शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे व्यवस्थापन खोरेनिहाय व्हावे माधव

By admin | Updated: November 18, 2015 00:04 IST

चितळे : चिपळूण नगर परिषदेतर्फे जलतज्ज्ञांचा नागरी सत्कार

चिपळूण : कोकणाला भौगोलिक अशी परंपरा लाभली आहे. तो आर्थिक दुर्बल का राहिला, याचा विचार करुन हे चित्र बदलायचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन खोरेनिहाय होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी केले. शहरातील गुरुदक्षिणा सभागृहात नगर परिषदेतर्फे चितळे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सावित्री होमकळस, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, लोकमान्य टिळक वाचन मंदिरचे अध्यक्ष अरविंद जाधव, उपनगराध्यक्ष शौकत काद्री, रणजित खानविलकर, डॉ. दत्ताजी देशकर, श्रीरंग कद्रेकर आदींची उपस्थिती होती. कोयना परिसरात मोठा भूकंप झाला. यामध्ये २०० जण दगावले. घरांचेही नुकसान झाले. भूकंपातून प्रकल्प सावरण्याची जबाबदारी आपणावर आली. त्यामुळे चिपळूण शहराशी आपला प्रदीर्घ संबंध आहे. भूकंपाचे हादरे शहराला बसले. मात्र, येथील मानसिकतेला तडा गेला नाही, ही आनंदाची बाब आहे. भूकंप क्षेत्रात परशुराम एज्युकेशन सोसायटीने शाळा काढल्या. त्यामध्ये चिपळूण नगरीचेही ऋण आहे. कोकणातील माणसाचं जवळून निरीक्षण करण्याचा योग यानिमित्ताने आला, असे चितळे म्हणाले. कोकणाला भौगोलिक परंपरा आहे. पाण्याचे व्यवस्थापन व नियोजन कसे करायचे, याची तरतूद घटनेत आहे. कोकणामध्ये २५ खोरी आहेत. येथील लोक ही खोरी कशी हाताळणार, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. येथील तरुण नोकरीसाठी मुंबईला जात आहेत. कोकणाच्या गळ्यात मुंबई ही धोंड आहे. आपली ताकद कशात आहे, याची विचार करण्याची गरज आहे. यापूर्वी पाण्याचा विनियोग करीत होतो. परंतु, भविष्यात यावर लोकसहभागातून जनजागृतीची आवश्यकता आहे. पऱ्हे, तलाव शोधून काढून त्याचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. नव्या आधुनिक व्यवस्थेत यायचे असेल तर आपली दृष्टी मुंबईकडे आहे ती कोकणाकडे वळवली पाहिजे. कोकणातील विकासाचा पाया कच्चा आहे. वेगळा स्वतंत्र विभाग म्हणून कोकणकडे पाहिले पाहिजे. वेगळ्या पद्धतीने समाज जीवनाचा विचार व्हायला हवा, असेही चितळे यांनी सांगितले. (वार्ताहर)