शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीचे लोकमान्य टिळक स्मारक सुटीच्या दिवशी बंद

By admin | Updated: April 2, 2015 00:42 IST

पर्यटकांची गैरसोय : परजिल्ह्यातील लोकांच्या पदरी निराशा

रत्नागिरी : लोकमान्य टिळक स्मारक रत्नागिरी शहराचे भूषण आहे. परंतु शासकीय सुटीच्या दिवशी स्मारक बंद ठेवण्यात येत असल्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना स्मारक न पाहताच परत फिरावे लागत आहे.शहरातील मधल्या आळीला लोकमान्य टिळक स्मारकामुळे टिळक आळी नाव पडले. गणपतीपुळे, पावस मार्गावर येणाऱ्या पर्यटकांची गर्दी स्मारक पहाण्यासाठी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु सुटीच्या दिवशी स्मारक सुरु ठेवण्याऐवजी चक्क बंद ठेवण्यात येते. याशिवाय आठवड्यातून अनेकवेळा स्मारक बंदच असते. परिणामी परगावच्या पर्यटकांना रस्त्यावरुनच स्मारक पाहून माघारी फिरावे लागते.लोकमान्य टिळकांच्या स्मारकाला अनेकजण सुटी पाहूनच भेट देतात. कारण, सलग सुट्ट्या असल्या तरच अनेकजण फिरण्याचा बेत आखतात. मात्र, त्याचकाळात हे स्मारक बंद असल्याने गैरसोय निर्माण होते.टिळक आळीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनेक नवीन सदनिका उभारण्यात आल्या आहेत. नगरपालिकेने सदनिका धारकांना परवानगी तर दिली आहे, परंतु अनेक सदनिकांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध नाही. परिणामी या परिसरातील अनेक सदनिका धारकांना रस्त्यावरच गाड्या लावाव्या लागतात. याशिवाय हॉटेल्स तसेच अन्य कामांसाठी येणाऱ्या परगावातील मंडळी टिळक आळीमध्ये गाड्या पार्किंग करुन शहरात अन्य कामासाठी निघून जातात.त्याचप्रमाणे स्मारक पहाण्यासाठी आलेल्या मोठ्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या असतात. या मार्गावर शहरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे मोठ्या गाड्यांमुळे तसेच रस्त्याच्या कडेला लावलेल्या छोट्या- मोठ्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. परंतु या ठिकाणी वाहतूक पोलीस, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. किंबहुना टिळक आळीतील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)लवकरच उन्हाळी सुटी होणार आहे. उन्हाळी सुटीमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. परंतु शासकीय सुट्टीच्या दिवशी स्मारक बंद ठेवल्यामुळे पर्यटक परत फिरतात. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने स्मारकामध्ये सुटीच्या दिवशीही आपल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. येथे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे केलेले पार्किंग त्रासदायक ठरत आहे. वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करुनसुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे निवेदनाद्वारे सुटीच्या दिवशी स्मारक सुरु ठेवण्याची व टिळक आळी रस्त्यावरील पार्किं ग व्यवस्था बंद करण्याची मागणी करण्यात येणार आहे.- राजाभाऊ लिमये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष