शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

रत्नागिरीचे लोकमान्य टिळक स्मारक सुटीच्या दिवशी बंद

By admin | Updated: April 2, 2015 00:42 IST

पर्यटकांची गैरसोय : परजिल्ह्यातील लोकांच्या पदरी निराशा

रत्नागिरी : लोकमान्य टिळक स्मारक रत्नागिरी शहराचे भूषण आहे. परंतु शासकीय सुटीच्या दिवशी स्मारक बंद ठेवण्यात येत असल्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना स्मारक न पाहताच परत फिरावे लागत आहे.शहरातील मधल्या आळीला लोकमान्य टिळक स्मारकामुळे टिळक आळी नाव पडले. गणपतीपुळे, पावस मार्गावर येणाऱ्या पर्यटकांची गर्दी स्मारक पहाण्यासाठी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु सुटीच्या दिवशी स्मारक सुरु ठेवण्याऐवजी चक्क बंद ठेवण्यात येते. याशिवाय आठवड्यातून अनेकवेळा स्मारक बंदच असते. परिणामी परगावच्या पर्यटकांना रस्त्यावरुनच स्मारक पाहून माघारी फिरावे लागते.लोकमान्य टिळकांच्या स्मारकाला अनेकजण सुटी पाहूनच भेट देतात. कारण, सलग सुट्ट्या असल्या तरच अनेकजण फिरण्याचा बेत आखतात. मात्र, त्याचकाळात हे स्मारक बंद असल्याने गैरसोय निर्माण होते.टिळक आळीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनेक नवीन सदनिका उभारण्यात आल्या आहेत. नगरपालिकेने सदनिका धारकांना परवानगी तर दिली आहे, परंतु अनेक सदनिकांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध नाही. परिणामी या परिसरातील अनेक सदनिका धारकांना रस्त्यावरच गाड्या लावाव्या लागतात. याशिवाय हॉटेल्स तसेच अन्य कामांसाठी येणाऱ्या परगावातील मंडळी टिळक आळीमध्ये गाड्या पार्किंग करुन शहरात अन्य कामासाठी निघून जातात.त्याचप्रमाणे स्मारक पहाण्यासाठी आलेल्या मोठ्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या असतात. या मार्गावर शहरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे मोठ्या गाड्यांमुळे तसेच रस्त्याच्या कडेला लावलेल्या छोट्या- मोठ्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. परंतु या ठिकाणी वाहतूक पोलीस, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. किंबहुना टिळक आळीतील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)लवकरच उन्हाळी सुटी होणार आहे. उन्हाळी सुटीमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. परंतु शासकीय सुट्टीच्या दिवशी स्मारक बंद ठेवल्यामुळे पर्यटक परत फिरतात. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने स्मारकामध्ये सुटीच्या दिवशीही आपल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. येथे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे केलेले पार्किंग त्रासदायक ठरत आहे. वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करुनसुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे निवेदनाद्वारे सुटीच्या दिवशी स्मारक सुरु ठेवण्याची व टिळक आळी रस्त्यावरील पार्किं ग व्यवस्था बंद करण्याची मागणी करण्यात येणार आहे.- राजाभाऊ लिमये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष