शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

साहित्यिक स्त्रियांचा इतिहास दडपला

By admin | Updated: February 15, 2015 23:48 IST

सतीश काळसेकर यांची खंत : वेंगुर्लेत आनंदयात्रीतर्फे साहित्य संमेलन

वेंगुर्ले : दैनंदिन जीवन आणि सर्जनशील लेखणी यातून साहित्यिक निर्माण होत असतो. अशाप्रकारची साहित्य संंमेलने दरवर्षी व्हावीत. वेंगुर्लेतील या साहित्य संमेलनामुळे येथील युवा पिढीला साहित्यिक होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. ही कौतुकाची बाब आहे. पूर्वी पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही साहित्यिक झाल्या. परंतु त्यांचा इतिहास दडपून टाकण्याचा प्रकार घडला, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक व संपादक सतीश काळसेकर यांनी साहित्य संमेलनावेळी व्यक्त केली.सातेरी प्रासादिक संघ संचलित आनंदयात्री वाङमय मंडळाने वेंगुर्ले येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनावेळी सतीश काळसेकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्योजक दादासाहेब परूळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाचे अध्यक्ष सतीश काळसेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे वेंगुर्ले अध्यक्ष देवदत्त परूळकर, संयोजन समिती अध्यक्ष वृंदा कांबळी, गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, सातेरी प्रासादिक संघाचे अध्यक्ष राजाराम नाईक, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ महाले, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देऊलकर, नगरसेविका अ‍ॅड. सुषमा प्रभूगावकर, किरात ट्रस्टचे सचिव शशांक मराठे, बांधकाम व्यावसायिक सचिन वालावलकर आदी उपस्थित होते. संमेलनाच्या सुरुवातीला वेंगुर्ले येथील सरस्वती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. वीरधवल परब यांनी संमेलनाचे अध्यक्ष सतीश काळसेकर यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविकात दादासाहेब परूळकर यांनी, युवकांनी मागे न राहता आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन वाटचाल करावी, असे सांगितले. कार्यक्रमाध्यक्ष सतीश काळसेकर म्हणाले, वेंगुर्ले गावाने मला आधार दिला आहे. त्यामुळे वेंगुर्लेबाबत भरपूर आठवणी आहेत. येथील माझ्या नाळ पुरलेल्या जमिनीतील लोकांनी माझा जो आदर-सत्कार केला, त्याने मी भारावून गेलो आहे, असे उद्गार काढले. शिक्षकांना समाजात किती मान आहे, हे आजच्या संमेलनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे समजले आहे. संमेलनात कणकवली येथील विघ्नेश पुस्तक भांडार व किरात ट्रस्टने पुस्तक प्रदर्शन मांडले. ज्येष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले यांनी आरती प्रभूंची काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. (प्रतिनिधी)मान्यवरांचा गौरवसंमेलनाचे औचित्य साधून साहित्य क्षेत्रातील व भाषा संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींमध्ये संस्कृत भाषा अभ्यासक रा. पा. जोशी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक देवदत्त परूळकर, लेखक ना. शि. परब, साप्ताहिक किरातचे प्रकाश सुनील मराठे, समीक्षक अनिल सौदागर, कवी पुंडलिक शेट्ये, काव्य संग्रहकार गोविंद पायनाईक, ज्येष्ठ लेखिका उषा परब, कथा संग्रहकार लिलाधर घाडी, ज्येष्ठ संपादिका मीरा जाधव यांचा सतीश काळसेकर यांच्या हस्ते, तर सतीश काळसेकर यांचा दादासाहेब परूळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.