शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

खरंच कोकणी जनतेनं पुन्हा राणेंना नाकारलं ?

By वैभव देसाई | Updated: May 28, 2019 07:00 IST

23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा मोदींचा वारू चौफेर उधळला.

- वैभव देसाई23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा मोदींचा वारू चौफेर उधळला. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपानं 200 किंवा 250 नव्हे, तर तब्बल 303 जागा जिंकल्या. त्यामुळे साहजिकच विरोधकांचा पुरता भ्रमनिराश झाला. विशेष म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालही धक्कादायक म्हणावा लागेल. कारण शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल कोकणी जनतेत फारसा जनाधार असल्याचं निवडणुकीदरम्यान दिसलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या मनातही कुठे तरी पराभवाची पाल चुकचुकत होती. या लढतीत मोदी प्रभावामुळे भाजपाची मते धनुष्यबाणाला मिळाली आणि विनायक राऊत यांचा विजय सुकर झाला. शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 4,58,022 एवढी मतं मिळाली असून, निलेश राणेंच्या पारड्यात 2,79,700 मते पडली. विनायक राऊत यांनी निलेश राणेंवर यंदा 1 लाख 78 हजार 322 मतांनी विजय मिळवला. निलेश राणे यांच्या पराभवामुळे ईव्हीएमबद्दलही संशयाचं भूत निर्माण झालंय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक निकालात EVM मशिनमध्ये trending set केल्याचा आरोपही स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला. सुरुवातीपासूनच प्रत्येक फेरीत रत्नागिरी-सिंधुदुर्गात राऊत आणि राणे या दोन्ही उमेदवारांना ठराविक अंदाजात मते कशी काय मिळू शकतात?, असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे.

नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमबद्दल संशयाचं वातावरण समाजाच्या अनेक स्तरांमध्ये असल्याचा उल्लेखही केला. त्यामुळे साहजिकच या विजयाबद्दल एकूणच कोकणी जनता साशंक आहे. असो. पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालामुळे कोकणातली राजकीय समीकरणं आता बदलणार आहेत. आताच्या निवडणुकीत सेना-भाजपा युती विरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणजेच नारायण राणे अशी लढत दिसली. पण या लढतीत एका अर्थी राणेंचा कोकणी जनतेनं पराभव केल्याचंही मान्य करावं लागेल. कणकवली या विधानसभा मतदारसंघात वैभववाडी आणि देवगड या तालुक्यांचा समावेश आहे. कणकवली हा पूर्वीपासून राणेंचा अभेद्य असा बालेकिल्ला समजला जातो. युतीकडून नेहमीच या जागेवर भाजपाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतो, कारण या मतदारसंघात शिवसेनेची म्हणावी तशी ताकद नाही. कणकवली विधानसभा मतदारसंघातून यंदा स्वाभिमानला 40 हजारांचं मताधिक्य पडण्याचा अंदाज असताना निलेश राणेंना विनायक राऊतांपेक्षा फक्त 10 हजार 731 एवढंच मताधिक्य मिळालं. तर विनायक राऊत यांना चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघांतून चांगलं मताधिक्य मिळालं. चिपळूणमध्ये राऊतांना 87,630 मते मिळाली तर निलेश राणेंना 30, 397 मतं मिळाली. त्यामुळे राऊतांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राणेंवर 57,233 मतांची आघाडी घेतली. तर रत्नागिरीत राऊतांना 1 लाखांचं मताधिक्य मिळालं, तर दुसरीकडे निलेश राणेंना 41 हजार एवढ्या मतांवरच समाधान मानावं लागलं.
कुडाळमधून निलेश राणेंना जास्त मते मिळाली नसली तरी सेनेच्या राऊतांना फक्त 63 हजार 909 मतांवर समाधान मानावं लागलं. या मतदारसंघात शिवसेनेचे वैभव नाईक आमदार असूनही शिवसेनेचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटलं. पण स्वाभिमान पक्षालाही अपेक्षित मते मिळालेली नाहीत. स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचा हा गड समजला जातो. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातही गेल्या वेळेपेक्षा यंदा शिवसेनेचं मताधिक्य कमी झालेलं आहे. यंदा शिवसेनेला या मतदारसंघातून 74 हजार 233 एवढी मतं मिळाली. तर स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना याच मतदारसंघातून 44 हजार 845 इतकी मतं मिळाल्यानं केसरकरांचा सावंतवाडीच्या जनतेवर असलेला प्रभाव हळूहळू कमी होत असल्याचंही चित्र समोर आलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गNilesh Raneनिलेश राणे Narayan Raneनारायण राणे