शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

साहित्य संमेलन साधेपणातही यशस्वी होतं

By admin | Updated: December 1, 2014 00:05 IST

अशोक बागवे : गुहागर येथील जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाची सांगता

गुहागर : साहित्य संमेलन साधेपणानेही करता येते आणि असे संमेलन यशस्वीही होते, हेच गुहागरच्या साहित्य संमेलनाने दाखवून दिले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक बागवे यांनी सांगत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भपकेबाजपणावर अप्रत्यक्षरीत्या टीकाच केली.गुहागर पोलीस परेड मैदान येथे उर्विमाला साहित्यनगरीत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षीय समोरापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवी इंद्रजित भालेराव, प्रसाद पायगुडे, श्रीराम दुर्गे, संमेलनाचे कार्याध्यक्ष राजेंद्र आरेकर उपस्थित होते.गुहागरातील संमेलनात तरुणांचे चैतन्य दिसून आले. संमेलनाच्या व्यासपीठालाही कोकणी टच होता. कोणताही भपकेबाजपणा नाही की मोठा गाजावाजा नाही. अलीकडे भपकेबाज साहित्य संमेलनाकडे कल वाढला आहे. मात्र, अशा संमेलनापासून दूर राहत, साधेपणाने साजरे करीतही हे संमेलन यशस्वी होऊ शकते, हे गुहागरच्या संमेलनाने सिद्ध केल्याचे बागवे म्हणाले. गुहागरमधील साहित्य गंगोत्रीप्रमाणे रसिक आणि साहित्यिकांचा याठिकाणी संगम पाहायला मिळाला, असे बागवे म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष जयदेव मोरे म्हणाले की, हे संमेलन पाहून भारावून गेलो. नगरपंचायतीनेही खांद्याला खांदा लावून या संमेलनासाठी परिश्रम घेतले. खरोखरच हे संमेलन गुहागरवासीयांच्या कायम स्मरणात राहील. अध्यक्षीय समारोपापूर्वी गुहागरच्या रम्य वातावरणात निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. संतोष एरंडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)