली ताकद कशात आहे, याची विचार करण्याची गरज आहे. यापूर्वी पाण्याचा विनियोग करीत होतो. परंतु, भविष्यात यावर लोकसहभागातून जनजागृतीची आवश्यकता आहे. पऱ्हे, तलाव शोधून काढून त्याचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. नव्या आधुनिक व्यवस्थेत यायचे असेल तर आपली दृष्टी मुंबईकडे आहे ती कोकणाकडे वळवली पाहिजे. कोकणातील विकासाचा पाया कच्चा आहे. वेगळा स्वतंत्र विभाग म्हणून कोकणकडे पाहिले पाहिजे. वेगळ्या पद्धतीने समाज जीवनाचा विचार व्हायला हवा, असेही चितळे यांनी सांगितले. (वार्ताहर)