शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिक स्त्रियांचा इतिहास दडपला

By admin | Updated: February 15, 2015 23:48 IST

सतीश काळसेकर यांची खंत : वेंगुर्लेत आनंदयात्रीतर्फे साहित्य संमेलन

वेंगुर्ले : दैनंदिन जीवन आणि सर्जनशील लेखणी यातून साहित्यिक निर्माण होत असतो. अशाप्रकारची साहित्य संंमेलने दरवर्षी व्हावीत. वेंगुर्लेतील या साहित्य संमेलनामुळे येथील युवा पिढीला साहित्यिक होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. ही कौतुकाची बाब आहे. पूर्वी पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही साहित्यिक झाल्या. परंतु त्यांचा इतिहास दडपून टाकण्याचा प्रकार घडला, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक व संपादक सतीश काळसेकर यांनी साहित्य संमेलनावेळी व्यक्त केली.सातेरी प्रासादिक संघ संचलित आनंदयात्री वाङमय मंडळाने वेंगुर्ले येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनावेळी सतीश काळसेकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्योजक दादासाहेब परूळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाचे अध्यक्ष सतीश काळसेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे वेंगुर्ले अध्यक्ष देवदत्त परूळकर, संयोजन समिती अध्यक्ष वृंदा कांबळी, गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, सातेरी प्रासादिक संघाचे अध्यक्ष राजाराम नाईक, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ महाले, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देऊलकर, नगरसेविका अ‍ॅड. सुषमा प्रभूगावकर, किरात ट्रस्टचे सचिव शशांक मराठे, बांधकाम व्यावसायिक सचिन वालावलकर आदी उपस्थित होते. संमेलनाच्या सुरुवातीला वेंगुर्ले येथील सरस्वती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. वीरधवल परब यांनी संमेलनाचे अध्यक्ष सतीश काळसेकर यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविकात दादासाहेब परूळकर यांनी, युवकांनी मागे न राहता आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन वाटचाल करावी, असे सांगितले. कार्यक्रमाध्यक्ष सतीश काळसेकर म्हणाले, वेंगुर्ले गावाने मला आधार दिला आहे. त्यामुळे वेंगुर्लेबाबत भरपूर आठवणी आहेत. येथील माझ्या नाळ पुरलेल्या जमिनीतील लोकांनी माझा जो आदर-सत्कार केला, त्याने मी भारावून गेलो आहे, असे उद्गार काढले. शिक्षकांना समाजात किती मान आहे, हे आजच्या संमेलनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे समजले आहे. संमेलनात कणकवली येथील विघ्नेश पुस्तक भांडार व किरात ट्रस्टने पुस्तक प्रदर्शन मांडले. ज्येष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले यांनी आरती प्रभूंची काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. (प्रतिनिधी)मान्यवरांचा गौरवसंमेलनाचे औचित्य साधून साहित्य क्षेत्रातील व भाषा संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींमध्ये संस्कृत भाषा अभ्यासक रा. पा. जोशी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक देवदत्त परूळकर, लेखक ना. शि. परब, साप्ताहिक किरातचे प्रकाश सुनील मराठे, समीक्षक अनिल सौदागर, कवी पुंडलिक शेट्ये, काव्य संग्रहकार गोविंद पायनाईक, ज्येष्ठ लेखिका उषा परब, कथा संग्रहकार लिलाधर घाडी, ज्येष्ठ संपादिका मीरा जाधव यांचा सतीश काळसेकर यांच्या हस्ते, तर सतीश काळसेकर यांचा दादासाहेब परूळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.